शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ZP Election 2020: पालघरमध्ये भाजपाची पडझड; शिवसेना नं. १, पण राष्ट्रवादी 'गेम चेंजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:21 IST

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या

ठाणे - पालघर जिल्ह्यातील बहुतांश निकाल हाती आले असून यामध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. ५७ पैकी १८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळविण्यात यश आलं आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ६३ टक्के मतदान झालं होतं. 

पालघरमधील ५७ जागांपैकी भाजपा १०, शिवसेना १८, काँग्रेस - १, राष्ट्रवादी १५ तर बविआ -४, इतर ९ याप्रमाणे जागा निवडून आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेत यापूर्वी भाजपाचे २१ सदस्य निवडून आले होते त्यातील ११ जागा भाजपाच्या कमी झालेल्या दिसत आहेत. तर शिवसेना मागील वेळी १५ जागांवर निवडून आली होती. तर एक बंडखोर शिवसेना उमेदवार निवडून आला होता. 

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचं संख्याबळ २ जागांनी वाढलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यावेळी ४ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र यंदा राष्ट्रवादीने १५ जागांवर घवघवीत यश मिळविलं आहे. काँग्रेसने आपली एक जागा राखण्यात यशस्वी झालेत. 

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या तर काँग्रेस-राष्ट्रवादी, बविआ आणि माकप यांनी महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे बहुमताचा २९ आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला भाजपा अथवा काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे.  

टॅग्स :BJPभाजपाZP Electionजिल्हा परिषदpalgharपालघरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस