शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

Virar-Alibag: विरार-अलिबाग मार्गिका ठरणार 'गेम चेंजर'; ठाणे, कल्याण, नवी मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:38 IST

ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतिक्षित विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेचे काम बांधा वापरा हस्तांतरित करार (बीओटी) तत्वावर करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच राज्य सरकारकडे मागितली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई:ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईतीलवाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतिक्षित विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेचे काम बांधा वापरा हस्तांतरित करार (बीओटी) तत्वावर करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच राज्य सरकारकडे मागितली. त्याला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

एमएसआरडीसीने या महामार्गाच्या कामासाठी यापूर्वी निविदा काढल्या होत्या. मात्र त्या निविदा ३६ टक्के अधिक दराने आल्या होत्या. तसेच त्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या निविदा रद्द करून हा प्रकल्प बीओटीवर राबविण्याची सूचना राज्य सरकारने केली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने प्रकल्प बीओटी तत्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  या निविदेच्या अटी शर्ती मंजुरीसाठी सरकारकडे पाठविल्या आहे. 

मोरबे-करंजाडे मार्गाचे काम दोन वर्षात पूर्ण

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरून आलेल्या वाहनांना थेट जेएनपीटीला पोहचता येणार आहे. मात्र या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा मोरबे ते करंजाडे हा २१ किमी लांबीचा मार्ग विरार-अलिबाग महामार्गासोबत एकत्र उभारला जाणार आहे. एमएसआरडीसी या २१ किमी मार्गाचे काम करणार आहे. मात्र सध्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचे राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोरबे ते कंरजाडे मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची अट निविदेत घातली जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महामार्ग ठरणार ‘गेम चेंजर’

विरार-अलिबाग हा ९६.५ किमी लांबीचा बहुद्देशीय मार्ग मुंबई महानगरातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग असेल. एमएसआरडीसी तो उभारणार असून ५३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.  वसई येथील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर येथून तो सुरू होईल. तर पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान हा मार्ग असेल. त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ४ मार्गिका उभारल्या जाणार असून मुंबई आणि दिल्ली एक्स्प्रेसवेचा काही भाग आणि हा महामार्ग एकत्रित जाणार आहे. या भागात रस्त्यावर प्रत्येकी एका दिशेच्या वाहतुकीसाठी ६ मार्गिकांचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यातून मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल. मार्गाच्या कामासाठी आलेल्या निविदापत्राची पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी नेमलेल्या समितीकडून  तपासणी सुरू आहे. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर एमएसआरडीसीकडून निविदा काढल्या जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Virar-Alibag Multipurpose Corridor: Traffic congestion solution for Mumbai Metropolitan Region.

Web Summary : The Virar-Alibag corridor aims to ease traffic in Mumbai. MSRDC seeks government approval for BOT-based tenders. The 96.5 km route will connect highways and reduce congestion. Morbe-Karanjade section to finish in two years.
टॅग्स :state transportएसटीMumbaiमुंबईthaneठाणेTrafficवाहतूक कोंडी