शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

अतिदुर्गम भागातील आदिवासी समाज आजही उपेक्षित; शासन-प्रशासन निष्क्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:06 AM

धड रस्ते नाही की ॲम्ब्युलन्सची सोय नाही

हुसेन मेमनजव्हार : जव्हार व मोखाडा हे दोन्ही तालुके अतिदुर्गम भागातील आदिवासी तालुके म्हणून ओळखले जातात. या दोन्ही तालुक्यांना कुपोषण व भूकबळी या दोन समस्या सतत भेडसावत आहेत. मागील आठवड्यात या परिसरातील दोन महिलांना आपली नवजात बालके गमवावी लागली, तर एका महिलेचा मृत्यू झाला, दुसऱ्या महिलेला उपचार मिळाल्याने सुदैवाने तिची प्रकृती स्थिर आहे.या दोन घटनांनी प्रस्थापित व्यवस्थेची व लोकप्रतिनिधींची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. धड रस्ते नाहीत, ॲम्ब्युलन्स नाही, अशा स्थितीत त्या गरोदर महिलेला डोलीतून नेण्यात येत असताना तिची प्रसूती झाली, पण नवजात बालकाचा मात्र मृत्यू झाला. मोखाडा व जव्हार या दोन तालुक्यांत आजवर शेकडो बालके मृत्युमुखी पडली, पण शासन व प्रशासन यांच्या निष्क्रियतेमुळे आजही हा भाग पिछाडीवर आहे.

वर्षाकाठी शेकडो कोटी रु. खर्च केल्याचे दाखवण्यात येते, पण तो खर्च कोणाच्या घशात जातो, याचा आजवर शोध लागला नाही व पुढेही लागणार नाही. लोकप्रतिनिधी मात्र कुटुंबीयांची भेट घेणे, सांत्वन करणे व त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणे, तात्पुरती मदत देणे, इ. इव्हेंट करण्यामध्ये धन्यता मानत असतात.

या परिसरातील कुपोषण व भूकबळी संपुष्टात आणू शकेल, असा हक्काचा आपला माणूस गेल्या ७३ वर्षांत या दुर्गम भागातील आदिवासी समाजाला कधी सापडलेलाच नाही. मात्र, यंदा आमदार सुनील भुसारा यांच्या नावाने एक चांगला नेता जनतेने निवडून दिला असल्याचा प्रतिक्रिया जनसामान्यांतून मिळत आहेत. एक वर्षाच्या कार्यकाळात आमदार भुसारा यांनी या भागात काही प्रमाणात बदल घडविण्यात यश प्राप्त केले आहे.

निधी गेला कुठे?पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्राबल्य लक्षात घेऊन सहा वर्षांपूर्वी शासनाने नव्याने निर्माण केलेल्या पालघर जिल्ह्याला आदिवासी दर्जा दिला. शासनाच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजजीवनात नव्याने उष:काल होईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक निधी विपुल प्रमाणात मिळाला, पण त्याचा विनियोग योग्य पद्धतीने झाला? नाही. उदंड योजना कार्यान्वित झाल्या. मोठ्या प्रमाणात निधीही खर्च झाला, पण तो कुठे झाला, त्याचा थांगपत्ता नाही.