शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी
2
"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
4
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
5
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
6
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
7
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
8
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
9
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
10
Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
11
जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!
12
बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
13
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
14
एका चुकीच्या क्लिकने 'आयुष्यभराची कमाई' साफ; सायबर भामट्यांनी चलानच्या नावाखाली लुटले ३.६ लाख
15
देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू 
16
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
17
Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
बजाज-अलायन्झचा २४ वर्षांचा प्रवास संपला! संजीव बजाज यांची 'मास्टरस्ट्रोक' डील; आता पूर्ण मालकी भारतीयांकडे
19
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
20
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
Daily Top 2Weekly Top 5

Virar-Alibag: विरार-अलिबाग मार्गिका ठरणार 'गेम चेंजर'; ठाणे, कल्याण, नवी मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:38 IST

ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतिक्षित विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेचे काम बांधा वापरा हस्तांतरित करार (बीओटी) तत्वावर करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच राज्य सरकारकडे मागितली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई:ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईतीलवाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतिक्षित विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेचे काम बांधा वापरा हस्तांतरित करार (बीओटी) तत्वावर करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच राज्य सरकारकडे मागितली. त्याला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

एमएसआरडीसीने या महामार्गाच्या कामासाठी यापूर्वी निविदा काढल्या होत्या. मात्र त्या निविदा ३६ टक्के अधिक दराने आल्या होत्या. तसेच त्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या निविदा रद्द करून हा प्रकल्प बीओटीवर राबविण्याची सूचना राज्य सरकारने केली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने प्रकल्प बीओटी तत्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  या निविदेच्या अटी शर्ती मंजुरीसाठी सरकारकडे पाठविल्या आहे. 

मोरबे-करंजाडे मार्गाचे काम दोन वर्षात पूर्ण

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरून आलेल्या वाहनांना थेट जेएनपीटीला पोहचता येणार आहे. मात्र या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा मोरबे ते करंजाडे हा २१ किमी लांबीचा मार्ग विरार-अलिबाग महामार्गासोबत एकत्र उभारला जाणार आहे. एमएसआरडीसी या २१ किमी मार्गाचे काम करणार आहे. मात्र सध्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचे राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोरबे ते कंरजाडे मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची अट निविदेत घातली जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महामार्ग ठरणार ‘गेम चेंजर’

विरार-अलिबाग हा ९६.५ किमी लांबीचा बहुद्देशीय मार्ग मुंबई महानगरातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग असेल. एमएसआरडीसी तो उभारणार असून ५३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.  वसई येथील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर येथून तो सुरू होईल. तर पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान हा मार्ग असेल. त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ४ मार्गिका उभारल्या जाणार असून मुंबई आणि दिल्ली एक्स्प्रेसवेचा काही भाग आणि हा महामार्ग एकत्रित जाणार आहे. या भागात रस्त्यावर प्रत्येकी एका दिशेच्या वाहतुकीसाठी ६ मार्गिकांचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यातून मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल. मार्गाच्या कामासाठी आलेल्या निविदापत्राची पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी नेमलेल्या समितीकडून  तपासणी सुरू आहे. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर एमएसआरडीसीकडून निविदा काढल्या जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Virar-Alibag Multipurpose Corridor: Traffic congestion solution for Mumbai Metropolitan Region.

Web Summary : The Virar-Alibag corridor aims to ease traffic in Mumbai. MSRDC seeks government approval for BOT-based tenders. The 96.5 km route will connect highways and reduce congestion. Morbe-Karanjade section to finish in two years.
टॅग्स :state transportएसटीMumbaiमुंबईthaneठाणेTrafficवाहतूक कोंडी