शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा विष्णू सवरांना दिल्लीला पाठविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:28 IST

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी सवरांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी भरून काढावी असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे

नंदकुमार टेणीपालघर : पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी सवरांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी भरून काढावी असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. तर सवरांना राज्याच्या राजकारणातून सन्माननीयरित्या दूर करण्यासाठी लाभलेली ही सुवर्णसंधी साधून त्यांना वनगांचे उत्तराधिकारी करावे. मात्र पालघरची पोटनिवडणूक जाहिर झाल्यास वनगा कुटुंबियांचे मन राखण्यासाठी तिची उमेदवारी श्रीनिवास यांना द्यावी व पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीतील पालघर मतदारसंघातील भाजपची उमेदवारी सवरा यांना द्यावी, असाही एक विचारप्रवाह भाजपमध्ये आहे.राष्टÑवादीतून शिवसेनेत आलेले व आमदार झालेले कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यानंतर पालघर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेनेने जशी त्यांचे पुत्र अमित यांना दिली. ते विजयी देखील झाले. राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावची उमेदवारी त्यांच्या पत्नी सुमनताईंना दिली गेली त्याही विजयी झाल्यात. याच न्यायाने वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी जर पोटनिवडणूक झाली. तर तिच्या करीता श्रीनिवास यांना उमेदवारी द्यावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र भाजपने आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाही.सवरा हे ज्येष्ठ नेते असले तरी कुशल प्रशासक म्हणून त्यांचा फारसा वकूब नाही ते स्वत: आदीवासी आहेत. असे असतानाही त्यांच्याकडे असलेल्या आदीवासी विकास मंत्रालयात सर्वाधिक घोटाळे झाले आहेत. भरती पासून ते पोषक आहारापर्यत एकही बाब भ्रष्टाचार मुक्त राहिलेले नाही. कुपोषण वाढलेले आहे. अशी बजबजपुरी त्यांच्या खात्यात माजली आहे. ते राहत असलेल्या वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांची कन्या नीशा सवरा दारुण पराभूत झाली. तसेच भाजपाचाही शिवसेनेने या नगरपंचायतीत जबरदस्त पराभव केला. सवरा हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असतांनाही डहाणू नगर परीषदेच्या निवडणुकीमध्येच भाजपला यश मिळाले. जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेत बविआची सत्ता पालघर, जव्हार या नगरपालिका व मोखाडा व वाडा नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आहे. तलासरीमध्ये मार्क्सवादी तर सवरांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या विक्रमगड मध्ये निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीची सत्ता आहे. म्हणजे डहाणूचा अपवाद वगळता सवरा पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात भाजपचे पानीपत झाले आहे. म्हणजेच संघटनात्मकदृष्ट्या, जिल्ह्यातील राजकारणावर पकड ठेवण्याच्या दृष्टीने सवरा फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातून सन्मानाने दूर करण्यासाठी पुढील वर्षी होणाºया लोकसभेच्या निवडणूकीसाठी पालघर मतदारसंघातून वनगांच्या जागी उमेदवारी द्यावी असा विचार प्रवाह भाजपामध्ये बळावतो आहे. निष्क्रीय नेत्याला सन्मानाने राज्यातून निरोप देणे व जिल्ह्यासाठी भाजपचा नवा चेहरा निर्माण करणे हे दोन्हीही पक्षी एका दगडात मारले जातील अशी या गटाची धारणा आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे देखील सवरांबाबत खूष नाहीत जिल्ह्यातल्या प्रसारमाध्यमांशीही सवरांची जवळीक नाही. एकीकडे शिवसेना आणि बविआ आक्रमकतेने जिल्ह्यात राजकारण करीत असताना त्याचा मुकाबला करू शकण्याइतके सामर्थ्य सवरांमध्ये नाही. अशी चर्चा भाजपमध्ये आहे.  आक्रमक शिवसेना, बविआचा सामना करण्यात अपयशशिवसेनेने ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्याचे राजकीय सूत्रधार म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना संधी दिली, जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आमदार रविंद्र फाटक यांना तर जिल्हाप्रमुखपदी राजेशभाई शहा यांना नियुक्त केले. अशाच प्रकारचे संघटनात्मक बदल भाजपनेही करण्याची आवश्यकता आहे. ते होत नाहीत तो पर्यंत भाजपाला जिल्ह्यात चमकदार कामगिरी करता येणार नाही. असेच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनाही वाटू लागले आहे. त्याबाबत दिल्लीश्वरांच्या कानावर गाºहाणी घातली गेली असून त्यावर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :BJPभाजपा