शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

हिंबटपाड्यातील आदिवासींची जीव धोक्यात घालून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:23 PM

मोखाडा सा.बां. विभागाचा अनागोंदी कारभार : पुलाचे काम नऊ महिन्यांपासून बंद

रवींद्र साळवे मोखाडा : तालुका मुख्यालयापासून अवघ्या ७ किमी अंतरावर चास ग्रामपंचायत हद्दीत नदीच्या पलीकडे २०० आदिवासी लोकवस्तीचा ‘हिबंटपाडा’ वसलेला आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही शासन येथील नदीवर पूल बांधू शकले नसल्याने येथील आदिवासींना जीव धोक्यात घालून नदीच्या प्रवाहातून ये-जा करावी लागते आहे.

पावसाळ्यात येथील आदिवासींचा तालुक्याशी संपर्क तुटतो. यामुळे येथील शाळादेखील बंद रहातात. परिणामी, विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. पावसाळ्यात विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागते. तशी समस्या उद्भवल्यास जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागतो किंवा डोली करून नदीच्या काठाने ५ ते ६ कि.मी. अंतरावर रु ग्णांना न्यावे लागते. नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी असल्यास काही वर्षांपूर्वी आरोहण संस्थेने बांधलेल्या बंधाऱ्यावरून ये-जा करता येते. मात्र, कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यास नदीतूनच ये-जा करावी लागते. अशावेळी एखादी दुर्घटना घडण्याची देखील शक्यता असते. पांडू रेवजी मोकाशी (५५) गंगाराम मºया बरफ ( ४५) आणि पांडू गंगा मोंढे (६५) हे तीन आदिवासी अशाच प्रकारे नदी पार करताना तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत नदीच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. ‘आम्हाला हक्काचा पूल मिळावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी कंबर कसली तसेच अनेकदा मोर्चे काढले, आंदोलने केली. याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या प्रयत्नातून आदिवासी विभागाचा निधी उपलब्ध करून २०१८ मध्ये १ कोटी रुपये मंजुरी दिली. सवरा यांनी एप्रिल २०१८ मध्ये या पुलाचे उद्घाटन करून मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले. सुरुवातीला काही महिने हे काम सुरळीत सुरू होते. पुढे मात्र हे काम ढेपाळले. गावकऱ्यांनी वारंवार ठेकेदाराला व अधिकाºयांना विनवण्या करूनही धीम्या गतीने सुरू असलेले हे काम रखडले आहे. ९ महिन्यांपासून तर हे काम कायमचे बंद आहे. थोडक्यात, शासनाच्या उदासीनतेमुळे येथील आदिवासींची पायपीट कायम आहे. यामुळे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी विरोधात येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

याबाबत आर.के.सावंत एजन्सीचे ठेकेदार सुनील पाटील यांना विचारले असता, या कामाला २२ मार्च २०१८ मध्ये मंजुरी मिळाली असून लगेच एप्रिलमध्ये काम सुरू केले. यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे काम बंद ठेवण्यात आले. मार्चनंतर या कामाचे बिल न मिळाल्याने पुढे हे काम करता आले नाही. झालेल्या कामाचे देयक जव्हार बांधकाम विभागात प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, कामात वेळ काढून अंदाजपत्रक रक्कम वाढवण्यासाठी हा बांधकाम विभागाचा खटाटोप असल्याचा आरोप जिल्हा परिषद गटनेते प्रकाश निकम यांनी केला आहे.

हा पूल लवकर तयार होईल, असे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा आणि ठेकेदारांनी आम्हाला दिले होते. सुरवातीला काही महिने काम सुरू होते. यानंतर ते कायमचे बंद झाले. कामाबाबत फक्त आश्वासने दिली जातात. परंतु प्रत्यक्षात काम सुरू केले जात नाही. त्यामुळे येथे पेशंटला ५ ते ६ कि.मी. अंतरावर डोली करून दवाखान्यात न्यावे लागते.- मनोहर गणपत गोडे, ग्रामपंचायत सदस्य, चास

आम्हाला पुलाची अडचण असल्याने मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत आहे. पाऊस असल्यास आठ आठ दिवस शाळेत कॉलेजला जात येत नाही पुलाचे उद्घाटनाच्या वेळेस सांगितले जात होते तुमची अडचण विचारात घेता लवकरात लवकर तुमचा पूल होईल. परंतु कसलं काय गेल्या नऊ महिन्यापासून हे काम बंदच आहे. आमची ही समस्या सोडवण्यासाठी अधिकारी, पुढारी कुणीच लक्ष देत नाहीत.-तुकाराम मनोहर गोडे, स्थानिक आदिवासी तरुण

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना