शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:15 IST

इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे. तथापि, आता या प्रकल्पातील पातळीत झपाट्याने घट होत असल्याने पुढील वर्षी अपुरा पाऊस पडल्यास या प्रकल्पावर अवलंबून गावांतही पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भिती आहे.जिल्ह्यातून वाहणाºया आणि मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीवर वाशिम जिल्ह्याच्या अगदी टोकावर कारंजा तालुक्यात मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे. या प्रकल्पाची उंची पायथ्यापासून सुमारे ३०.१३ मी (९८.९ फूट) आणि लांबी ७५५ मी (२,४७७ फूट) इतकी आहे. या प्रकल्पाची साठवणक्षमता ५.०४़१०१३ घन फूट असून पूर्ण भरण क्षमता २.७६५८४५़१०१५ घन फूट इतकी आहे. हा प्रकल्प गोदावरीच्या खोºयात येतो. या प्रकल्पावर शेकडो हेक्टर क्षेत्रात सिंचनही केले जाते. यात वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांनाही फायदा होतो. निर्मितीपासून आजवरही या प्रकल्पाच्या भरवशावर असलेल्या शहरांत पाणीटंचाईची समस्या फारशी जाणवली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने या प्रकल्पातून कारंजा शहराची तहान भागविली जाते, तसेच २४ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरातील ८ गावे आणि मानोरा तालुक्यातील १६ गावांची तहान भागविली जाते. रखरखत्या उन्हामुळे जिल्ह्यातील ८० प्रकल्प कोरडे पडले असताना आणि उर्वरित प्रकल्पांनी तळ गाठला असताना अडाण प्रकल्पात २० टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. त्यामुळेच या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या कारंजा शहरासह २४ गावांत मुबलक पाणी पुरवठा होत आहे. गाळ उपसा करण्याची गरजगेल्या अनेक वर्षांपासून अडाण प्रकल्पाची पातळी कधीही १५ टक्क्यांच्या खाली गेली नाही. दरवर्षीच्या पावसाळ्यात नदीत वाहून येणारा गाळ या प्रकल्पात साचल्याने प्रकल्पाची साठवण क्षमता कमी झाली आहे. काही शेतकरी स्वयंस्फूर्तीने या प्रकल्पाच्या कोरड्या भागातून गाळाचा उपसा करीत असले तरी, त्याचा म्हणावा तेवढा फायदा खोलीकरणास होत नाही. त्यामुळे शासनाने गाळयुक्त शिवार, गाळमूक्त धरण अभियानांतर्गत या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून शेतकºयांना गाळ नेण्यास प्रोत्साहीत करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :WaterपाणीwashimवाशिमKaranjaकारंजा