शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

पावसाने भातपिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 11:01 PM

शेतकरी हवालदिल । आर्थिक व मानसिक खच्चीकरण, डोंगरी पट्ट्यातही झोडपले

डहाणू/बोर्डी : अरबी समुद्रात दोन चक्र ीवादळ घोंगावत असताना शुक्र वारी रात्री नऊनंतर मुसळधार पावसाने खाचरात कापून ठेवलेल्या भातपिकाची नासाडी झाली आहे. शुक्र वारी रात्री डहाणू तालुक्यातील चिंचणीपासून ते बोर्डीपर्यंतच्या किनारी भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. शिवाय शहरासह डोंगरी पट्ट्यालाही पावसाने झोडपून काढले.

हळव्या भातपिकाचे नुकसान झाले असताना, दोन दिवस ऊन पडल्यामुळे बळीराजाने गरवे आणि निमगरव्या भाताची कापणी सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापलेले भात खाचरातील पाण्यात तरंगू लागले होते. ते चिखलातून काढताना शेतकरी कुटुंबाची दमछाक झाली. आर्थिक नुकसानीपेक्षाही पिकाची नासाडी झाल्याने शेतकरी मानसिकरित्या खचला आहे.पालघर जिल्ह्यातील भातपिक क्षेत्र ७६ हजार ५०० हेक्टर असून त्यातील ९३ टक्के लागवड झाली आहे. म्हणजे ७१ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. भात कापल्यावर काही दिवस रिमझिम पाऊस होता. त्यामुळे आर्द्रतेचे वातावरण निर्माण झाले आणि भातशेतातील कडपावर रुजलं. थोडा फार हळवे जातीचे भात कापून घरी नेल्यामुळे काहीना आधार आहे. परंतु शेतातील भात दोन, तीन उन्हे दिली तरी मिळालेल्या भातापासून मिळणारा तांदूळ हा खराब प्रतीचा व मोड झालेला असेल. कृषी विभाग आपल्या त्रिस्तरीय समिती (तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक) मार्फत नुकसानीचे पंचनामे करीत आहे. तसेच विमाधारक शेतकऱ्यांचे विमा प्रतिनिधीमार्फत पंचनामे सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मिळणारा पेंढाही गुरे खाणार नाही.दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकाºयांनी पीक नुकसानीचा पंचनामा सुरू केला आहे. आजही अनेक गावांमध्ये हे कर्मचारी न पोहचल्याने शेतकºयांमधील संताप वाढताना दिसला. या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे शेती आणि पूरक व्यवसाय तसेच स्थानिक व्यवसाय डबघाईला येणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार