शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

वसईकरांवर यंदा पाणी कपातीचे विघ्न नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:39 IST

यंदाच्या उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.

नालासोपारा : यंदाच्या उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. विशेषत: वसई-विरार शहर महानगरपालिकेतील वाढती लोकसंख्या पाहता यंदा वसई-विरारकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे वाटत होते. मात्र महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात वसई-विरारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याचे जाहीर केल्याने दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर झाल्याने हे शक्य झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.मे महिन्यात जिकडे तिकडे पाणीटंचाईचे सावट आहे. मात्र महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने या उन्हाळ्यात वसईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा ३ मधून १०० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन वसई-विरारकरांना मिळत आहे. सध्या धामणी धरणात २४ टक्के पाणीसाठा असून उसगाव धरणात २१.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. तर पेल्हार धरणात १९.४९ टक्के पाणीसाठा आहे. वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाºÞया धरणात मुबलक साठा असल्याने पाणीकपात केली जाणार नसल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरारमधील पाणीकपात तूर्त टळली असली तरी दुष्काळ परिस्थितीत कोठे कोठे पाणी मुरते यावर सर्वेक्षण करून पालिकेने त्यादृष्टीने ठोस प्रयत्न राबवायला सुरूवात केली आहे. प्रामुख्याने पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. काही ठिकाणी पाणी चोरी होत आहे. या सर्वांवर चाप लावण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पाणीचोरीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. सध्या पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांवर त्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महापालिकेने पावसाळ्याआधी करण्यात येणाºया कामांचादेखील आढावा घेतला असून सर्वेक्षणानुसार जुने पंप बदलणे, त्यांची दुरुस्ती करणे, पावसाळ्याआधी यंत्रणा तपासणे ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत.मुख्यत: पावसाळ्यात झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. मासवण आणि धुकटन येथे पाणी खेचण्यासाठी वीज पुरवठ्याची यंत्रणा आहे. मनोर आणि पालघर फिडर हे जंगलातून जात असल्याने त्यावरील फांद्या काप ल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार