शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

चुकीच्या वीजबिलांमुळे वसईकरांची होते लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:51 IST

महावितरण म्हणते, विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमीटर सदोष

नालासोपारा : उशीराने येत असलेली वीजदेयके व अवाजवी देयकांमूळे वसईकर पुरते बेजार झालेले आहेत. सदोष मीटर महावितरण बदलून देत नाही, मात्र वाढीव आलेली बिले अगोदर भरा व मग तक्रार करा असे म्हणणाऱ्या महावितरण विरोधात आता नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.महावितरणचे राज्यभरात ९ झोन असून वसई -विरार शहराचा कल्याण झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वसईत एकूण दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पुर्व व पश्चिम तसेच वाडा यांचा समावेश होतो. तर दुसºया नालासोपारा विभागात नालासोपारा पूर्व, पश्चिम आणि आचोळा यांचा समावेश होतो. वसई विभागात दोन लाख चाळीस हजार ग्राहक तर नालासोपारा विभागात सव्वा पाच लाख ग्राहक आहेत. यातील हजारो ग्राहक वीज मीटर सदोष असण्याची व वाढीव वीजबिले येत असल्याची तक्र ार वारंवार महावितरण कार्यालयात करीत असतात. केवळ विरारमध्येच १२ हजारांहून अधिक मीटर सदोष असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.वसई विरार शहरातील वीज ग्राहक सद्या भरमसाठ वाढीव वीज देयकांमूळे त्रस्त झालेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांना वापरापेक्षा अधिक वीज देयके येत असतात. त्यामूळे सर्वसामान्य ग्राहक हवालिदल झाला आहे. सदोष मीटरमुळे ही वाढीव व भरमसाठ वीज देयके ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. याबाबत माहिती अधिकाराखाली चरण भट यांनी शहरात सदोष वीज मीटर किती आहेत याबाबत माहिती मागवली असता, फक्त विरार शहरातील सदोष मीटरबाबतच्या आकड्यांची माहिती समोर आली आहे. २०१४ पासून अवाजवी वीज देयकांची समस्या सुरू आहे. महावितरणाने दिलेल्या माहितीनुसार विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमिटर सदोष असल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ या बारा हजार ग्राहकांना चुकीची वीज देयके महावितरणाकडून पाठवण्यात येत आहेत. ही आकडेवारी फक्त विरार शहराची असून नालासोपारा व वसई शहरातील लाखो वीज ग्राहकांचीही हिच समस्या आहे. ज्या कंपनीची ही सदोष मीटर लावलेली आहेत त्यांना नियमानुसार दंड आकारणे आवश्यक आहे. मात्र, तरीही महावितरणाने कुठलाही दंड कंपनीला आकारलेला नाही. उलट ग्राहकांना अवाजवी बील भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वीज मीटर उपलब्धतेनुसार बदलण्याचे काम सुरू आहे. एवढेच त्रोटक उत्तर महावितरणाच्या अधिकाºयांकडून देण्यात येते.ग्राहकांना कोट्यवधीचा फटकामागणी नसतानाही २०१३-१४ मध्ये ग्राहकांची जुनी वीज मीटर बदलून फ्लॅश कंपनीची चार लाख मीटर बसविण्यात आले होती. तक्र ारी वाढल्यानंतर दुसºया कंपनीची मिटर बदलण्यात येऊन पुन्हा लावण्यात आली. मात्र परिस्थिती बदलली नाही.या सर्व कंपन्यांचे निर्माते एकच असून वेगवेगळ्या नावाने ते उत्पादन करत सदोष मीटर बसवत होते. अवाजवी वीज बिलांचा मुद्दा पेटल्यावर २६ जुलै २०१६ रोजी अधिक्षक अभीयंत्यांनी वीजमीटर बदलली जातील असे आश्वासन दिले होते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणVasai Virarवसई विरार