शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

वसईत विद्यार्थांना पोहत शाळेत जाण्याची वेळ, जीव तळ हातावर घेऊन प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 07:02 IST

समृद्धी मार्ग, बडोदा वे असे महामार्ग होत असताना वसई पूर्व भागातील बुरुडपाडा येथे नाल्यावर पूल नसल्याने या गावातील विद्यार्थ्यांना पोहून प्रवास करावा लागत आहे.

सुनिल घरतपारोळ : परिसरामध्ये समृद्धी मार्ग, बडोदा वे असे महामार्ग होत असताना वसई पूर्व भागातील बुरुडपाडा येथे नाल्यावर पूल नसल्याने या गावातील विद्यार्थ्यांना सबंध पावसाळ्यामध्ये पोहून प्रवास करावा लागत आहे. पोहून जात असताना कुणी प्रवाहात वाहून जाऊ नये या साठी साखळी तयार करून एकमेकांचे रक्षण केले जाते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भागामध्ये अनेक विकास योजना राबविल्या गेल्या मात्र, गावातील या नाल्यावर पुल (साकव) नसल्याने दररोज विद्यार्थ्यांना जीव तळ हातावर घेऊन प्रवास करावा लागतो. गावक-यांनी या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र, अनेकदा खड्डे खणले जातात पुढे घोडे कुठे पेंड खात हे कळत नाही.मिन्नतवा-या करुन थकलेल्या बुरुडपाड्यातील नागरीकांनी आता आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे लोकमतला सांगितले. साधारण दहा वर्षांपुर्वी या भागातील रस्त्याची दुरुस्ती झाल्याचे गावकरी सांगतात.रोजचा पोहुन प्रवास करणा-या विद्यार्थ्यांना व विद्यार्थींनींना ओल्या कपड्याने शाळेत जावे लागते. त्यामुळे त्यांना वर्गात बसतांना सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेकदा लवकर निघूनही शाळेत वेळेवर पोहचता येत नाही.

"पावसाळ्यात आम्हाला जीवघेणा प्रवास करावा लागतो तसेच आजारी माणसाला उपचारा साठी कसे न्यायचे हा ही प्रश्न उभा राहतो. शिक्षणासाठी शासन विविध सुख सुविधा पुरवत असताना आमच्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे आमच दुर्दैव आहे''.- शरद बुरु ड,गावकरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSchoolशाळाStudentविद्यार्थीRainपाऊस