शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘कुणी घर देता का घर?’; दोन वर्षांपासून कातकरी समाज घरकुलाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 06:28 IST

अर्ज धूळ खात पडून

रवींद्र साळवे

मोखाडा : केंद्र आणि राज्य सरकारने कोणतेही कुटुंब बेघर राहू नये, यासाठी विविध घरकुल योजना राबविल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी, कातकरी जमातीला प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेत प्राधान्य मिळत नसल्याने, घरकुलासाठी फेऱ्या मारून थकलेल्या, कुडाच्या आणि गवताच्या छप्पराखाली राहणाºया आदिवासींवर ‘कुणी घर देता का घर’ म्हणण्याची वेळ आली आहे.

आदिवासींसाठी केंद्र सरकारने विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत शबरी घरकूल योजनेवर आधारित घरकूल योजना सुरू केली आहे. दोन वर्षांपासून कातकरी जमातीच्या शेकडो लाभार्थ्यांनी घरकुलाच्या मागणीचे अर्ज आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे केले आहेत. या अर्जाची पडताळणी तसेच प्रत्यक्ष पाहणी करून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आदिवासी विकास प्रकल्पाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. मात्र, अद्याप हे अर्ज धूळ खात पडून आहेत.

आदिवासी जमाती मध्ये सर्वात मागासलेला समाज म्हणून ( कातकरी जमात ओळखली जाते. या जमातीतील ९० टक्के कुटूंबे भूमीहीन आहेत. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी ही कुटुंबे खरीप हंगाम संपताच, स्थानिक ठिकाणी रोजगार न मिळाल्यास स्थलांतरित होतात. यातील बहुसंख्य कुटुंबांना स्वत:चे हक्काचे घर नाही. ही परिस्थिती बदलावी यासाठी पंतप्रधान आवास योजना आणि शबरी घरकूल योजनेसह, आदिवासी विकास विभागाकडून केंद्र शासनाच्या निधीची केवळ आदिम जमातीसाठी घरकुल योजना सुरू केली आहे.दरम्यान, घरकुल मिळावे म्हणून जव्हार, मोखाडा, विक्र मगड तालुक्यातील सुमारे २०३ कुटूंबांनी २०१५ - १६ आणि २०१७ मध्ये जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे घरकुलाची मागणी केली आहे. मात्र, यामधील जव्हार- ५१, मोखाडा - ३१, विक्र मगड - ५१, आणि वाडा- ४१ असे एकूण १७५ जण कुटूंब पडताळणीनंतर पात्र ठरले आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही दोन वर्ष उलटूनही त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणी जेवढे अर्ज डहाणू प्रकल्प कार्यालयाकडे पाठवण्यात आले ते सर्व पुढे पाठवण्यात आल्याचे डहाणू आदिवासी प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले आहे.मोखाड्यातील आम्ही ३१ घरकुल लाभार्थी दोन वर्षापासून जव्हार आणि डहाणू आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात खेपा मारत आहोत. मात्र, आम्हाला केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही नाही. आम्ही आमचे आयुष्य झोपडीतच काढायचे का?- देवचंद जाधव, शिरसगाव, मोखाडा, प्रतिक्षेतील लाभार्थीघरकुल योजनेचे अधिकार डहाणू प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहेत. २०१७ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. आम्ही सर्व पात्र लाभार्थी डहाणूला पाठवले आहेत. - एन.एल. चौधरी, लिपीक घरकुल विभाग प्रकल्प कार्यालय जव्हारकातकरी समाजाला दिल्या जाणाºया घराला घरकूल योजनेंतर्गत आदिवासी विकास विभागाकडून मंजुरी दिली जाते. पंचायत समितीद्वारे आदिम लाभार्थीकडून घरकुलाची मागणी केली जाते. त्याची पडताळणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निरीक्षकाने केल्यानंतर पात्र लाभार्थी निवडले जातात. तर या योजनेची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून केली जाते.कोट्यवधींचे बजेट केवळ कागदावरच?यंदा ७ हजार १९१ कोटींचे आदिवासी विकासाचे बजेट आहे. त्यात केंद्र शासनाकडून विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत वेगळा अतिरिक्त निधी आदिवासी विकासासाठी दिला जातो. असे असतानाही कातकरी समाजासाठी मागणी करूनही दोन वर्षे घरकुलांना मंजुरी का मिळाली नाही, अशी विचारणा वंचित घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत ९० टक्क्यांहून अधिक आदिवासी लोकसंख्या आहे. त्यामध्ये जव्हार - १ लाख २८ हजार, मोखाडा - ७७ हजार, विक्र मगड - १ लाख २७ हजार, तर वाडा तालुक्यात १ लाख ०२ हजार इतक्या मोठ्या संख्येने आदिवासी वस्ती आहे. यामध्ये कातकरींची संख्याही लक्षणीय आहे. असे असतानाही प्रशासनाकडून त्यास मंजुरी दिली जात नाही.

टॅग्स :Homeघर