शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

मीरा भाईंदरसाठीच्या २१८ दशलक्ष लीटर सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 15:18 IST

नागरिकांना पाणी टंचाईतून दिलासा मिळून २४ तास पाण्याचे स्वप्न होणार पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदरकरांना २४ तास पाणी मिळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठीची महत्वाकांक्षी अशी २१८ दशलक्ष लिटरची सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे जानेवारी २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय शासनाचा असल्याचे आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी योजनेच्या कामांची पाहणी केल्या नंतर सांगितले .  वन विभागा कडून वन हद्दीत काम करण्याची परवानगी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकर मिळेल अशी ग्वाही देखील आमदारांनी दिली आहे . 

मीरा भाईंदर शहराला महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ कडून १२५ दशलक्ष लिटर तर स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. कडून ८६ दशलक्ष लिटर असा एकूण २११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मंजूर असल्याचे महापालिका सांगते .  प्रत्यक्षात शहराला रोजचे सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते . सध्याची लोकसंख्या विचारात घेता रोज २१६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना  रोज २६ ते ३१ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळते . आधीच पाणी कमी त्यात विविध कारणांनी पाणी पुरवठा बंद होण्याच्या कारणांनी शहरात पाणी टंचाई भेडसावत आहे . 

मीरा भाईंदरच्या पाणी टंचाईवर कायम स्वरूपी तोडगा असलेली २१८ दशलक्ष लिटरची सूर्या पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षां पासून विविध कारणांनी रखडली आहे . सूर्या योजनेला गती देण्यासह शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था योजना पूर्ण करणे आवश्यक आहे . खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह महापालिका आयुक्त दिलीप ढोले हे सूर्या व अंतर्गत वितरण व्यवस्था यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत . त्यासाठी अनेक बैठका व पत्रव्यवहार  झाले आहेत . 

सूर्याचे पाणी येण्या आधी मीरा भाईंदर शहरात अंतर्गत जल वाहिन्या, टाक्या आदी वितरण व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याने अमृत योजनेतून ५१६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे . त्याचे काम जून महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे . 

शहराची २०५५ साला पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची गरज विचारात घेऊन सूर्या योजना मंजूर झाली आहे . धामणी (सूर्या) धरण परिसरात सूर्या योजनेच्या उदंचन केंद्र , आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र आदींच्या कामांची पाहणी व आढावा आ.  सरनाईक व आ . गीता जैन यांनी गुरुवारी घेतला . एमएमआरडीएचे सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प प्रमुख अभियांत्रिक सुनील वांडेकर  , कार्यकारी अभियंता हनुमान सोनावणे , उप अभियंता मिलिंद खरे , कुणाल शेंडे, महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे आदी अधिकारी , माजी विरोधीपक्ष नेते धनेश पाटील व राजू भोईर , माजी नगरसेविका वंदना पाटील , संध्या पाटील, नीला सोन्स , माजी नगरसेवक कमलेश भोईर, अश्विन कासोदरिया सह पूजा आमगावकर आदी उपस्थित होते . 

उदंचन केंद्र व जल शुद्धीकरण केंद्राचे काम ९९ टक्के तर १ . ७ किमीचा  मेंढवण खिंड बोगदा पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ४. ५ किमीच्या तुंगारेश्वर बोगदा चे काम सुरु असून ते आगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे. चेणे येथे ४५ दशलक्ष लिटर पाण्याचे जलाशय बांधण्याचे काम ४० टक्के झाले आहे. एकूणच सर्व बांधकाम , जलवाहिनी टाकण्याचे काम , कामाची तपासणी व चाचणी तसेच प्रकल्प कार्यान्वित करण्याची कामे जानेवारी २०२४ पर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले . 

प्रकल्पासाठी आवश्यक १३२ के. व्ही. उच्च दाबाचा विद्युत पुरवठा डहाणू उप केंद्रापासून ते सूर्या नगर आणि कवडास पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. तत्वतः वन विभागाने परवानगी दिली असली तरी वन क्षेत्रात काम करण्याची प्रत्यक्ष परवानगी मिळणे बाकी आहे . याबाबत ऊर्जा मंत्र्यां कडे बैठक घेऊन तात्काळ तोडगा काढणार असल्याचे आ . सरनाईक यांनी सांगितले . 

दोन्ही आमदारांनी योजनेतीची माहिती घेत कामात काही अडथळे वा अडचणी असल्या बाबत अधिकाऱ्यां कडे विचारणा केली . कामांना गती दया व नियोजित वेळे आधी प्रकल्प पूर्ण करून पाणी पुरवठा सुरु करण्यास दोन्ही आमदारांनी सांगितले .  सूर्या योजने मुळे मीरा भाईंदर पाणी टंचाई मुक्त होईलच शिवाय नागरिकांना २४ तास पाणी देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाणार असल्याचे यावेळी आमदारांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर