शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिवसेना-वबिआच्या नेत्यांची लाखाची गोष्ट; प्रकल्पग्रस्तही रिंगणात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 02:50 IST

लोकसभेच्या पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाचा खासदार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसप्रणित आघाडीचा भाग असलेल्या बहुजन आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे.

पालघर : लोकसभेच्या पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाचा खासदार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसप्रणित आघाडीचा भाग असलेल्या बहुजन आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे. मात्र मागील तीन निवडणुकांतील मतांची आकडेवारी गोळा करून मतांची लाखांची बेगमी आम्हीच कशी करू शकतो, याचे दाखले देण्यास नेत्यांनी सुरूवात केली आहे. त्याचवेळी बुलेट ट्रेन, फ्रेट कॉरिडॉरमुळे भरडल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनीही निवडणूक रिंगणात उडी घेणार असल्याचे जाहीर केल्याने आकडेमोडीचा खेळ रंगात आला आहे.पालघर लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघ बविआकडे, दोन भाजपाकडे, तर एक शिवसेनेकडे आहे. मागील तिन्ही निवडणुकांत बहुजन विकास आघाडीने सरासरी सव्वा दोन लाखांच्या मतांची बेगमी केली. ज्यावेळी मोदी लाटेत चिंतामण वनगा निवडून आले होते, तेव्हाही बविआने दोन लाख ९३ हजार मते मिळवली होती. गेल्यावर्षीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आयत्यावेळी उमेदवार देऊनही त्यांना ४७ हजार मते मिळाली होती.गेल्या तीन निवडणुकांत माकपच्या मतांत घट होत गेली असली, तरी त्यांची ७० ते ७५ हजारांची व्होट बँक कायम असल्याचे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा दाखला देत जिल्ह्यात त्यांची मते लाखाच्या घरात असल्याचे म्हटल्याने काँग्रेसप्रणित आघाडीने एकत्रित मते साडेपाच लाखांच्याघरात असल्याचा दावा केलाआहे.मोदी लाटेत युतीचे उमेदवार म्हणून चिंतामण वनगा विजयी झाले तेव्हा त्यांना पाच लाख ३३ हजार मते मिळाली होती.मागील वर्षी भाजपा, शिवसेना वेगवेगळे लढले तेव्हा त्यांनी पाच लाख १५ हजार मते मिळवली होती. त्यामुळे युतीच्या नेत्यांनी दोन्ही निवडणुकांचा दाखला देत त्यांची मतपेढी सव्वापाच लाखांच्या घरात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मागील निकालांच्या आधारे आपापली लाखाची गोष्ट मांडण्यास सुरूवात केल्याने आदिवासीबहुल असलेल्या आणि विकासाची गंगा अजून न पोचलेल्या या भागात सध्या लाखा-लाखाची गोष्ट रंगू लागली आहे.वसई-विरारबाहेर शिट्टी वाजणार का?पालघर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची आघाडी होऊनही बहुजन विकास आघाडीला खाते उघडता आले नाही. त्यामुळे त्या पक्षाचे चिन्ह असलेली शिट्टी वसई-विरार, बोईसरबाहेर चालत नाही, अशी टीका सुरू झाली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपापली चिन्हे सोडून आपल्या बालेकिल्ल्यात बविआचे चिन्ह पोचवण्याची कसरत पार पाडावी लागेल.

टॅग्स :palgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक