शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:42 IST

वाशिम : शासनाने पटसंख्या वाढीसाठी जि. प. शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या व विज्ञान केंद्राची सोय केली; परंतु, शाळांना पुरेशी पटसंख्या ...

वाशिम : शासनाने पटसंख्या वाढीसाठी जि. प. शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या व विज्ञान केंद्राची सोय केली; परंतु, शाळांना पुरेशी पटसंख्या मिळू शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांचे तीन किमी अंतरावरील शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. वाशिम जिल्ह्यात अशा १२२ शाळा असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे या शाळांचे समायोजन करणे अशक्य आहे. त्यामुळे या शाळा सुरूच राहणार असल्याने या ग्रामीण भागातील पालकांना दिलासा मिळाला आहे.

शासन निर्णयानुसार प्राथमिकच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे तीन किमीच्या आत अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश शासनाकडून ३ वर्षांपूर्वी पारित करण्यात आले आहेत. दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना वाहतूक प्रवास भत्ताही मिळणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची शक्यता वाढली होती. वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या ७७५ शाळा आहेत. त्यापैकी १२२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याने या शाळा शासन निर्णयानुसार बंद होण्याची शक्यता होती; परंतु पालकांचा विरोध, पर्यायासाठी ३ किलोमीटर अंतरात दुसरी शाळा नसतानाच विद्यार्थ्यांच्या प्रवासासह इतर तांत्रिक अडचणींमुळे या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांत समायोजन करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाकडून झालेली नाही.

---------

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

नियमानुसार पटसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील १२२ शाळा बंद करण्यात आल्या नसल्या आणि त्यांचे समायोजन होणार नसले तरी या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त शिक्षकांचे मात्र इतर शाळांत समायोजन करण्यात आले आहे.

------------

विद्यार्थ्यांच्या पालकांना तूर्तास दिलासा

शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद कराव्या लागणार आहेत. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान ४०० ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत; परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या १२२ शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

------

कोट :

शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार जि. प. शाळांची संख्या ४०० ते ५०० पर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. जिल्ह्यात या प्रक्रियेला दोन वर्षांचा कालावधी लागेल. सद्य:स्थितीत मात्र कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची कोणतीही तयारी नाही.

-अंबादास मानकर,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जि. प. वाशिम