शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाचे भय अजूनही उरावर, वैज्ञानिकांनी केली घटनास्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:20 IST

तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत.

- हुसेन मेमनजव्हार  -  तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत. भूगर्भ विभागामार्फत आलेल्या अहवालावरून योग्य उपाय योजना करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु जव्हार भागात वारंवार बसणाºया भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक घरांना तडे गेल्याचे पहावयास मिळत असून गावपाड्यातील अनेक घरातील लोकांनी भीती पोटी घर सोडून माळ रानात व शेतात स्थलांतर केले आहे.जव्हार तालुक्यातील वाळवंडा, चौक, पाथर्डी, कशिवली या भागातील घरांचे बसलेल्या हादर्यांनी छोटेमोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात असून येथील ग्रामस्थांनी तंबू ठोकण्यासाठी ताडपत्री मागवून तंबू ठोकून व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. तसेच या आठवड्यातच सरक्षित तंबू उभरु न देण्यात येतील असे जव्हारचे नायब निवासी तहसीदार सुयोग बेंद्रे यांनी सांगितले.जव्हार वाळवंडा चौक, येथील नागरिकांनी घाबरून जावू नये, तसेच भूकंपाची तीव्रता लक्षात घेता ती आता पर्यंत ३.१ ते ३.२ रिश्टर स्केल पर्यंत मोजण्यात आली असून त्या मानाने कमी असल्याचे सांगून लोकांनी कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये असे आवाहन प्रशासनाचे अधिकारी भूकंपतज्ञ (कुलाबा ) किरण नारखेडे यांनी केले आहे.वाळवंडा गावात याहूनही विदारक चित्र पाहायला मिळत असून भूकंपाच्या भीती पोटी गावातील ग्रामस्थ अक्षरश: शेतात किंवा माळ रानात राहत आहेत. एकीकडे नैसिर्गक आपत्तीची भीती तर दुसरीकडे जंगली प्राण्यासह, साप, विंचूमुळे जीव जाण्याचा भीतीने रात्र काढत आहेत. काहीतरी व्यवस्था होईल या आशेवर ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वावरत आहे. माळ रानात, शेतात झोपडीत जंगली प्राणी व विषारी प्राण्यांमूळ जीव गेल्यास याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे.तज्ज्ञाकडून भूकंपग्रस्त भागात पाहणी दोन महिने चालणार परीक्षणजव्हार तालुक्यातील शुक्रवारी या भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथून भूकंपमापक यंत्र घेऊन वैज्ञानिकांची टीम दाखल झाली होती. या भूकंप वैज्ञानिकांच्या टीमने शुक्र वारी या परिसराची पाहणी करण्यात आली.तसेच वाळवंडा, चौक या ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. तसेच या भागात दोन महिने राहून भूकंपाची तीव्रता किती आहे. तेही तपासले जाणार आहे.तसेच, या यंत्राचा आढावा घेवून, दोन महिने भूकंपाची तीव्रता किती आहे. हे सांगितले जाईल असे दिल्ली येथील सिसमोलॉजी वैज्ञानिक मंजितिसंग यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakeभूकंपVasai Virarवसई विरार