शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

वाशिम जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:04 PM

वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला.

ठळक मुद्दे१२० गावांतील कामे ४ हजार टीसीएम जलसाठा

वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. या जलसाठ्यातून सुमारे ८ हजार १०० हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असा आशावादही प्रशासनाने व्यक्त केला. 

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलस्त्रोतातील गाळ काढणे, पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भूगर्भातील जलपातळीत वाढ करणे यासह जलसंधारणाची विविध कामे केली जातात.  या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात सदर अभियान सुरू झाल्यापासून ते ७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत एकूण ७ हजार ६७६ कामे पूर्ण झाली आहेत. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांत ५ हजार ५८ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ३५ हजार ३२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली. २०० गावांमध्ये  वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मंगरूळपीर २७, मानोरा ६१ व कारंजा तालुक्यातील ३४ गावांचा समावेश होता. सन २०१६-१७ मध्ये जिह्यातील १४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. वाशिम तालुक्यातील २४, रिसोड १७, मालेगाव २४, मंगरूळपीर ३१, मानोरा २१ व कारंजा तालुक्यातील ३२ गावांचा यामध्ये  समावेश आहे. या गावांमध्ये २ हजार १२ कामे पूर्ण झाली असून १६ हजार २० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. सन २०१७-१८ वर्षात जलयुक्त शिवार अभियानात १२० गावे असून, ७ नोव्हेंबरपर्यंत ६०६ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे विहित मुदतीच्या आत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी