शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

५५ गावांना पाणीटंचाईच्या झळा! ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण : २ गावांत टँकर

By संतोष वानखडे | Updated: May 26, 2024 16:42 IST

मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून, ५५ गावांची तहान भागविण्यासाठी ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण तर २ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

संतोष वानखडे

वाशिम : मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून, ५५ गावांची तहान भागविण्यासाठी ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण तर २ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दरवर्षी उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असे तिमाही आराखडे तयार केले जातात. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत जिल्ह्यातील १२६ गावांत पाणीटंचाई जाणवण्याचा अंदाज पाणीटंचाई कृती आराखड्यातून वर्तविला होता. १३४ गावांत विहिर अधिग्रहण तर १० गावांत टॅंकरने पाणीपुरवठा प्रस्तावित असून, या उपाययोजनांसाठी ९२ लाख १६ हजारांचा निधी प्रस्तावित आहे.

२६ मे पर्यंत जिल्ह्यातील ५५ गावांत पाणीटंचाईच्या झळा तिव्र झाल्या असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या. ५३ गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले तर वनोजा (ता.मंगरूळपीर) व गंगापूर (ता.कारंजा) अशा २ गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्यात उन्हाची तिव्रता कमालिची वाढली असून, प्रकल्पांतील जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. शहरी भागातही पाणीकपात केली जात असून, कुठे तीन दिवसाआड तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.विहिर/बोअर अधिग्रहण

तालुका / गावेवाशिम / ६मालेगाव / ५रिसोड / ३मानोरा / १३मं.पीर / १२कारंजा / १४एकूण / ५३