शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:15 IST

इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे. तथापि, आता या प्रकल्पातील पातळीत झपाट्याने घट होत असल्याने पुढील वर्षी अपुरा पाऊस पडल्यास या प्रकल्पावर अवलंबून गावांतही पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भिती आहे.जिल्ह्यातून वाहणाºया आणि मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीवर वाशिम जिल्ह्याच्या अगदी टोकावर कारंजा तालुक्यात मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे. या प्रकल्पाची उंची पायथ्यापासून सुमारे ३०.१३ मी (९८.९ फूट) आणि लांबी ७५५ मी (२,४७७ फूट) इतकी आहे. या प्रकल्पाची साठवणक्षमता ५.०४़१०१३ घन फूट असून पूर्ण भरण क्षमता २.७६५८४५़१०१५ घन फूट इतकी आहे. हा प्रकल्प गोदावरीच्या खोºयात येतो. या प्रकल्पावर शेकडो हेक्टर क्षेत्रात सिंचनही केले जाते. यात वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांनाही फायदा होतो. निर्मितीपासून आजवरही या प्रकल्पाच्या भरवशावर असलेल्या शहरांत पाणीटंचाईची समस्या फारशी जाणवली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने या प्रकल्पातून कारंजा शहराची तहान भागविली जाते, तसेच २४ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरातील ८ गावे आणि मानोरा तालुक्यातील १६ गावांची तहान भागविली जाते. रखरखत्या उन्हामुळे जिल्ह्यातील ८० प्रकल्प कोरडे पडले असताना आणि उर्वरित प्रकल्पांनी तळ गाठला असताना अडाण प्रकल्पात २० टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. त्यामुळेच या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या कारंजा शहरासह २४ गावांत मुबलक पाणी पुरवठा होत आहे. गाळ उपसा करण्याची गरजगेल्या अनेक वर्षांपासून अडाण प्रकल्पाची पातळी कधीही १५ टक्क्यांच्या खाली गेली नाही. दरवर्षीच्या पावसाळ्यात नदीत वाहून येणारा गाळ या प्रकल्पात साचल्याने प्रकल्पाची साठवण क्षमता कमी झाली आहे. काही शेतकरी स्वयंस्फूर्तीने या प्रकल्पाच्या कोरड्या भागातून गाळाचा उपसा करीत असले तरी, त्याचा म्हणावा तेवढा फायदा खोलीकरणास होत नाही. त्यामुळे शासनाने गाळयुक्त शिवार, गाळमूक्त धरण अभियानांतर्गत या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून शेतकºयांना गाळ नेण्यास प्रोत्साहीत करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :WaterपाणीwashimवाशिमKaranjaकारंजा