शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

चुकीच्या वीजबिलांमुळे वसईकरांची होते लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:51 IST

महावितरण म्हणते, विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमीटर सदोष

नालासोपारा : उशीराने येत असलेली वीजदेयके व अवाजवी देयकांमूळे वसईकर पुरते बेजार झालेले आहेत. सदोष मीटर महावितरण बदलून देत नाही, मात्र वाढीव आलेली बिले अगोदर भरा व मग तक्रार करा असे म्हणणाऱ्या महावितरण विरोधात आता नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.महावितरणचे राज्यभरात ९ झोन असून वसई -विरार शहराचा कल्याण झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वसईत एकूण दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पुर्व व पश्चिम तसेच वाडा यांचा समावेश होतो. तर दुसºया नालासोपारा विभागात नालासोपारा पूर्व, पश्चिम आणि आचोळा यांचा समावेश होतो. वसई विभागात दोन लाख चाळीस हजार ग्राहक तर नालासोपारा विभागात सव्वा पाच लाख ग्राहक आहेत. यातील हजारो ग्राहक वीज मीटर सदोष असण्याची व वाढीव वीजबिले येत असल्याची तक्र ार वारंवार महावितरण कार्यालयात करीत असतात. केवळ विरारमध्येच १२ हजारांहून अधिक मीटर सदोष असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.वसई विरार शहरातील वीज ग्राहक सद्या भरमसाठ वाढीव वीज देयकांमूळे त्रस्त झालेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांना वापरापेक्षा अधिक वीज देयके येत असतात. त्यामूळे सर्वसामान्य ग्राहक हवालिदल झाला आहे. सदोष मीटरमुळे ही वाढीव व भरमसाठ वीज देयके ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. याबाबत माहिती अधिकाराखाली चरण भट यांनी शहरात सदोष वीज मीटर किती आहेत याबाबत माहिती मागवली असता, फक्त विरार शहरातील सदोष मीटरबाबतच्या आकड्यांची माहिती समोर आली आहे. २०१४ पासून अवाजवी वीज देयकांची समस्या सुरू आहे. महावितरणाने दिलेल्या माहितीनुसार विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमिटर सदोष असल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ या बारा हजार ग्राहकांना चुकीची वीज देयके महावितरणाकडून पाठवण्यात येत आहेत. ही आकडेवारी फक्त विरार शहराची असून नालासोपारा व वसई शहरातील लाखो वीज ग्राहकांचीही हिच समस्या आहे. ज्या कंपनीची ही सदोष मीटर लावलेली आहेत त्यांना नियमानुसार दंड आकारणे आवश्यक आहे. मात्र, तरीही महावितरणाने कुठलाही दंड कंपनीला आकारलेला नाही. उलट ग्राहकांना अवाजवी बील भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वीज मीटर उपलब्धतेनुसार बदलण्याचे काम सुरू आहे. एवढेच त्रोटक उत्तर महावितरणाच्या अधिकाºयांकडून देण्यात येते.ग्राहकांना कोट्यवधीचा फटकामागणी नसतानाही २०१३-१४ मध्ये ग्राहकांची जुनी वीज मीटर बदलून फ्लॅश कंपनीची चार लाख मीटर बसविण्यात आले होती. तक्र ारी वाढल्यानंतर दुसºया कंपनीची मिटर बदलण्यात येऊन पुन्हा लावण्यात आली. मात्र परिस्थिती बदलली नाही.या सर्व कंपन्यांचे निर्माते एकच असून वेगवेगळ्या नावाने ते उत्पादन करत सदोष मीटर बसवत होते. अवाजवी वीज बिलांचा मुद्दा पेटल्यावर २६ जुलै २०१६ रोजी अधिक्षक अभीयंत्यांनी वीजमीटर बदलली जातील असे आश्वासन दिले होते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणVasai Virarवसई विरार