शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भाजपा विष्णू सवरांना दिल्लीला पाठविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:28 IST

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी सवरांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी भरून काढावी असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे

नंदकुमार टेणीपालघर : पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी सवरांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी भरून काढावी असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. तर सवरांना राज्याच्या राजकारणातून सन्माननीयरित्या दूर करण्यासाठी लाभलेली ही सुवर्णसंधी साधून त्यांना वनगांचे उत्तराधिकारी करावे. मात्र पालघरची पोटनिवडणूक जाहिर झाल्यास वनगा कुटुंबियांचे मन राखण्यासाठी तिची उमेदवारी श्रीनिवास यांना द्यावी व पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीतील पालघर मतदारसंघातील भाजपची उमेदवारी सवरा यांना द्यावी, असाही एक विचारप्रवाह भाजपमध्ये आहे.राष्टÑवादीतून शिवसेनेत आलेले व आमदार झालेले कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यानंतर पालघर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेनेने जशी त्यांचे पुत्र अमित यांना दिली. ते विजयी देखील झाले. राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावची उमेदवारी त्यांच्या पत्नी सुमनताईंना दिली गेली त्याही विजयी झाल्यात. याच न्यायाने वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी जर पोटनिवडणूक झाली. तर तिच्या करीता श्रीनिवास यांना उमेदवारी द्यावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र भाजपने आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाही.सवरा हे ज्येष्ठ नेते असले तरी कुशल प्रशासक म्हणून त्यांचा फारसा वकूब नाही ते स्वत: आदीवासी आहेत. असे असतानाही त्यांच्याकडे असलेल्या आदीवासी विकास मंत्रालयात सर्वाधिक घोटाळे झाले आहेत. भरती पासून ते पोषक आहारापर्यत एकही बाब भ्रष्टाचार मुक्त राहिलेले नाही. कुपोषण वाढलेले आहे. अशी बजबजपुरी त्यांच्या खात्यात माजली आहे. ते राहत असलेल्या वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांची कन्या नीशा सवरा दारुण पराभूत झाली. तसेच भाजपाचाही शिवसेनेने या नगरपंचायतीत जबरदस्त पराभव केला. सवरा हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असतांनाही डहाणू नगर परीषदेच्या निवडणुकीमध्येच भाजपला यश मिळाले. जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेत बविआची सत्ता पालघर, जव्हार या नगरपालिका व मोखाडा व वाडा नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आहे. तलासरीमध्ये मार्क्सवादी तर सवरांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या विक्रमगड मध्ये निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीची सत्ता आहे. म्हणजे डहाणूचा अपवाद वगळता सवरा पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात भाजपचे पानीपत झाले आहे. म्हणजेच संघटनात्मकदृष्ट्या, जिल्ह्यातील राजकारणावर पकड ठेवण्याच्या दृष्टीने सवरा फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातून सन्मानाने दूर करण्यासाठी पुढील वर्षी होणाºया लोकसभेच्या निवडणूकीसाठी पालघर मतदारसंघातून वनगांच्या जागी उमेदवारी द्यावी असा विचार प्रवाह भाजपामध्ये बळावतो आहे. निष्क्रीय नेत्याला सन्मानाने राज्यातून निरोप देणे व जिल्ह्यासाठी भाजपचा नवा चेहरा निर्माण करणे हे दोन्हीही पक्षी एका दगडात मारले जातील अशी या गटाची धारणा आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे देखील सवरांबाबत खूष नाहीत जिल्ह्यातल्या प्रसारमाध्यमांशीही सवरांची जवळीक नाही. एकीकडे शिवसेना आणि बविआ आक्रमकतेने जिल्ह्यात राजकारण करीत असताना त्याचा मुकाबला करू शकण्याइतके सामर्थ्य सवरांमध्ये नाही. अशी चर्चा भाजपमध्ये आहे.  आक्रमक शिवसेना, बविआचा सामना करण्यात अपयशशिवसेनेने ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्याचे राजकीय सूत्रधार म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना संधी दिली, जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आमदार रविंद्र फाटक यांना तर जिल्हाप्रमुखपदी राजेशभाई शहा यांना नियुक्त केले. अशाच प्रकारचे संघटनात्मक बदल भाजपनेही करण्याची आवश्यकता आहे. ते होत नाहीत तो पर्यंत भाजपाला जिल्ह्यात चमकदार कामगिरी करता येणार नाही. असेच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनाही वाटू लागले आहे. त्याबाबत दिल्लीश्वरांच्या कानावर गाºहाणी घातली गेली असून त्यावर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :BJPभाजपा