शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

वसईत विनापरवाना पाण्याचे १०० टँकर सुरू, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 4:59 AM

वसई विरार परिसरात सध्या अडीचशेहून अधिक टँकर पाणी पुरवठा करीत आहेत. त्यातील शंभर टँकर विना परवाना असून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केली आहे.

वसई : वसई विरार परिसरात सध्या अडीचशेहून अधिक टँकर पाणी पुरवठा करीत आहेत. त्यातील शंभर टँकर विना परवाना असून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केली आहे.वसई विरार परिसरात अद्यापही पाण्याची टंचाई असल्याने टँकरचा धंदा तेजीत आहे. शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करताच टँकर लॉबी तलाव, विहीरी, बोअरवेलमधील दूषित पाणी पुरवठा करीत आहेत. विरार येथील पापडखिंड धरणाच्या परिसरात बेकायदेशीरपणे बोअरवेल मारून पाणी चोरले जात आहे. तर नालासोपारा शहरात टाकी पाडा आणि लोढा नगर येथील विहीरीतील दूषित पाणी पिण्यासाठी पुरवले जात आहे. पावसाळ््यात तर टँकरलॉबी अक्षरश: डबक्यातील पाणी पुरवत असल्याचा वृत्त लोकमतने पुराव्यानिशी दिले होते. टँकर लॉबीवर कुणाचाही अंकुश नसल्याने दूषित पाणी पुरवठा करून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. दुसरीकडे, टँकरमुळे काही जणांचे प्राण गेले आहेत. गेल्या महिन्यात निशात घाडीचा टँकरखाली सापडून मृत्यू झाला होता. तर गेल्याच आठवड्यात टँकरखाली सापडून नऊ वर्षाच्या मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. टँकरवाल्यांविरोधात कडक कारवाई होत नसल्याने मनमानी सुरुच राहिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार