शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

चुकीच्या वीजबिलांमुळे वसईकरांची होते लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:51 IST

महावितरण म्हणते, विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमीटर सदोष

नालासोपारा : उशीराने येत असलेली वीजदेयके व अवाजवी देयकांमूळे वसईकर पुरते बेजार झालेले आहेत. सदोष मीटर महावितरण बदलून देत नाही, मात्र वाढीव आलेली बिले अगोदर भरा व मग तक्रार करा असे म्हणणाऱ्या महावितरण विरोधात आता नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.महावितरणचे राज्यभरात ९ झोन असून वसई -विरार शहराचा कल्याण झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वसईत एकूण दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पुर्व व पश्चिम तसेच वाडा यांचा समावेश होतो. तर दुसºया नालासोपारा विभागात नालासोपारा पूर्व, पश्चिम आणि आचोळा यांचा समावेश होतो. वसई विभागात दोन लाख चाळीस हजार ग्राहक तर नालासोपारा विभागात सव्वा पाच लाख ग्राहक आहेत. यातील हजारो ग्राहक वीज मीटर सदोष असण्याची व वाढीव वीजबिले येत असल्याची तक्र ार वारंवार महावितरण कार्यालयात करीत असतात. केवळ विरारमध्येच १२ हजारांहून अधिक मीटर सदोष असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.वसई विरार शहरातील वीज ग्राहक सद्या भरमसाठ वाढीव वीज देयकांमूळे त्रस्त झालेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांना वापरापेक्षा अधिक वीज देयके येत असतात. त्यामूळे सर्वसामान्य ग्राहक हवालिदल झाला आहे. सदोष मीटरमुळे ही वाढीव व भरमसाठ वीज देयके ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. याबाबत माहिती अधिकाराखाली चरण भट यांनी शहरात सदोष वीज मीटर किती आहेत याबाबत माहिती मागवली असता, फक्त विरार शहरातील सदोष मीटरबाबतच्या आकड्यांची माहिती समोर आली आहे. २०१४ पासून अवाजवी वीज देयकांची समस्या सुरू आहे. महावितरणाने दिलेल्या माहितीनुसार विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमिटर सदोष असल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ या बारा हजार ग्राहकांना चुकीची वीज देयके महावितरणाकडून पाठवण्यात येत आहेत. ही आकडेवारी फक्त विरार शहराची असून नालासोपारा व वसई शहरातील लाखो वीज ग्राहकांचीही हिच समस्या आहे. ज्या कंपनीची ही सदोष मीटर लावलेली आहेत त्यांना नियमानुसार दंड आकारणे आवश्यक आहे. मात्र, तरीही महावितरणाने कुठलाही दंड कंपनीला आकारलेला नाही. उलट ग्राहकांना अवाजवी बील भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वीज मीटर उपलब्धतेनुसार बदलण्याचे काम सुरू आहे. एवढेच त्रोटक उत्तर महावितरणाच्या अधिकाºयांकडून देण्यात येते.ग्राहकांना कोट्यवधीचा फटकामागणी नसतानाही २०१३-१४ मध्ये ग्राहकांची जुनी वीज मीटर बदलून फ्लॅश कंपनीची चार लाख मीटर बसविण्यात आले होती. तक्र ारी वाढल्यानंतर दुसºया कंपनीची मिटर बदलण्यात येऊन पुन्हा लावण्यात आली. मात्र परिस्थिती बदलली नाही.या सर्व कंपन्यांचे निर्माते एकच असून वेगवेगळ्या नावाने ते उत्पादन करत सदोष मीटर बसवत होते. अवाजवी वीज बिलांचा मुद्दा पेटल्यावर २६ जुलै २०१६ रोजी अधिक्षक अभीयंत्यांनी वीजमीटर बदलली जातील असे आश्वासन दिले होते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणVasai Virarवसई विरार