शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:58 PM

पांढरतारा पूल पाण्याखाली : भातलावणीला पावसाचा खो

पारोळ : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून बुधवारी पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तानसा नदीचे पाणी या भागातील शेतांमध्ये घुसल्याने या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली जात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भात लावणीच्या हंगामातच शेती पाण्याखाली गेल्याने दोन दिवसांपासून लावणीच्या कामांना ब्रेक दिला आहे. आठवडाभर पावसाने विश्रांती घेत बळीराजाची चिंता वाढवली होती. पाऊस सुरू होताच भात लावणीची कामे सुरू होतील, अशी आशा बळीराजाला असतानाच मंगळवारी रात्री पावसाची सुरुवात तर झाली मात्र, तीच संततधार बुधवार व गुरुवारीही कायम ठेवून शेतीची कामे बंद ठेवण्याची वेळ आली.

तानसा नदीवरील पांढरतारा पुलाची उंची कमी असल्याने नदीत पाण्याची पातळी वाढताच तो पाण्याखाली जात पलीकडे जाण्याच्या मार्ग बंद झाल्याने गावकरी यांची मोठी गैरसोय होते. कामगारांना कामाला व मुलांना शाळेला दांडी मारावी लागते. या पुलाची उंची वाढावी म्हणून अनेक वर्षांपासून मागणी होत असताना मात्र प्रशासन पुलाच्या उंचीबाबत दुर्लक्ष करत असल्याने बाधित गावातील नागरिकांमध्ये संताप आहे.

त्याचप्रमाणे वसई तालुक्यात पाचशे हेक्टरच्या आसपास जमिनीवर भात पीक घेतले जाते. पण दरवर्षी तानसा नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली जात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नुकसानभरपाईसाठी पंचनामे प्रशासन करते, पण मदत मात्र मिळत नाही. तसेच पीक विम्याबाबतही शेतकºयांमध्ये जनजागृती होत नसल्याने अनेक शेतकºयांना पीक विम्याचाही लाभ घेता येत नाही. विदर्भ, मराठवाडा येथील शेतकºयांना भरपाई मिळते मग वसईतील भात शेतकºयांना का मिळत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

विक्रमगडमध्ये जोरदार पाऊसविकमगड : आठवड्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारपासून विक्रमगड तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. सलग दोन दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग आवणीच्या कामात व्यस्त झाला आहे. पाण्याची गरज असल्याने आवणीला वेग आला आहे. पावसाचा जोर लक्षात घेता काही शाळाना लवकरच सुट्टी देण्यात आली.

टॅग्स :DamधरणRainपाऊस