शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

भूकंपाचे भय अजूनही उरावर, वैज्ञानिकांनी केली घटनास्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:20 IST

तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत.

- हुसेन मेमनजव्हार  -  तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत. भूगर्भ विभागामार्फत आलेल्या अहवालावरून योग्य उपाय योजना करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु जव्हार भागात वारंवार बसणाºया भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक घरांना तडे गेल्याचे पहावयास मिळत असून गावपाड्यातील अनेक घरातील लोकांनी भीती पोटी घर सोडून माळ रानात व शेतात स्थलांतर केले आहे.जव्हार तालुक्यातील वाळवंडा, चौक, पाथर्डी, कशिवली या भागातील घरांचे बसलेल्या हादर्यांनी छोटेमोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात असून येथील ग्रामस्थांनी तंबू ठोकण्यासाठी ताडपत्री मागवून तंबू ठोकून व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. तसेच या आठवड्यातच सरक्षित तंबू उभरु न देण्यात येतील असे जव्हारचे नायब निवासी तहसीदार सुयोग बेंद्रे यांनी सांगितले.जव्हार वाळवंडा चौक, येथील नागरिकांनी घाबरून जावू नये, तसेच भूकंपाची तीव्रता लक्षात घेता ती आता पर्यंत ३.१ ते ३.२ रिश्टर स्केल पर्यंत मोजण्यात आली असून त्या मानाने कमी असल्याचे सांगून लोकांनी कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये असे आवाहन प्रशासनाचे अधिकारी भूकंपतज्ञ (कुलाबा ) किरण नारखेडे यांनी केले आहे.वाळवंडा गावात याहूनही विदारक चित्र पाहायला मिळत असून भूकंपाच्या भीती पोटी गावातील ग्रामस्थ अक्षरश: शेतात किंवा माळ रानात राहत आहेत. एकीकडे नैसिर्गक आपत्तीची भीती तर दुसरीकडे जंगली प्राण्यासह, साप, विंचूमुळे जीव जाण्याचा भीतीने रात्र काढत आहेत. काहीतरी व्यवस्था होईल या आशेवर ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वावरत आहे. माळ रानात, शेतात झोपडीत जंगली प्राणी व विषारी प्राण्यांमूळ जीव गेल्यास याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे.तज्ज्ञाकडून भूकंपग्रस्त भागात पाहणी दोन महिने चालणार परीक्षणजव्हार तालुक्यातील शुक्रवारी या भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथून भूकंपमापक यंत्र घेऊन वैज्ञानिकांची टीम दाखल झाली होती. या भूकंप वैज्ञानिकांच्या टीमने शुक्र वारी या परिसराची पाहणी करण्यात आली.तसेच वाळवंडा, चौक या ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. तसेच या भागात दोन महिने राहून भूकंपाची तीव्रता किती आहे. तेही तपासले जाणार आहे.तसेच, या यंत्राचा आढावा घेवून, दोन महिने भूकंपाची तीव्रता किती आहे. हे सांगितले जाईल असे दिल्ली येथील सिसमोलॉजी वैज्ञानिक मंजितिसंग यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakeभूकंपVasai Virarवसई विरार