शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या संथगतीमुळे वाहतूककोंडी, नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 02:01 IST

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

पारोळ : अतिमहत्त्वाचा असलेला नायगाव उड्डाणपूल रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारामुळे अधांतरी लटकला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाच्या संथगतीमुळे परिसरात वाहतूककोंडी होत असल्याने हा पूल लवकर पूर्ण व्हावा, यासाठी नायगाव पूर्वेतील नागरिक वाट पाहत आहेत.नायगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांची परवड होऊ लागली आहे. परिसरात उद्भवणारी रोजची वाहतूककोंडी यामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशातच जुचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपुलाचे काम ग्रामस्थांच्या विरोधामुळे बंद आहे.

येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२१ साली नायगाव उड्डाणपूल सुरू झाल्यास बंद स्थितीत असलेल्या जुचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूककोंडी होण्याचा धोका संभवतो. अशा प्रसंगी भविष्यात वाहतूककोंडीचा नागरिकांना सामना करावा लागू नये म्हणून नायगाव पूर्व परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन्ही पूल तत्काळ सुरू करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. तसेच नायगाव उड्डाणपुलाचे सध्याचे कासवछाप काम पाहता पुलाचा शुभारंभ होता होता २०२२ साल उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नायगावचा हा उड्डाणपूल भविष्यात येथील वाहतूककोंडीवर प्रभावी पर्याय ठरणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच येते आहे. या पुलाचे काम मार्गस्थ झाल्यास वसई ते मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. नायगाव पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या या पुलाचे काम प्रशासनाकडून लवकर व्हावे, यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चे-आंदोलने केली. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही, असा आरोप स्थानिक करीत आहेत. दरम्यान, हा पूल पुढील वर्षी मे २०२१ अखेरीस वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूकदार आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून सध्या परवानगी नसल्याने पुलाचे काम रखडले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार