शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खरपडपाड्याला मिळाला रस्ता; ग्रामस्थांची मागणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:29 IST

स्वातंत्र्यापासून खरपडपाड्यात दळणवळणाची सोयच नसल्याने गरोदर माता, बालक, वृद्धांना, दवाखान्यात किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पायी प्रवास करीत डोंगर चढून सात कि.मी. सांबरपाडा पाट्यावर एसटी बस गाठण्यासाठी यावे लागत होते.

हुसेन मेमन जव्हार : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर जव्हार तालुक्यातील दाभोसा ग्रामपंचायत हद्दीतील खरपडपाड्यात रस्ता पोहोचला आहे. आजतागायत या खरपडपाड्यात चारचाकी गाडी पोहोचलीच नव्हती. येथील नागरिकांची रस्त्याची अनेक वर्षांपासून मागणी होती; परंतु त्यानंतरही पाड्याला रस्त्याचे काम होत नव्हते. मात्र, वयम् चळवळीच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन या आदिवासी पाड्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रस्ता पोहोचला आहे.

पालघर जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटनस्थळ दाभोसा धबधबा असून, या पर्यटनस्थळी वर्षाकाठी हजारो पर्यटक येत असतात. याच दाभोसा ग्रामपंचायत हद्दीतील खरपडपाड्याला रस्त्याची सोय नव्हती. या पाड्यात १८ आदिवासी कुटुंबे राहत असून, एकूण १०४ लोकसंख्या आहे. मात्र, या पाड्याला आजपर्यंत रस्ताच नसल्याने, डोंगरदऱ्या चढून ग्रामपंचायत किंवा तालुक्याच्या ठिकाणी पोहोचावे लागत होते. तर रस्ताच नसल्याने वाहन तरी कुठून येणार, अशी बिकट अवस्था होती; परंतु या वर्षी खरपडपाड्याला रस्त्याचे काम सुरू झाल्याने, येथील आदिवासी कुटुंबांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अखेर त्यांना रस्ता मिळाला असून, स्वातंत्र्यात आल्यासारखे वाटत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

स्वातंत्र्यापासून खरपडपाड्यात दळणवळणाची सोयच नसल्याने गरोदर माता, बालक, वृद्धांना, दवाखान्यात किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पायी प्रवास करीत डोंगर चढून सात कि.मी. सांबरपाडा पाट्यावर एसटी बस गाठण्यासाठी यावे लागत होते. पाड्यात रस्ताच नसल्याने, हालअपेष्टा सहन करीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामध्ये शाळकरी विद्यार्थी व गरोदर मातांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. पाड्यात रस्ता येण्यासाठी बहुतांश जमीन ही वनविभागाची होती. अखेर पंचायत समितीकडून दीड वर्षात का होईना, सर्व प्रक्रिया पूर्ण करून पाड्याला रस्ता मिळाला आहे.

रस्ता झाल्याने त्रासातून झाली सुटकाखरपडपाड्यात इ.पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असून, या शाळेत जवळपास एकूण १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या खरपडपाड्यात रोजच येणाºया शिक्षकाला सांबरपाडा किंवा अन्य पाड्याच्या वरती वाहन ठेवून शाळेत यावे लागत होते.अंगणवाडीतील महिलांना त्यांचा आहार किंवा अन्य सामान आण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. खरपडपाड्याला रस्ताच नसल्याने, मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. मात्र, पाड्यात रस्ता झाल्याने, यातून सुुटका झाली आहे.