शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कारंजा तालुक्यात तीन वर्षात ७७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 3:58 PM

करंजा लाड : तालुक्यात सन २०१५  पासून २२ जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देयामधील ४२ शेतकरी आत्महत्या शासन दरबारी पात्र ठरल्या. विविध त्रुटी व कारणांमुळे ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. ३ शेतकºयांच्या आत्महत्या यादीतून वगळल्या असून, १ शेतकरी आत्महत्या प्रकरण चौकशीत आहे. 

करंजा लाड : तालुक्यात सन २०१५  पासून २२ जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. यामधील ४२ शेतकरी आत्महत्या शासन दरबारी पात्र ठरल्या असून, विविध त्रुटी व कारणांमुळे ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. ३ शेतकºयांच्या आत्महत्या यादीतून वगळल्या असून, १ शेतकरी आत्महत्या प्रकरण चौकशीत आहे. 

कारंजा तालुक्यात सन २०१५ मध्ये ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यापैकी २० पात्र तर १२ अपात्र ठरविण्यात आल्या. २०१६ मध्ये २२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी १३ पात्र तर ९ अपात्र ठरविल्या गेल्या. सन २०१७ मध्ये २२ शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली .  त्यापैकी ९ पात्र, १० अपात्र तर ३ आत्महत्या वगळल्या गेल्या व १ आत्महत्या चौकशीत असल्याची माहिती तहसिल कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. भारत हा कृषी प्रधान देश असून, देशातील ८० टक्के लोक शेती किंवा शेतीशी निगडीत व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. पूर्वी शेतकरी हा पारंपारिक शेती करून शेतीत निघेल तेवढ्या उत्पन्नावर आपला चरितार्थ भागवत होता. परंतू अलिकडच्या काळात शेतीचे यांत्रिकीकरण झाले आणि शेती उत्पादनासाठी लागणारा खर्चही वाढला. अलिकडील पावसातील अनियमितता, खंड, बदलते वातावरण, व निसगार्चा लहरीपणा या ना अनेक कारणांमुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असून, कधीकधी तर उत्पादन घेण्यासाठी लागलेला खर्चही निघणे कठीण होवून बसले आहे. शेती या व्यवसायात उत्पन्नाची हमी नसून देखील पर्याय नाही म्हणून ंिकंवा वडीलोपार्जित शेती आहेत म्हणून शेती केल्या जाते. यासाठी कधी बँकांचे तर कधी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवून शेती मशागत व बी बीयाणे साठी पैसा उभा केल्या जातो. शेतकºयांचे कुटुंब हे संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने मुलांचे शिक्षण, मुलामुलीचे विवाह, दवाखाना, आणि चरितार्थ असे सर्वच शेतीतून मिळणाºया उत्पन्नावर भागविले जाते. परंतू अलिकडे होत असलेली नापिकी, कजार्चा वाढलेला डोंगर, या विवंचनेतून बळीराजा जगण्यापेक्षा मृत्यू बरा असे समजून आत्महत्या करित आहे. कारंजा तालुक्यात सन २०१५ पासून जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकरी व शेतकरी पुत्रांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येकरिता शासनाकडून १ लाख रूपयांचे अर्थ ाहाय केल्या जाते. तहसिल कार्यालयामार्फत शेतकरी आत्महत्येचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यानंतर जिल्हाधीकारी कार्यालयाच्या समितीमार्फत आत्महत्या पात्र की अपात्र ठरविल्या जाते. शासनाकडून दिल्या जाणाºया १ लाख रुपए अर्थसहायापैकी ३० हजार रूपयांचा धनादेश जवळच्या नातेवाईकाला देण्यात येतो. तर उर्वरित ७० हजार रुपये  पोस्टात खाते काढून त्यामध्ये टाकले जातात. जमा रकमेवर मिळणाºया व्याजावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा हा या मागील हेतू आहे. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाfarmer suicideशेतकरी आत्महत्या