शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अतिवृष्टीच्या मदतीची २१७५ शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 11:23 AM

अद्यापही शेतकºयांना या नुकसानपोटी आर्थिक मदत मंजूर झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा २२ जूननंतर काही भागांत वारंवार अतिवृष्टी झाली. यात शेकडो हेक्टर शेत जमीन पिकांसह खरडली. तालुकास्तरावर महसूल प्रशासनाने या नुकसानाचे पंचनामे करून जिल्हास्तरावर अहवाल सादर केला. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे २१७५ शेतकऱ्यांच्या ८४७ एकर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे; परंतु अद्यापही शेतकºयांना या नुकसानपोटी आर्थिक मदत मंजूर झाली नाही.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर सुरुवातीच्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला. तथापि, २२ जूननंतर जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टीने थैमान घातले. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु.सह परिसरात २२ जूननंतर अतिवृष्टीमुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील पिके आणि शेतजमीनही खरडून गेली. शिवाय मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड आणि वाशिम तालुक्यातही जूनच्या अखेर आणि जुलैच्या सुरुवातीला अतिवृष्टी होऊन शेतकºयांना मोठा फटका बसला. महसूल प्रशासनाच्यावतीने तलाठ्यांनी या नुकसानाचे पंचनामे केले आणि प्राथमिक अहवाल तहसीलस्तरावर सादर केला. त्यानंतर मंडळ अधिकाºयांनी या पंचनाम्यांच्या आधारे अंतीम अहवाल तयार करून तो तहसीलदारांमार्फत जिल्हास्तरावर पाठविला.जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभागाने अहवालाचंी पडताळणी करून बाधित शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी विभागस्तरावर मागणी नोंदविण्यासाठी अहवाल तयार केला. तथापि, दोन महिने उलटले तरी, जिल्ह्यातील एकाही नुकसानग्रस्त शेतकºयाला अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही.

शिरपूर येथे गत महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे नाल्यास पूर येऊन आमच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे खरीप हंगामात बहरलेल्या पिकांचे नुकसान झाले. आता दीड महिना उलटला तरी, प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकली नाही. याची दखल वरिष्ठांनी त्वरीत घेऊन आम्हाला मदत मंजूर करावी.- राजकुमार भालेरावशेतकरी, शिरपूर जैन

शिरपूर येथे गत महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे नाल्यास पूर येऊन आमच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे खरीप हंगामात बहरलेल्या पिकांचे नुकसान झाले. आता दीड महिना उलटला तरी, प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकली नाही. याची दखल वरिष्ठांनी त्वरीत घेऊन आम्हाला मदत मंजूर करावी.- राजकुमार भालेरावशेतकरी,शिरपूर जैन

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी