शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

सोपारा बौद्ध स्तुपाची दुरवस्था, सरकारचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:31 IST

नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा येथील बौद्य स्थूप सद्या दुर्लक्षीत अवस्थेत आहे. फार वर्षापुर्वी चंदनी दरवाजे असलेल्या या बुदधविहारची स्थापना भगवान गौतम बुद्धांनी केली होती अशी इतिहात नोंद आहे.

वसई : नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा येथील बौद्य स्थूप सद्या दुर्लक्षीत अवस्थेत आहे. फार वर्षापुर्वी चंदनी दरवाजे असलेल्या या बुदधविहारची स्थापना भगवान गौतम बुद्धांनी केली होती अशी इतिहात नोंद आहे. मात्र, आता स्तुपाच्या प्रवेशद्वाराची पडझड झाली असून अनेक सोयीसूविधांची वानवा या परिसरात आहे. त्यामूळे येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.हा स्तुप मर्देस आणि नालासोपारा यांच्या सिमेवरील सोपारा गावाजवळ आहे. स्थानिक लोक याला पूर्वी बुरूड राजाचा किल्ला म्हणत असत. इथेच अनेकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. भगवान बुद्धांनी ५०० महिलांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली असल्याचा उल्लेखही तत्कालिन ग्रंथामध्ये आढळतो. हा स्तुप सांची स्तुपासारखा होता. काळाच्या ओघात तो नष्ट झाला. येथे अधुनमधुन जगभरातून पर्यटक येत असतात. स्तुपात येणाºया भाविकांसाठी प्रसाधनगृहाचीही सोय नसून बसण्याचीही व्यवस्था नाही. स्तुपाची दररोज स्वच्छताही होत नसल्याने येथे येणाºया पर्यटकांची गैरसोय होत आहे.गौतम बुद्ध यांच्या वास्तव्यामुळे हा स्तूप जगभरातील बौद्ध संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा स्तूप पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे कायद्याने महानगरपालिकेला येथे हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, पुरातत्व खात्याचेही येथे दुर्लक्ष आहे. महानगरपालिकेने मार्च महिन्यात येथे येणाºया अनुयायांसाठी अडीच लाख रु पये खर्चून जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली होती. मात्र, स्तुपाजवळ कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्या यंत्राचीही चोरी झालेली आहे. पुरातत्त्व खात्याने फिरते शौचालय देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे.येथे एखादा कार्यक्र म असेल तरच महानगरपालिकेकडून फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात येते. मात्र, अन्य वेळी येथे येणाºया अनुयायांची गैरसोय होत असते.स्तुपाच्या मार्गावर महापालिकेने भव्य प्रवेशद्वार बनवले होते. या प्रवेशद्वारावरील मूर्तीही निखळून पडू लागल्या आहेत.पर्यटनविकास रखडलाबौद्ध स्तुपाच्या ६५ एकर परिसराचा विकास करण्यात येणार होता. राज्य शासन, पर्यटन विभाग आणि बुद्धिस्ट हेरिटेज अ?ॅण्ड कल्चर सेंटरतर्फे हा विकास केला जाणार होता. त्यात स्मारक, अभ्यास केंद्र, विश्रांतिगृह, हॉटेल, उद्याने आदींचा समावेश होता.याशिवाय बौद्ध संस्कृतीचे वास्तुसंग्रहालय तयार केले जाणार होते. या प्रकल्पासाठी ४०० कोटी रु पयांचा खर्च अपेक्षति होता. मात्र हा प्रकल्पदेखील रखडला आहे. बौद्ध स्तुपाच्या परिसराला अतिक्र मणाने वेढा घातला आहे. ३४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्र मण झालेले आहे.या बौद्ध स्तुपाला हजारो पर्यटक, बौद्ध भिक्खू, अनुयायी भेट देत असतात. मात्र, तिथे प्राथमिक सोयीसुविधाही नसल्याने त्यांची गैरसोय होत असते, स्तुपाच्या परिसरात बसण्यासाठी बाकेही नाहीत. त्यामुळे इथे येणारे बौद्ध भिक्खूआपल्यासोबत तंबू घेऊन येतात, असे ते म्हणाले.- नरेश जाधव, सचिव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवीजयंती समिती

टॅग्स :Vasai Virarवसई विरार