शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

पर्यावरण हानीबद्दल उद्योग-सीईटीपीकडून १६० कोटी वसूल करा- सर्वोच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:32 AM

उद्योग व सीईटीपीकडून १६० कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशी शिफारस राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या विशेष समितीने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केली आहे.

पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीतील कारखान्यासह सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) द्वारे परिसराच्या सर्व थरावर पर्यावरणाची झालेली प्रचंड मोठी हानी भरून काढण्यासाठी तारापूर येथील उद्योग व सीईटीपीकडून १६० कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशी शिफारस राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या विशेष समितीने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केली आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून व नंतर सीईटीपीतून रासायनिक प्रदूषित सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया न करताच ते सांडपाणी नवापूरच्या समुद्रात व नाल्यात अनधिकृतपणे सोडण्यात येत असल्याने त्याचे गंभीर परिणाम किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि परिसरातील शेत जमिनीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होतात. याविरोधात पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाकडे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने २०१६ साली याचिका दाखल करून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याच्या यशाची पहिली पायरी ठरली आहे.तारापूर एमआयडीसीतील २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तारापूर एन्व्हायर्न्मेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस) कडे असून सप्टेंबर २०१९ या महिन्यात हरित लवादाने टीईपीएसला नुकसान भरपाईपोटी दहा कोटी रुपयांची दंडात्मक रक्कम भरण्याच्या दिलेल्या आदेशाविरुद्ध टीईपीएसने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर एनजीटीने नेमलेल्या समितीच्या वतीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर केले होते. तारापूर औद्योगिक क्षेत्राद्वारे झालेल्या समुद्रातील प्रदूषणापोटी ५ कोटी ९४ लाख रुपये व खाडी आणि खाडीलगत असलेल्या खाजण जमिनी व जलकुंभांच्या झालेल्या अवस्थेसाठी ७९ कोटी १० लाख रुपये असे सुमारे ८५ कोटी याबरोबरच विविध प्रकारे पर्यावरणाचे झालेले नुकसान व त्यामध्ये करायच्या सुधारणांसाठी ७५ कोटी रुपये असे १६० कोटी रुपये वसूल करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस अहवालात करण्यात आली आहे.।अहवालातील ठळक वैशिष्ट्येप्रदूषित रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाले व खाडीमार्गे समुद्रात मिसळत असल्यामुळे मत्स्यसंपदेची प्रचंड हानी.समुद्र व समुद्रकिनाऱ्यावरील पारंपरिक मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया मच्छीमारांच्या जीवनावर व मासेमारीवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम.प्रक्रिया न करताच सोडण्यात येत असलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे किनारपट्टी भागात अनेक वेळा मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी. अशा घटनांमुळे नागरिकांसह अल्प उत्पन्न असलेल्यांचे प्रदूषित झालेले अन्न व पाणी तसेच नष्ट झालेली जैवविविधता.दंडाची किमान ८८ हजार तर कमाल दहा कोटी रुपयांपर्यंत वसूल करण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे.