शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

वसईकरांची कालोबा नदी सततच्या प्रदूषणाने गुदमरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:53 IST

नदी ही प्राणवाहिनी असून अनेक सजीवांची आधारशिला असते.

अजय महाडीक  मुंबई : नदी ही प्राणवाहिनी असून अनेक सजीवांची आधारशिला असते. मात्र, मुंबईतील मिठीपाठोपाठ वसई तालुक्यातील कालोबा नदीपात्राची कामण-चिंचोटी परिसरात पार गटारगंगा झाल्याने वसईकरांची कालोबा मैली म्हणण्याची पाळी आली आहे. येथील ६७ गायीम्हशींच्या गोठ्यांतील मलमूत्र व वेस्टेजमुळे नदीपात्रामध्ये एकेकाळी असणाऱ्या माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. या ठिकाणी मिळणाºया निवठे व कोळंबी या प्रजाती आठ ते दहा वर्षांपूर्वीच येथून गायब झाल्याचे कामण गावातील ग्रामस्थ सांगतात.या मलमूत्रामुळे येथील नदीकिनाºयावरील खंडीपाडा हे गाव विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे. साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या कामण गावातही मलेरिया, टायफॉइडची साथ नेहमीचीच असल्याचे गावकरी सांगतात. येथे असणाºया कामण आश्रमशाळा व वसतिगृहातील ५५० विद्यार्थ्यांना याची बाधा होत असल्याचे व्यवस्थापक बागुलसर सांगतात. न्याहारीला व रात्री जेवताना खत प्रकल्पावरील असंख्य पाखरे अन्नात पडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार असून त्यामुळे उलटी व हगवण असे आजार होत आहेत. या त्रासामुळे अनेक हॉटेल व ढाबेवाल्यांना आपले व्यवसाय गुंडाळावे लागले असल्याचे मेघनाथ भगत व कमलाकर कामणकर हे ग्रामस्थ सांगतात.शेणाची वाहतूक करताना बंदिस्त वाहनातून होणे अपेक्षित आहे. तसेच रस्त्याशेजारचे खत प्रकल्प प्रदूषण नियंत्रण बोर्डाला मंजूर नाहीत. याप्रक रणी वसई-विरार शहर महानगरपालिकेने गोठ्यातील सांडपाणी पक्क्या गटारात जाईल, अशी व्यवस्था करावी. शौच खड्डे खोदून त्यासाठी उतार देऊन पक्के सिमेंटचे नाले बांधावे. मलमूत्रावर प्रक्रिया करणारे गोबर गॅस प्रकल्प तयार करावेत. कंपोस्ट खड्डे खोदावेत. स्लज व डाइंग बेड बांधावेत तसेच चिंचोटी-कामण येथील रहिवाशांना त्रास होऊ नये, म्हणून रस्त्याच्या कडेला शेण सुकवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गंभीर इशारा देणाºया नोटीस तब्बल ६७ जणांना दिल्या आहेत. मात्र, नोटीस देण्याचा हा प्रकार नेहमीचा असल्याने त्याचा कोणताही परिणाम गोठेवाल्यांवर होत नाही.कामण-चिंचोटी व तुंगारेश्वर अभयारण्यात तबेलावाल्यांकडून शेण सुकवले जाते. त्यासाठी राखीव असणाºया जमिनीवर आतापर्यंत प्रचंड वृक्षतोड झाली आहे. यात नैसर्गिक वनसंरक्षक असणाºया तिवरांचा मोठा बळी गेला असून वनस्पती नामशेष झाल्यात. ही झाडे तोडल्याची तक्रार ग्रामस्थ करीत असल्याने तबेलेवाले त्यावर विष वा, केमिकलची फवारणी करतात, असे भगवान पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी गोखिवरे व मांडवी रेंजकडून कागद रंगवले जात असून वनअधिकाºयांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप गावकºयांनी केला.१कामण व चिंचोटी रस्त्यालगत अनधिकृतरीत्या उभ्या राहिलेल्या खत प्रकल्पांमुळे शेकडो एकर वनजमीनही बाधित झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुकणारे शेण व शेणाची ही वाहतूक उघड्या ट्रक व ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे होत असते. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर शेणाचा सडा पडत असल्याने येथे दुचाकी व रिक्षांच्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. २रस्त्याच्या आजूबाजूची जमीन वनविभागाची असून गत दोन-तीन महिन्यांपासून तिचा चार्ज मांडवी रेंजकडे आहे. मात्र, त्याअगोदर ही जमीन गोखिवरे रेंजच्या अखत्यारित होती. याप्रकरणी मांडवी रेंजचे आरएफओ चंद्रशेखर गावण यांनी पुरेशे मनुष्यबळ नसून कारवाईसाठी वेळेवर पुरेसे पोलीस संरक्षण मिळत नसल्याचे कारण पुढे केले आहे. ३या संदर्भामध्ये कामणवासियांनी भजनलाल डेअरी वर आरोप केले असले तरी नारायण रोहरा यांनी आॅल इज वेल असल्याचे सांगितले. तर त्यांचे पूत्र संजय रोहरा यांनी महानगरपालिकेकडून नोटीस दिल्या जातात पण आम्हाला सुविधा मिळतात का? असा सवाल केला. या भागातील मलकानी कंपाऊडमध्ये असणाºया ४५ म्हशींच्या गोठ्यातून मोठ्या प्रमाणात मल-मुत्र उघड्यावर विसर्जित होत असल्याचे पाहणीमध्ये आढळले.