शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

५५ गावांना पाणीटंचाईच्या झळा! ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण : २ गावांत टँकर

By संतोष वानखडे | Updated: May 26, 2024 16:42 IST

मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून, ५५ गावांची तहान भागविण्यासाठी ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण तर २ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

संतोष वानखडे

वाशिम : मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून, ५५ गावांची तहान भागविण्यासाठी ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण तर २ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दरवर्षी उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असे तिमाही आराखडे तयार केले जातात. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत जिल्ह्यातील १२६ गावांत पाणीटंचाई जाणवण्याचा अंदाज पाणीटंचाई कृती आराखड्यातून वर्तविला होता. १३४ गावांत विहिर अधिग्रहण तर १० गावांत टॅंकरने पाणीपुरवठा प्रस्तावित असून, या उपाययोजनांसाठी ९२ लाख १६ हजारांचा निधी प्रस्तावित आहे.

२६ मे पर्यंत जिल्ह्यातील ५५ गावांत पाणीटंचाईच्या झळा तिव्र झाल्या असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या. ५३ गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले तर वनोजा (ता.मंगरूळपीर) व गंगापूर (ता.कारंजा) अशा २ गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्यात उन्हाची तिव्रता कमालिची वाढली असून, प्रकल्पांतील जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. शहरी भागातही पाणीकपात केली जात असून, कुठे तीन दिवसाआड तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.विहिर/बोअर अधिग्रहण

तालुका / गावेवाशिम / ६मालेगाव / ५रिसोड / ३मानोरा / १३मं.पीर / १२कारंजा / १४एकूण / ५३