शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

वाशिम जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे होणार जलयुक्तची ५२ कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:04 PM

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे सन २०१७-१८ या वर्षात एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाली असून, सदर कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येते. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने ५२ कामांसाठी भरघोष निधीची मागणी नोंदविली होती.

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे सन २०१७-१८ या वर्षात एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाली असून, सदर कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.राज्यात सतत उद्भवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येते. टंचाई लक्षात घेता आता उर्वरीत गावांतही जलसंधारणाची कामे प्रस्तावित केली जात आहेत. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात कोणत्या विभागाने किती कामे करावी, याचे नियोजन जिल्हा नियोजन समितीतर्फे केले जाते. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकाºयांकडे ५२ कामांसाठी भरघोष निधीची मागणी नोंदविली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा करून लघु सिंचन विभागाचा सिंचन अनुशेष दूर करणे, तलाव दुरूस्ती, टंचाईग्रस्त भागात कृत्रिम डोह निर्मिती आदी कामांना प्राधान्य देण्याची मागणी लावून धरली. एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाल्याने लवकरच ही कामे केली जाणार आहेत. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे व दुरूस्ती करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकूण ५२ कामे सूचविण्यात आली होती. सर्वाधिक कामे ही नाला खोलीकरण, सरळीकरण व रूंदीकरणाची असून, त्याखालोखाल पाझर तलाव, गाव तलाव व सिंचन तलाव दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार