शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खरीप हंगामासाठी ६० हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:50 IST

Washim District News जिल्ह्यासाठी ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होऊ नये म्हणून, कृषी विभागाने आतापासूनच नियोजन केले आहे. जिल्ह्यासाठी ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला असून, पॉस मशिनवर ऑनलाईन पद्धतीनेच खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने विक्रेत्यांना दिल्या. जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात साधारणत: चार लाख हेक्टरवर पेरणी होते. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. २०२१ मधील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागातर्फे आतापासूनच केले जात असून, खताची टंचाई निर्माण होऊ नये यावर भर देण्यात आला. गतवर्षी खरीप हंगामात काही ठिकाणी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या प्रकारातील खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने जवळपास ८० हजार मे.टन खताची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली. ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला असून, गतवर्षीचा पाच हजार मे. टन खतसाठा शिल्लक आहे. येत्या खरीप हंगामात जवळपास ६५ हजार मे. टन खतसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, अशी आशा कृषी विभाग बाळगून आहे. कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खतसाठा, किमतीसंदर्भात फलक लावण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत. खतासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संपर्क साधता येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी