शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शिवसेना-वबिआच्या नेत्यांची लाखाची गोष्ट; प्रकल्पग्रस्तही रिंगणात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 02:50 IST

लोकसभेच्या पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाचा खासदार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसप्रणित आघाडीचा भाग असलेल्या बहुजन आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे.

पालघर : लोकसभेच्या पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाचा खासदार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसप्रणित आघाडीचा भाग असलेल्या बहुजन आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे. मात्र मागील तीन निवडणुकांतील मतांची आकडेवारी गोळा करून मतांची लाखांची बेगमी आम्हीच कशी करू शकतो, याचे दाखले देण्यास नेत्यांनी सुरूवात केली आहे. त्याचवेळी बुलेट ट्रेन, फ्रेट कॉरिडॉरमुळे भरडल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनीही निवडणूक रिंगणात उडी घेणार असल्याचे जाहीर केल्याने आकडेमोडीचा खेळ रंगात आला आहे.पालघर लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघ बविआकडे, दोन भाजपाकडे, तर एक शिवसेनेकडे आहे. मागील तिन्ही निवडणुकांत बहुजन विकास आघाडीने सरासरी सव्वा दोन लाखांच्या मतांची बेगमी केली. ज्यावेळी मोदी लाटेत चिंतामण वनगा निवडून आले होते, तेव्हाही बविआने दोन लाख ९३ हजार मते मिळवली होती. गेल्यावर्षीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आयत्यावेळी उमेदवार देऊनही त्यांना ४७ हजार मते मिळाली होती.गेल्या तीन निवडणुकांत माकपच्या मतांत घट होत गेली असली, तरी त्यांची ७० ते ७५ हजारांची व्होट बँक कायम असल्याचे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा दाखला देत जिल्ह्यात त्यांची मते लाखाच्या घरात असल्याचे म्हटल्याने काँग्रेसप्रणित आघाडीने एकत्रित मते साडेपाच लाखांच्याघरात असल्याचा दावा केलाआहे.मोदी लाटेत युतीचे उमेदवार म्हणून चिंतामण वनगा विजयी झाले तेव्हा त्यांना पाच लाख ३३ हजार मते मिळाली होती.मागील वर्षी भाजपा, शिवसेना वेगवेगळे लढले तेव्हा त्यांनी पाच लाख १५ हजार मते मिळवली होती. त्यामुळे युतीच्या नेत्यांनी दोन्ही निवडणुकांचा दाखला देत त्यांची मतपेढी सव्वापाच लाखांच्या घरात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मागील निकालांच्या आधारे आपापली लाखाची गोष्ट मांडण्यास सुरूवात केल्याने आदिवासीबहुल असलेल्या आणि विकासाची गंगा अजून न पोचलेल्या या भागात सध्या लाखा-लाखाची गोष्ट रंगू लागली आहे.वसई-विरारबाहेर शिट्टी वाजणार का?पालघर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची आघाडी होऊनही बहुजन विकास आघाडीला खाते उघडता आले नाही. त्यामुळे त्या पक्षाचे चिन्ह असलेली शिट्टी वसई-विरार, बोईसरबाहेर चालत नाही, अशी टीका सुरू झाली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपापली चिन्हे सोडून आपल्या बालेकिल्ल्यात बविआचे चिन्ह पोचवण्याची कसरत पार पाडावी लागेल.

टॅग्स :palgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक