शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

मीरा भाईंदरसाठीच्या २१८ दशलक्ष लीटर सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 15:18 IST

नागरिकांना पाणी टंचाईतून दिलासा मिळून २४ तास पाण्याचे स्वप्न होणार पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदरकरांना २४ तास पाणी मिळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठीची महत्वाकांक्षी अशी २१८ दशलक्ष लिटरची सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे जानेवारी २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय शासनाचा असल्याचे आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी योजनेच्या कामांची पाहणी केल्या नंतर सांगितले .  वन विभागा कडून वन हद्दीत काम करण्याची परवानगी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकर मिळेल अशी ग्वाही देखील आमदारांनी दिली आहे . 

मीरा भाईंदर शहराला महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ कडून १२५ दशलक्ष लिटर तर स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. कडून ८६ दशलक्ष लिटर असा एकूण २११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मंजूर असल्याचे महापालिका सांगते .  प्रत्यक्षात शहराला रोजचे सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते . सध्याची लोकसंख्या विचारात घेता रोज २१६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना  रोज २६ ते ३१ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळते . आधीच पाणी कमी त्यात विविध कारणांनी पाणी पुरवठा बंद होण्याच्या कारणांनी शहरात पाणी टंचाई भेडसावत आहे . 

मीरा भाईंदरच्या पाणी टंचाईवर कायम स्वरूपी तोडगा असलेली २१८ दशलक्ष लिटरची सूर्या पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षां पासून विविध कारणांनी रखडली आहे . सूर्या योजनेला गती देण्यासह शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था योजना पूर्ण करणे आवश्यक आहे . खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह महापालिका आयुक्त दिलीप ढोले हे सूर्या व अंतर्गत वितरण व्यवस्था यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत . त्यासाठी अनेक बैठका व पत्रव्यवहार  झाले आहेत . 

सूर्याचे पाणी येण्या आधी मीरा भाईंदर शहरात अंतर्गत जल वाहिन्या, टाक्या आदी वितरण व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याने अमृत योजनेतून ५१६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे . त्याचे काम जून महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे . 

शहराची २०५५ साला पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची गरज विचारात घेऊन सूर्या योजना मंजूर झाली आहे . धामणी (सूर्या) धरण परिसरात सूर्या योजनेच्या उदंचन केंद्र , आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र आदींच्या कामांची पाहणी व आढावा आ.  सरनाईक व आ . गीता जैन यांनी गुरुवारी घेतला . एमएमआरडीएचे सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प प्रमुख अभियांत्रिक सुनील वांडेकर  , कार्यकारी अभियंता हनुमान सोनावणे , उप अभियंता मिलिंद खरे , कुणाल शेंडे, महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे आदी अधिकारी , माजी विरोधीपक्ष नेते धनेश पाटील व राजू भोईर , माजी नगरसेविका वंदना पाटील , संध्या पाटील, नीला सोन्स , माजी नगरसेवक कमलेश भोईर, अश्विन कासोदरिया सह पूजा आमगावकर आदी उपस्थित होते . 

उदंचन केंद्र व जल शुद्धीकरण केंद्राचे काम ९९ टक्के तर १ . ७ किमीचा  मेंढवण खिंड बोगदा पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ४. ५ किमीच्या तुंगारेश्वर बोगदा चे काम सुरु असून ते आगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे. चेणे येथे ४५ दशलक्ष लिटर पाण्याचे जलाशय बांधण्याचे काम ४० टक्के झाले आहे. एकूणच सर्व बांधकाम , जलवाहिनी टाकण्याचे काम , कामाची तपासणी व चाचणी तसेच प्रकल्प कार्यान्वित करण्याची कामे जानेवारी २०२४ पर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले . 

प्रकल्पासाठी आवश्यक १३२ के. व्ही. उच्च दाबाचा विद्युत पुरवठा डहाणू उप केंद्रापासून ते सूर्या नगर आणि कवडास पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. तत्वतः वन विभागाने परवानगी दिली असली तरी वन क्षेत्रात काम करण्याची प्रत्यक्ष परवानगी मिळणे बाकी आहे . याबाबत ऊर्जा मंत्र्यां कडे बैठक घेऊन तात्काळ तोडगा काढणार असल्याचे आ . सरनाईक यांनी सांगितले . 

दोन्ही आमदारांनी योजनेतीची माहिती घेत कामात काही अडथळे वा अडचणी असल्या बाबत अधिकाऱ्यां कडे विचारणा केली . कामांना गती दया व नियोजित वेळे आधी प्रकल्प पूर्ण करून पाणी पुरवठा सुरु करण्यास दोन्ही आमदारांनी सांगितले .  सूर्या योजने मुळे मीरा भाईंदर पाणी टंचाई मुक्त होईलच शिवाय नागरिकांना २४ तास पाणी देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाणार असल्याचे यावेळी आमदारांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर