शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नववीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 22, 2017 01:17 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याने शाळा कंपाउंड मधील आंब्याचा

सुरेश काटे / तलासरीगोखले एज्युकेशन सोसायटीच्या तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याने शाळा कंपाउंड मधील आंब्याचा झाडाला रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. नितेश रमेश भोये विक्र मगड (आंबेघर) असे त्याचे नाव असून तो समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात शिक्षण घेत होता. नामांकित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ठक्कर बाप्पा विद्यालयात दुसरी अशी गंभीर घटना घडल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. या आधी आठ महिन्यांपूर्वी शाळेच्या आवारातील स्नानगृहात दोरीने गळफास घेऊन घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु सुदैवाने काही विद्यार्थ्यांनी प्रकार पाहिल्याने त्याचा जीव वाचला होता, त्यानंतर आज घडलेल्या घटनेवरून असे निदर्शनास येते की शाळा व्यवस्थापन व कर्मचारी वर्गाने कसला ही बोध घेतलेला नसल्याने अशा घटना शाळेच्या आवारात वारंवार घडत आहेत. येथील वसतिगृहात १०९ मुले आणि ९० मुली आदिवासी प्रकल्प विभागा अंतर्गत राहत असून समाज कल्याण विभागा मार्फत वसतिगृहात ५४ मुले व २० मुली असे एकूण २७३ विद्यार्थी निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. मात्र रात्रीच्या सुमारास महिला अधिक्षक, तसेच मुलांच्या वसतिगृहाची असलेले अधीक्षक शाळेत अनेक वेळा अनुपस्थित राहतात या शिवाय मुख्याध्यापकांचे शाळेच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांवर लक्ष नसल्याने अशा या घटना घडत असल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी करून मुख्याध्यापक, अधिक्षक, सुरक्षारक्षक, शाळा संचालकां विरुद्ध गुन्हा नोंदवित नाहीत तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन न करू देण्याची भूमिका घेतल्याने काही काळ वातावरण तणाव पूर्ण झाले होते. ३० मार्च रोजी पालक व शाळा संचालक व्यवस्थापन तसेच अन्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे जाहीर केल्या नंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला .अशोक बुलकुंडे : मुख्यध्यापक : शाळेत अधीक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित असतात या व्यतिरिक्त रात्रीच्या सुमारास मी स्वता: अनेक वेळा वसतिगृह परिसरात फिरत असतो, महिला अधिक्षक पद रिक्त असल्याने मुलींच्या वस्तीगृहाजवळ सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षारक्षक ठेवलेले असतात. नितेश हा वर्गात हुशार शांत मुलगा होता असे मुख्याध्यापक बुलकुंडे यांनी सांगितले, समाज कल्याण विभाग मार्फत चालवल्या जाणाऱ्या या वस्तीगृहकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे या वस्तीगृहां चे अधिक्षक वसतिगृहात राहातच नाही अधिक्षक राजेश विल्हात राहत नसले बाबत मुख्याध्यापक यांनी त्यांना अनेक वेळा नोटीसही काढल्या तसेच कार्यालयाला कळविले पण त्याची दखल ना अधिक्षकाने घेतली ना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्या या हलगर्जी चा बळी नितेश झाला (वार्ताहर)