शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

पालघरमध्ये नद्या फुगल्या, आजही मुसळधार सुरुच, धरणातील पाण्यातून विसर्ग झाल्यास धाेका वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:23 IST

नद्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावांना मोठा धोका निर्माण होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : गेल्या चार दिवसांपासून अर्थात शुक्रवार सकाळपासून जिल्ह्यात वसई-विरार वगळता उर्वरित ठिकाणी रिपरिप सुरू असणारा पाऊस सोमवार सकाळपासून सर्वत्र दमदार सुरू झाला. या दमदार पावसाने जिल्ह्याच्या अनेक सखल भागात पाणी साचले होते, तर काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून नद्या ही धोका पातळी जवळ पोहोचल्या आहेत.

शुक्रवार सकाळी आठ वाजल्यापासून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून १७ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६७.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वसई तालुक्यात सर्वाधिक १४४.५ मिलीमीटर तर पालघर तालुक्यात ११६.७ मिलीमीटर डहाणू तालुक्यात ४३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळपासून जिल्ह्यात १६.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

उद्या मंगळवारीही जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून मुसळधार पाऊस झाल्यास नद्या इशारा पातळी पार करून धोका पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अशावेळी नद्यांनी धोका पातळी ओलांडल्यास आणि त्याचवेळी धरणातील पाण्यातून विसर्ग झाल्यास या नद्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावांना मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे.

टॅग्स :RainपाऊसpalgharपालघरDamधरणriverनदी