शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेले २.५६ टक्के मतदान पडणार कुणाच्या पथ्यावर ?

By admin | Updated: October 17, 2014 00:44 IST

वाशिम जिल्ह्यातील तब्बल ५७.२0 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

वाशिम : विधानसभा मतदारसंघात १५ ऑक्टोबरला पार पडलेल्या पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ५७.२0 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सन २00९ च्या तुलनेत झालेली ही २.६५ टक्के वाढ नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा आजमि तीला मतदारसंघात सुरू झाली आहे. यंदाच्या विधानसभेचा निकाल मतदानाचा वाढलेला टक्का तथा मतविभाजनाचे समीकरण यावर केंद्रित होणार असल्याचे आडाखे राजकीय जाणकारांकडून बांधले जात आहेत.वाशिम मतदारसंघात यंदा पार पडलेली निवडणूक सन २00९ च्या तुलनेत सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढविली. २00९ मध्ये दोन लाख ७२ हजार 0५ मतदारांपैकी एक लाख ५१ हजार २२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये भाजपने ६५ हजार १७४, तर काँग्रेसने ४0 हजार ९४५ मते घेतली होती. त्यावेळीही मताचे विभाजन करण्यात अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या महादेव ताटके व समाधान माने निर्णायक ठरले होते. दोन्ही अपक्षांनी मिळून ३६ हजार ४९ मते घेतली होती. सन २0१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्यामुळे मतविभाजन अटळ आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी-बिघाडी झाल्यामुळे दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व काँग्रेसी विचारधारेच्या मतांमध्ये उभी फूट पडली आहे. भाजप व शिवसेना युतीमधील घटस्फोटामुळेही मोठय़ा प्रमाणात मतविभाजन झाले आहे. त्यातच मनसेने दोन्ही बाजूंच्या म तविभाजनाचा फायदा उचलण्याचा जोरकस प्रयत्न केला आहे. अपक्ष उमेदवारांचा निवडणुकीतील सहभाग मतांचा टप्पा कितपत गाठते, हेही महत्त्वाचे ठरणारे आहे.