शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

उड्डाणपुलाच्या संथगतीमुळे वाहतूककोंडी, नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 02:01 IST

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

पारोळ : अतिमहत्त्वाचा असलेला नायगाव उड्डाणपूल रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारामुळे अधांतरी लटकला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाच्या संथगतीमुळे परिसरात वाहतूककोंडी होत असल्याने हा पूल लवकर पूर्ण व्हावा, यासाठी नायगाव पूर्वेतील नागरिक वाट पाहत आहेत.नायगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांची परवड होऊ लागली आहे. परिसरात उद्भवणारी रोजची वाहतूककोंडी यामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशातच जुचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपुलाचे काम ग्रामस्थांच्या विरोधामुळे बंद आहे.

येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२१ साली नायगाव उड्डाणपूल सुरू झाल्यास बंद स्थितीत असलेल्या जुचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूककोंडी होण्याचा धोका संभवतो. अशा प्रसंगी भविष्यात वाहतूककोंडीचा नागरिकांना सामना करावा लागू नये म्हणून नायगाव पूर्व परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन्ही पूल तत्काळ सुरू करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. तसेच नायगाव उड्डाणपुलाचे सध्याचे कासवछाप काम पाहता पुलाचा शुभारंभ होता होता २०२२ साल उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नायगावचा हा उड्डाणपूल भविष्यात येथील वाहतूककोंडीवर प्रभावी पर्याय ठरणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच येते आहे. या पुलाचे काम मार्गस्थ झाल्यास वसई ते मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. नायगाव पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या या पुलाचे काम प्रशासनाकडून लवकर व्हावे, यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चे-आंदोलने केली. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही, असा आरोप स्थानिक करीत आहेत. दरम्यान, हा पूल पुढील वर्षी मे २०२१ अखेरीस वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूकदार आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून सध्या परवानगी नसल्याने पुलाचे काम रखडले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार