शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

वसईत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा; शुद्धतेचे निकष पायदळी, प्रशासन गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 2:54 AM

पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

- सुनिल घरतपारोळ : पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.वसई तालुक्यात कामण, सातिवली, धानीव, पेल्हार, वसई फाटा, बावखळ, विरारफाटा, शिरसाड अशा अनेक भागात बाटली बंद पाण्याचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात पाण्याची शुध्दता तपासण्याचे यंत्रच नाहीत. शुध्दतेसाठी पाण्यावर १४ प्रक्रीया व २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियम या प्रकल्पात पायदळी तुडवला जात आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभाग उदासीन असल्याने वसईमध्ये बाटली बंद धंद्याला चांगलाच जोर चढला आहे.अशुद्ध पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी डीसल आॅक्सीजन, हार्डनेस पी एच, ओड्यूर कलर, जिवाणूची स्थिती, पाण्यातील जडपणा आदी प्रकारच्या चाचण्या पाणी शुद्ध करण्यासाठी गरजेचे असते. तसेच, या प्रकल्पात प्रयोगशाळा हाताळणारा फार्मासिस्ट असणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे पाण्यातील क्षार, विषाणू, क्लोराइडस घातक द्रव्य बाजूला काढण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात असल्याचे दिसून येत आहे.अशा प्रकारे हा गोरखधंदा करतांना ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बाटलीचे पॅकिंग चांगल्या दर्जाचे केले जाते. ग्राहक ही पाण्याची शुद्धता न तपासता चांगला दर देऊन ते विकत घेतात.काही ठिकाणी तर बोअरवेल व नळाचे पाणी देखील बाटल्यांमध्ये भरून विकण्यात येत आहे. शुद्धतेच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा सुरु आहे.बक्कळ पैसे घेऊन अशुद्ध पाणी ग्राहकांना विकणे हा गुन्हाच आहे. वास्तविक पाणी प्रकल्पामध्ये पाच रुपयात मिळणारे एक लिटर पाणी बाजारात २० रुपयांना विकले जाते ही फसवणूक आहे. एफडीएकडून पाण्याची शुद्धता व किंमत यावर नियंत्रण असायला हवे.- राम पाटील, ग्राहक संरक्षण परिषद, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार