शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वसईत खताची टंचाई, शेतकरी त्रस्त, कृषीखाते सुस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 12:34 AM

वसई तालुक्याच्या पूर्व भागातील भात शेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली असून त्यांना पहिली मात्रा लागणा-या खतांमधील युरिया कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध नसल्याने शेतक-यांमध्ये रोष पसरला आहे.

पारोळ : वसईत खत टंचाई निर्माण झाली असून पडणाऱ्या पावसात भातरोपांची वाढ होण्यासाठी खताची मात्रा देणे आवश्यक असते. पण खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून खत लवकर उपलब्ध व्हावे, अशी मागणी त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.वसई तालुक्याच्या पूर्व भागातील भात शेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली असून त्यांना पहिली मात्रा लागणा-या खतांमधील युरिया कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध नसल्याने शेतक-यांमध्ये रोष पसरला आहे. एक तर पाऊस उशिरा सुरु झाला. त्यात कशाबशा पेरण्या आटोपल्या. त्यांची रोपे आता शेतात डोलू लागली असून काही ठिकाणी वीतभर वाढ झालेली आहे. अशावेळी रोपांना वाढीसाठी अत्यंत आवश्यक असणारे युरिया हे खत योग्य वेळी दिले गेले नाही तर पुढील येणाºया भात पिकावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे शेतकरी सांगत आहेत . मागील गुरूवारपासून बरसणाºया वरूणराजाने काहीशी उसंत घेतल्याने. दिवसभर मिळालेल्या पावसाच्या उघडीपीमुळे जोरदार पावसामुळे खोळंबून राहिलेली शेतीची कामे करण्याची लगबग शेतकºयांमध्ये दिसून येत आहे. या कामाचाच एक भाग म्हणजे वाढ होत असलेल्या रोपांना अधिक सक्षम करण्यासाठी युरियाची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी लागते. मात्र नेमक्यावेळी युरिया मिळत नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितल की, आम्ही मिळणाºया खतासाठी शुल्क केव्हाच भरले असून अजूनही फर्टिलायझरकडून आम्हाला पुरवठा करण्यात आलेला नाही. तर तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .

टॅग्स :Vasai Virarवसई विरार