शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

अखेर खरपडपाड्याला मिळाला रस्ता; ग्रामस्थांची मागणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:29 IST

स्वातंत्र्यापासून खरपडपाड्यात दळणवळणाची सोयच नसल्याने गरोदर माता, बालक, वृद्धांना, दवाखान्यात किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पायी प्रवास करीत डोंगर चढून सात कि.मी. सांबरपाडा पाट्यावर एसटी बस गाठण्यासाठी यावे लागत होते.

हुसेन मेमन जव्हार : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर जव्हार तालुक्यातील दाभोसा ग्रामपंचायत हद्दीतील खरपडपाड्यात रस्ता पोहोचला आहे. आजतागायत या खरपडपाड्यात चारचाकी गाडी पोहोचलीच नव्हती. येथील नागरिकांची रस्त्याची अनेक वर्षांपासून मागणी होती; परंतु त्यानंतरही पाड्याला रस्त्याचे काम होत नव्हते. मात्र, वयम् चळवळीच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन या आदिवासी पाड्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रस्ता पोहोचला आहे.

पालघर जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटनस्थळ दाभोसा धबधबा असून, या पर्यटनस्थळी वर्षाकाठी हजारो पर्यटक येत असतात. याच दाभोसा ग्रामपंचायत हद्दीतील खरपडपाड्याला रस्त्याची सोय नव्हती. या पाड्यात १८ आदिवासी कुटुंबे राहत असून, एकूण १०४ लोकसंख्या आहे. मात्र, या पाड्याला आजपर्यंत रस्ताच नसल्याने, डोंगरदऱ्या चढून ग्रामपंचायत किंवा तालुक्याच्या ठिकाणी पोहोचावे लागत होते. तर रस्ताच नसल्याने वाहन तरी कुठून येणार, अशी बिकट अवस्था होती; परंतु या वर्षी खरपडपाड्याला रस्त्याचे काम सुरू झाल्याने, येथील आदिवासी कुटुंबांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अखेर त्यांना रस्ता मिळाला असून, स्वातंत्र्यात आल्यासारखे वाटत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

स्वातंत्र्यापासून खरपडपाड्यात दळणवळणाची सोयच नसल्याने गरोदर माता, बालक, वृद्धांना, दवाखान्यात किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पायी प्रवास करीत डोंगर चढून सात कि.मी. सांबरपाडा पाट्यावर एसटी बस गाठण्यासाठी यावे लागत होते. पाड्यात रस्ताच नसल्याने, हालअपेष्टा सहन करीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामध्ये शाळकरी विद्यार्थी व गरोदर मातांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. पाड्यात रस्ता येण्यासाठी बहुतांश जमीन ही वनविभागाची होती. अखेर पंचायत समितीकडून दीड वर्षात का होईना, सर्व प्रक्रिया पूर्ण करून पाड्याला रस्ता मिळाला आहे.

रस्ता झाल्याने त्रासातून झाली सुटकाखरपडपाड्यात इ.पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असून, या शाळेत जवळपास एकूण १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या खरपडपाड्यात रोजच येणाºया शिक्षकाला सांबरपाडा किंवा अन्य पाड्याच्या वरती वाहन ठेवून शाळेत यावे लागत होते.अंगणवाडीतील महिलांना त्यांचा आहार किंवा अन्य सामान आण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. खरपडपाड्याला रस्ताच नसल्याने, मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. मात्र, पाड्यात रस्ता झाल्याने, यातून सुुटका झाली आहे.