शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आदिवासींची मरणयातना; घोटभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून तंगडतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 07:13 IST

आदिवासी भोगताहेत मरणयातना

रवींद्र साळवेमोखाडा  : डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय, असा दावा करतेय. पण  पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र या ‘विकास’ महाशयांना सापडतच नाहीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना  पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पालघरमधील सावरखूट पाड्यावरील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी दोन किमीचा डोंगर करावा लागत आहे. 

अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठी तरतूद केली जाते, पण  विकास   दिसत नाही. मुंबई  पासून १०० किमी अंतरावर तर शहापूरपासून ३५ ते ४० अंतरावर अजनूप दापूर ग्रामपंचायतीच्या  हद्दीत १७ घरे व १०० लोकवस्तीचा  ठाणे  व  पालघरच्या सीमेवर  मोखाडा तालुक्यालगत डोंगरात   वसलेला  सावरखूटपाडा हा सोयीसुविधांअभावी  मरणयातना भोगत  आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणालगत सावरखुटपाडा वसलेला आहे.  धो-धो पाणी वाहून जात असताना या आदिवासींना पाणी मिळत नाही. रणरणत्या उन्हात अनवाणी दोन किमीचा  डोंगर  तुडवत वृद्ध महिला, मुलांना पाणी आणावे लागत आहे, परंतु याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत  आहे. 

पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या तिपटीने वाढणार?n राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणीदेखील वाढली आहे. n पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. n यंदाही शहापूर तालुक्यात २६ पाण्याच्या टँकरद्वारे १२६ गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. n येत्या काही दिवसात पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या तिपटीने वाढ होणार आहे.

आमचं पाणी लय लांब, पाणी आणायला दोन तास लागतात, डोंगरातून पाणी घरी घेऊन जाताना अक्षरशः आत्महत्या करावीशी वाटते.- यशोदा  वारे, वृद्ध महिला, सावरखूटपाडा

ठक्करबाप्पा योजनेच्या  माध्यमातून तसेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून सावरखूटपाड्याचा पाण्याचा  प्रश्न व रस्त्याचा  प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत,  परंतु चारही  बाजूने  वनविभागाची जमीन  असल्याने  अडचणी येत  आहेत. तरीदेखील आम्ही  या पाड्याची समस्या सोडवण्याकाठी प्रयत्नशील आहोत. - दौलत दरोडा, आमदार

टॅग्स :Waterपाणीpalgharपालघर