शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

५५ गावांना पाणीटंचाईच्या झळा! ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण : २ गावांत टँकर

By संतोष वानखडे | Updated: May 26, 2024 16:42 IST

मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून, ५५ गावांची तहान भागविण्यासाठी ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण तर २ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

संतोष वानखडे

वाशिम : मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून, ५५ गावांची तहान भागविण्यासाठी ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण तर २ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दरवर्षी उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असे तिमाही आराखडे तयार केले जातात. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत जिल्ह्यातील १२६ गावांत पाणीटंचाई जाणवण्याचा अंदाज पाणीटंचाई कृती आराखड्यातून वर्तविला होता. १३४ गावांत विहिर अधिग्रहण तर १० गावांत टॅंकरने पाणीपुरवठा प्रस्तावित असून, या उपाययोजनांसाठी ९२ लाख १६ हजारांचा निधी प्रस्तावित आहे.

२६ मे पर्यंत जिल्ह्यातील ५५ गावांत पाणीटंचाईच्या झळा तिव्र झाल्या असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या. ५३ गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले तर वनोजा (ता.मंगरूळपीर) व गंगापूर (ता.कारंजा) अशा २ गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्यात उन्हाची तिव्रता कमालिची वाढली असून, प्रकल्पांतील जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. शहरी भागातही पाणीकपात केली जात असून, कुठे तीन दिवसाआड तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.विहिर/बोअर अधिग्रहण

तालुका / गावेवाशिम / ६मालेगाव / ५रिसोड / ३मानोरा / १३मं.पीर / १२कारंजा / १४एकूण / ५३