शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

नववीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 22, 2017 01:17 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याने शाळा कंपाउंड मधील आंब्याचा

सुरेश काटे / तलासरीगोखले एज्युकेशन सोसायटीच्या तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याने शाळा कंपाउंड मधील आंब्याचा झाडाला रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. नितेश रमेश भोये विक्र मगड (आंबेघर) असे त्याचे नाव असून तो समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात शिक्षण घेत होता. नामांकित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ठक्कर बाप्पा विद्यालयात दुसरी अशी गंभीर घटना घडल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. या आधी आठ महिन्यांपूर्वी शाळेच्या आवारातील स्नानगृहात दोरीने गळफास घेऊन घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु सुदैवाने काही विद्यार्थ्यांनी प्रकार पाहिल्याने त्याचा जीव वाचला होता, त्यानंतर आज घडलेल्या घटनेवरून असे निदर्शनास येते की शाळा व्यवस्थापन व कर्मचारी वर्गाने कसला ही बोध घेतलेला नसल्याने अशा घटना शाळेच्या आवारात वारंवार घडत आहेत. येथील वसतिगृहात १०९ मुले आणि ९० मुली आदिवासी प्रकल्प विभागा अंतर्गत राहत असून समाज कल्याण विभागा मार्फत वसतिगृहात ५४ मुले व २० मुली असे एकूण २७३ विद्यार्थी निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. मात्र रात्रीच्या सुमारास महिला अधिक्षक, तसेच मुलांच्या वसतिगृहाची असलेले अधीक्षक शाळेत अनेक वेळा अनुपस्थित राहतात या शिवाय मुख्याध्यापकांचे शाळेच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांवर लक्ष नसल्याने अशा या घटना घडत असल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी करून मुख्याध्यापक, अधिक्षक, सुरक्षारक्षक, शाळा संचालकां विरुद्ध गुन्हा नोंदवित नाहीत तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन न करू देण्याची भूमिका घेतल्याने काही काळ वातावरण तणाव पूर्ण झाले होते. ३० मार्च रोजी पालक व शाळा संचालक व्यवस्थापन तसेच अन्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे जाहीर केल्या नंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला .अशोक बुलकुंडे : मुख्यध्यापक : शाळेत अधीक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित असतात या व्यतिरिक्त रात्रीच्या सुमारास मी स्वता: अनेक वेळा वसतिगृह परिसरात फिरत असतो, महिला अधिक्षक पद रिक्त असल्याने मुलींच्या वस्तीगृहाजवळ सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षारक्षक ठेवलेले असतात. नितेश हा वर्गात हुशार शांत मुलगा होता असे मुख्याध्यापक बुलकुंडे यांनी सांगितले, समाज कल्याण विभाग मार्फत चालवल्या जाणाऱ्या या वस्तीगृहकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे या वस्तीगृहां चे अधिक्षक वसतिगृहात राहातच नाही अधिक्षक राजेश विल्हात राहत नसले बाबत मुख्याध्यापक यांनी त्यांना अनेक वेळा नोटीसही काढल्या तसेच कार्यालयाला कळविले पण त्याची दखल ना अधिक्षकाने घेतली ना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्या या हलगर्जी चा बळी नितेश झाला (वार्ताहर)