शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वसईत विद्यार्थांना पोहत शाळेत जाण्याची वेळ, जीव तळ हातावर घेऊन प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 07:02 IST

समृद्धी मार्ग, बडोदा वे असे महामार्ग होत असताना वसई पूर्व भागातील बुरुडपाडा येथे नाल्यावर पूल नसल्याने या गावातील विद्यार्थ्यांना पोहून प्रवास करावा लागत आहे.

सुनिल घरतपारोळ : परिसरामध्ये समृद्धी मार्ग, बडोदा वे असे महामार्ग होत असताना वसई पूर्व भागातील बुरुडपाडा येथे नाल्यावर पूल नसल्याने या गावातील विद्यार्थ्यांना सबंध पावसाळ्यामध्ये पोहून प्रवास करावा लागत आहे. पोहून जात असताना कुणी प्रवाहात वाहून जाऊ नये या साठी साखळी तयार करून एकमेकांचे रक्षण केले जाते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भागामध्ये अनेक विकास योजना राबविल्या गेल्या मात्र, गावातील या नाल्यावर पुल (साकव) नसल्याने दररोज विद्यार्थ्यांना जीव तळ हातावर घेऊन प्रवास करावा लागतो. गावक-यांनी या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र, अनेकदा खड्डे खणले जातात पुढे घोडे कुठे पेंड खात हे कळत नाही.मिन्नतवा-या करुन थकलेल्या बुरुडपाड्यातील नागरीकांनी आता आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे लोकमतला सांगितले. साधारण दहा वर्षांपुर्वी या भागातील रस्त्याची दुरुस्ती झाल्याचे गावकरी सांगतात.रोजचा पोहुन प्रवास करणा-या विद्यार्थ्यांना व विद्यार्थींनींना ओल्या कपड्याने शाळेत जावे लागते. त्यामुळे त्यांना वर्गात बसतांना सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेकदा लवकर निघूनही शाळेत वेळेवर पोहचता येत नाही.

"पावसाळ्यात आम्हाला जीवघेणा प्रवास करावा लागतो तसेच आजारी माणसाला उपचारा साठी कसे न्यायचे हा ही प्रश्न उभा राहतो. शिक्षणासाठी शासन विविध सुख सुविधा पुरवत असताना आमच्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे आमच दुर्दैव आहे''.- शरद बुरु ड,गावकरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSchoolशाळाStudentविद्यार्थीRainपाऊस