शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 11:21 PM

जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले.

- हुसेन मेमनजव्हार : गळतीमुळे चर्चेत असलेले पूर्वी ठाणे जिल्ह्यात असलेले आणि आता पालघर जिल्ह्याचा भाग असलेला जव्हार तालुक्यातील खडखड धरण हे बांधल्यापासून गळत असल्यामुळे सतत चर्चेत आहे. नुकतेच रत्नागिरी येथील तिवरे धरण निकृष्टकामामुळे फुटलेव त्यात कित्येक निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तसेच खडखड येथील डोमीहीरा हे धरणही फुटते की काय? असा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी असा पाऊस पडतो, मात्र आज ही जव्हार तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना पिण्याचे पाणी दूरवरून नेण्याची कसरत करावी लागते. येथे नेहमी पाणी टंचाई भासत असते. यामुळे शासन दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून विहीर, बंधारे, नळ-पाणी योजना तयार करून देत आहे.जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले. धरण २०१२ मध्ये ९५ टक्केपूर्ण झाले. मात्र धरणाची भिंत ठिकाणी लीक असल्याचे त्यात पाणी भरताच समजले, यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. याला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगमताने झालेले निकृष्ट काम जबाबदार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला होता. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.आम्ही इतकी वर्षे जीव मुठीत धरूनच जगतो आहोत- याबाबत कित्येकवेळा तक्र ारी झाल्यावर ठेकेदाराला पुन्हा दुरूस्ती करावी लागली. मात्र गळती अद्याप थांबलेली नाही, निकृष्ट मालाचा वापर करून बांधलेल्या बंधारा कसा टिकेल? त्यामुळे कितीही वेळा गळती काढली तरी गळती थांबणार का? स्थानिक रहिवासी आपले जीव मुठीत घेऊनच इतके वर्ष वास्तव करीत आहेत.- डॅम बांधल्यापासून आम्ही भयभीतच आहोत, निकृष्ट बांधण्यात आलेल्या डॅमला पहिल्या वर्षापासून लागलेली गळती आहे, त्यामुळे आम्ही नेहमी डॅम फुटून एखादी दुर्देवी घटना घडेल की काय या दहशतीखाली जगतो आहोत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार