शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

तारूनिया सकळां, आम्हां कृपादृष्टी पाहे; विसर्जनाला पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:26 PM

भावपूर्ण वातावरणात निरोप

पालघर : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी, अनंत चतुर्दशीला भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या विसर्जन मिरवणुकांना पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर कायम असतानाही जिल्ह्यातील ५९७ सार्वजनिक आणि ४ हजार ३७२ खाजगी गणपतींचे विसर्जन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले.

आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातलेले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. तर सार्वजनिक मंडळाचे गणपती संध्याकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी बाहेर पडले. पालघरमधील तिवारी कुटुंबियांचा ‘फुलांचा राजा’ आणि जुन्या पालघरमधील ‘पालघरचा राजा’ या दोन प्रसिद्ध गणपतींना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उपस्थित होते. ‘फुलांचा राजा’ हा गणपती नेहमीच भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला असून यावर्षी गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूस विविध फुलांचा वापर करून गजराजांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, लेझीम पथकांची मानवंदना देण्यात येत असताना रस्त्या-रस्त्यावर राजकीय पक्षांकडून सर्व गणेश मंडळांचे फूल, श्रीफळ तसेच मानचिन्ह देऊन स्वागत केले जात होते. संध्याकाळी ७ च्या सुमारास गणेश मंडळांची मोठी गर्दी झाली असताना विसर्जन पाहण्यासाठी आलेले लोक आणि कामावरून परतणारे चाकरमानी अशी अलोट गर्दी होती. अशावेळी पालघर पोलीस आणि अनिरुद्ध बापू स्वयंसेवी अनुयायांनी या गर्दीवर नियंत्रण आणून वाहतूकही सुरळीत केली.

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने विशेष दक्षता घेतली होती. या उत्सवाला कुठलेही गालबोट न लागता हे सण शांततेत साजरे व्हावेत या दृष्टीने कडक पावले उचलली होती. तसेच उत्सवादरम्यान एकूण १ हजार ८८१ जणांवर कारवाई करण्यात आली.विसर्जनाच्या निर्माल्यातून २० टन सेंद्रिय खतमुंबई : दरवर्षी अनंत चतुर्दशीनंतर मुंबईतील चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (अलिबाग)चे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण रक्षणासाठी निर्माल्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करण्याच्या स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यंदा गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून फुल, फळे आणि आरास इत्यादी निर्माल्य गोळा करून त्याचे रूपांतर सेंद्रिय खतात केले जाणार आहे. तिन्ही ठिकाणच्या निर्माल्यातून सुमारे २० ते २५ टन सेंद्रीय खत निर्माण केले जाणार आहे. गेल्यावर्षी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.मोखाड्यात गणपती बाप्पाला निरोपमोखाडा : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’, या घोषणा, त्याचप्रमाणे ढोलताशे, पांरपरिक सनई - संबळाच्या तालावर तसेच बेंजोची साथ, डीजेची साथ आणि गुलालाची उधळण करत तालुकावासियांनी दहा दिवस विराजमान असलेल्या बाप्पाला निरोप दिला. मोखाड्यात दहा दिवस विराजमान होणाऱ्या गणरायांची संख्या कमी असल्याने शांततेत तसेच गावपाड्यांतील भक्तांनी स्थानिक नदी पात्रात तर मोखाडा, घोसाळी येथे तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खात्याने चोख व्यवस्था ठेवली होती.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019