शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांवर यंदा पाणी कपातीचे विघ्न नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:39 IST

यंदाच्या उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.

नालासोपारा : यंदाच्या उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. विशेषत: वसई-विरार शहर महानगरपालिकेतील वाढती लोकसंख्या पाहता यंदा वसई-विरारकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे वाटत होते. मात्र महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात वसई-विरारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याचे जाहीर केल्याने दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर झाल्याने हे शक्य झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.मे महिन्यात जिकडे तिकडे पाणीटंचाईचे सावट आहे. मात्र महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने या उन्हाळ्यात वसईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा ३ मधून १०० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन वसई-विरारकरांना मिळत आहे. सध्या धामणी धरणात २४ टक्के पाणीसाठा असून उसगाव धरणात २१.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. तर पेल्हार धरणात १९.४९ टक्के पाणीसाठा आहे. वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाºÞया धरणात मुबलक साठा असल्याने पाणीकपात केली जाणार नसल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरारमधील पाणीकपात तूर्त टळली असली तरी दुष्काळ परिस्थितीत कोठे कोठे पाणी मुरते यावर सर्वेक्षण करून पालिकेने त्यादृष्टीने ठोस प्रयत्न राबवायला सुरूवात केली आहे. प्रामुख्याने पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. काही ठिकाणी पाणी चोरी होत आहे. या सर्वांवर चाप लावण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पाणीचोरीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. सध्या पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांवर त्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महापालिकेने पावसाळ्याआधी करण्यात येणाºया कामांचादेखील आढावा घेतला असून सर्वेक्षणानुसार जुने पंप बदलणे, त्यांची दुरुस्ती करणे, पावसाळ्याआधी यंत्रणा तपासणे ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत.मुख्यत: पावसाळ्यात झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. मासवण आणि धुकटन येथे पाणी खेचण्यासाठी वीज पुरवठ्याची यंत्रणा आहे. मनोर आणि पालघर फिडर हे जंगलातून जात असल्याने त्यावरील फांद्या काप ल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार