शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शिवसेना-वबिआच्या नेत्यांची लाखाची गोष्ट; प्रकल्पग्रस्तही रिंगणात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 02:50 IST

लोकसभेच्या पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाचा खासदार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसप्रणित आघाडीचा भाग असलेल्या बहुजन आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे.

पालघर : लोकसभेच्या पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाचा खासदार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसप्रणित आघाडीचा भाग असलेल्या बहुजन आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे. मात्र मागील तीन निवडणुकांतील मतांची आकडेवारी गोळा करून मतांची लाखांची बेगमी आम्हीच कशी करू शकतो, याचे दाखले देण्यास नेत्यांनी सुरूवात केली आहे. त्याचवेळी बुलेट ट्रेन, फ्रेट कॉरिडॉरमुळे भरडल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनीही निवडणूक रिंगणात उडी घेणार असल्याचे जाहीर केल्याने आकडेमोडीचा खेळ रंगात आला आहे.पालघर लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघ बविआकडे, दोन भाजपाकडे, तर एक शिवसेनेकडे आहे. मागील तिन्ही निवडणुकांत बहुजन विकास आघाडीने सरासरी सव्वा दोन लाखांच्या मतांची बेगमी केली. ज्यावेळी मोदी लाटेत चिंतामण वनगा निवडून आले होते, तेव्हाही बविआने दोन लाख ९३ हजार मते मिळवली होती. गेल्यावर्षीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आयत्यावेळी उमेदवार देऊनही त्यांना ४७ हजार मते मिळाली होती.गेल्या तीन निवडणुकांत माकपच्या मतांत घट होत गेली असली, तरी त्यांची ७० ते ७५ हजारांची व्होट बँक कायम असल्याचे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा दाखला देत जिल्ह्यात त्यांची मते लाखाच्या घरात असल्याचे म्हटल्याने काँग्रेसप्रणित आघाडीने एकत्रित मते साडेपाच लाखांच्याघरात असल्याचा दावा केलाआहे.मोदी लाटेत युतीचे उमेदवार म्हणून चिंतामण वनगा विजयी झाले तेव्हा त्यांना पाच लाख ३३ हजार मते मिळाली होती.मागील वर्षी भाजपा, शिवसेना वेगवेगळे लढले तेव्हा त्यांनी पाच लाख १५ हजार मते मिळवली होती. त्यामुळे युतीच्या नेत्यांनी दोन्ही निवडणुकांचा दाखला देत त्यांची मतपेढी सव्वापाच लाखांच्या घरात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मागील निकालांच्या आधारे आपापली लाखाची गोष्ट मांडण्यास सुरूवात केल्याने आदिवासीबहुल असलेल्या आणि विकासाची गंगा अजून न पोचलेल्या या भागात सध्या लाखा-लाखाची गोष्ट रंगू लागली आहे.वसई-विरारबाहेर शिट्टी वाजणार का?पालघर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची आघाडी होऊनही बहुजन विकास आघाडीला खाते उघडता आले नाही. त्यामुळे त्या पक्षाचे चिन्ह असलेली शिट्टी वसई-विरार, बोईसरबाहेर चालत नाही, अशी टीका सुरू झाली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपापली चिन्हे सोडून आपल्या बालेकिल्ल्यात बविआचे चिन्ह पोचवण्याची कसरत पार पाडावी लागेल.

टॅग्स :palgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक