शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Palghar: आदिवासींचे जीव स्वस्त, मुंबई-ठाणेकरांचे महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:08 IST

Palghar News: मोखाड्यापासून २० किलोमीटरवर गणेश वाडीतील रूपाली भाऊ रोज या महिलेचा योग्य उपचार न मिळाल्यामुळे पोटातल्या बाळासह झालेला मृत्यू मुंबई-ठाण्याच्या तुलनेत तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी-गरिबांचे जीव किती स्वस्त झाले आहेत, याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

- हितेन नाईक  (पालघर समन्वयक)मोखाड्यापासून २० किलोमीटरवर गणेश वाडीतील रूपाली भाऊ रोज या महिलेचा योग्य उपचार न मिळाल्यामुळे पोटातल्या बाळासह झालेला मृत्यू मुंबई-ठाण्याच्या तुलनेत तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी-गरिबांचे जीव किती स्वस्त झाले आहेत, याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अशा घटना कायमस्वरूपी रोखण्याऐवजी वरवरचे सोपस्कार केले जात असून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधींची खरेदी करून लाखोंची टक्केवारी वसुली करण्याचे षडयंत्र सुरू आहे.   १ ऑगस्ट २०१४ ला पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अद्याप पालघरला जिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल, बाल- महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू झालेले नाही. जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तीन उपजिल्हा रुग्णालये, नऊ ग्रामीण रुग्णालयांवर जिल्ह्याच्या आरोग्याची भिस्त आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात २,०७६ पदे मंजूर आहेत. त्यातील १,०६३ पदे रिक्त आहेत. त्यातील वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक-सेविका अशी ५८७ पदे कंत्राटी पद्धतीने भरूनही सामान्य रुग्णांना दिलासा मिळालेला नाही. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत असलेल्या तीन उपजिल्हा आणि नऊ ग्रामीण रुग्णालयातील ६५८ मंजूर पदांपैकी ३५७ पदे रिक्त आहेत. त्यात महत्त्वपूर्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या मोठी असल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा चांगला कसा राहील? स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्य विशारद, भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ आदी आरोग्य संस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली पदेच रिक्त असल्याने अनेक  रुग्णालयातील सोनोग्राफी, एक्स रे मशीन, ब्लड स्टोरेज युनिट, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य धूळखात पडून आहे. यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या आणि तिच्या पोटातील बाळाच्या आरोग्याचे निदान योग्य वेळी होत नाही. या स्थितीत २०२२-२३ या एका वर्षात २० गर्भवती माता आणि २९४ बालकांचा मृत्यू झाला. 

मनोर येथील २०० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटरही अनेक महिन्यांपासून वाढीव निधी व तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण अवस्थेत आहे. कंत्राटावर घेतलेले डॉक्टर राहण्याची सोय, पाणी यांसारख्या सुविधाही नसल्याने राहण्यास तयार नाहीत. डॉक्टरांची रिक्त पदे, औषध साठा, ॲम्बुलन्स, खाटांची संख्या वाढवणे आदी उपाययोजना आखून आरोग्य सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी, आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी सरकारला रोखलेय कोणी? 

दुर्घटना घडल्याच्या बातम्या आल्यावर पालकमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांत्वनासाठी रांगा लागतात. दोषींवर वरवरची कारवाई होते. मग लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी ॲम्बुलन्स मोटरसायकलसारखी कोट्यवधींची योजना आणतात. खरेदीतून संबंधितांना टक्केवारी मिळाली की ॲम्बुलन्ससह साहित्य धूळखात पडून राहते, हेच येथील वास्तव आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpalgharपालघर