शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

वसईकरांची कालोबा नदी सततच्या प्रदूषणाने गुदमरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:53 IST

नदी ही प्राणवाहिनी असून अनेक सजीवांची आधारशिला असते.

अजय महाडीक  मुंबई : नदी ही प्राणवाहिनी असून अनेक सजीवांची आधारशिला असते. मात्र, मुंबईतील मिठीपाठोपाठ वसई तालुक्यातील कालोबा नदीपात्राची कामण-चिंचोटी परिसरात पार गटारगंगा झाल्याने वसईकरांची कालोबा मैली म्हणण्याची पाळी आली आहे. येथील ६७ गायीम्हशींच्या गोठ्यांतील मलमूत्र व वेस्टेजमुळे नदीपात्रामध्ये एकेकाळी असणाऱ्या माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. या ठिकाणी मिळणाºया निवठे व कोळंबी या प्रजाती आठ ते दहा वर्षांपूर्वीच येथून गायब झाल्याचे कामण गावातील ग्रामस्थ सांगतात.या मलमूत्रामुळे येथील नदीकिनाºयावरील खंडीपाडा हे गाव विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे. साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या कामण गावातही मलेरिया, टायफॉइडची साथ नेहमीचीच असल्याचे गावकरी सांगतात. येथे असणाºया कामण आश्रमशाळा व वसतिगृहातील ५५० विद्यार्थ्यांना याची बाधा होत असल्याचे व्यवस्थापक बागुलसर सांगतात. न्याहारीला व रात्री जेवताना खत प्रकल्पावरील असंख्य पाखरे अन्नात पडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार असून त्यामुळे उलटी व हगवण असे आजार होत आहेत. या त्रासामुळे अनेक हॉटेल व ढाबेवाल्यांना आपले व्यवसाय गुंडाळावे लागले असल्याचे मेघनाथ भगत व कमलाकर कामणकर हे ग्रामस्थ सांगतात.शेणाची वाहतूक करताना बंदिस्त वाहनातून होणे अपेक्षित आहे. तसेच रस्त्याशेजारचे खत प्रकल्प प्रदूषण नियंत्रण बोर्डाला मंजूर नाहीत. याप्रक रणी वसई-विरार शहर महानगरपालिकेने गोठ्यातील सांडपाणी पक्क्या गटारात जाईल, अशी व्यवस्था करावी. शौच खड्डे खोदून त्यासाठी उतार देऊन पक्के सिमेंटचे नाले बांधावे. मलमूत्रावर प्रक्रिया करणारे गोबर गॅस प्रकल्प तयार करावेत. कंपोस्ट खड्डे खोदावेत. स्लज व डाइंग बेड बांधावेत तसेच चिंचोटी-कामण येथील रहिवाशांना त्रास होऊ नये, म्हणून रस्त्याच्या कडेला शेण सुकवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गंभीर इशारा देणाºया नोटीस तब्बल ६७ जणांना दिल्या आहेत. मात्र, नोटीस देण्याचा हा प्रकार नेहमीचा असल्याने त्याचा कोणताही परिणाम गोठेवाल्यांवर होत नाही.कामण-चिंचोटी व तुंगारेश्वर अभयारण्यात तबेलावाल्यांकडून शेण सुकवले जाते. त्यासाठी राखीव असणाºया जमिनीवर आतापर्यंत प्रचंड वृक्षतोड झाली आहे. यात नैसर्गिक वनसंरक्षक असणाºया तिवरांचा मोठा बळी गेला असून वनस्पती नामशेष झाल्यात. ही झाडे तोडल्याची तक्रार ग्रामस्थ करीत असल्याने तबेलेवाले त्यावर विष वा, केमिकलची फवारणी करतात, असे भगवान पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी गोखिवरे व मांडवी रेंजकडून कागद रंगवले जात असून वनअधिकाºयांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप गावकºयांनी केला.१कामण व चिंचोटी रस्त्यालगत अनधिकृतरीत्या उभ्या राहिलेल्या खत प्रकल्पांमुळे शेकडो एकर वनजमीनही बाधित झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुकणारे शेण व शेणाची ही वाहतूक उघड्या ट्रक व ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे होत असते. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर शेणाचा सडा पडत असल्याने येथे दुचाकी व रिक्षांच्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. २रस्त्याच्या आजूबाजूची जमीन वनविभागाची असून गत दोन-तीन महिन्यांपासून तिचा चार्ज मांडवी रेंजकडे आहे. मात्र, त्याअगोदर ही जमीन गोखिवरे रेंजच्या अखत्यारित होती. याप्रकरणी मांडवी रेंजचे आरएफओ चंद्रशेखर गावण यांनी पुरेशे मनुष्यबळ नसून कारवाईसाठी वेळेवर पुरेसे पोलीस संरक्षण मिळत नसल्याचे कारण पुढे केले आहे. ३या संदर्भामध्ये कामणवासियांनी भजनलाल डेअरी वर आरोप केले असले तरी नारायण रोहरा यांनी आॅल इज वेल असल्याचे सांगितले. तर त्यांचे पूत्र संजय रोहरा यांनी महानगरपालिकेकडून नोटीस दिल्या जातात पण आम्हाला सुविधा मिळतात का? असा सवाल केला. या भागातील मलकानी कंपाऊडमध्ये असणाºया ४५ म्हशींच्या गोठ्यातून मोठ्या प्रमाणात मल-मुत्र उघड्यावर विसर्जित होत असल्याचे पाहणीमध्ये आढळले.