शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

वाशिम जिल्ह्यात अडकलेले १७२७ नागरिक परतले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:55 AM

केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील ५१७१ कामगारवाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केली, तर कामगार विभागाचेही सहकार्य लाभले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी आलेले २० राज्यातील, तसेच परजिल्ह्यातील नागरिक वाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. प्रशासनाकडून अशा ५१७१ कामगारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर यातील ३४२ नागरिकांना शासन आणि प्रशासनाकडून ३१ ठिकाणी सुरू केलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना केंद्र आणि राज्यशासनाकडून देण्यात आल्या आणि त्यासाठी गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना पासेस उपलब्ध करण्याच्याही सुचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाप्रशासनाने गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घेतली. त्यानंतर शासकीय कॅम्पमधील ३४२ नागरिक मिळून इतर ठिकाणी असलेल्या १७२७ नागरिकांना परत त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे.तीन हजारांवर कामगार कंत्राटदारांच्या आश्रयातवाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी विविध राज्यातील हजारो कामगार आले आहेत. कोरोना विषाणूवर संसर्गासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही त्यातील हजारो कामगार आपापल्या राज्यात स्वगृही परतले असून, त्यात प्रशासनाच्या परवानगीने परतलेल्या १७२७ कामगारांचा समावेश असला तरी अद्यापही परराज्यातील ३४४४ कामगार जिल्ह्यात कायम असून, हे सर्व कामगार कंत्राटदार कंपनीच्या तळावर आश्रयास आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार