शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोकणातील सहा समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:15 IST

पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला.  यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे.

-  अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला.  यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे.

सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन माजी खासदार ल. शी. कोम कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. बी. बी. गुंजाळ, कॉम्रेड धनगर, माजी जि. प. सदस्य विवेक कोरे, साहित्यियाचार्य पंढरीनाथ तमोरे, लेखिका व समीक्षक डॉ. अलका मटकर आदी. उपस्थितांच्या हस्ते पार पडले. या मान्ययवरांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या सहा समाजातील लोकजीवन व लोकसंस्कृती या डॉ. भगवान राजपूत यांच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन पार पडले.

राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून पालघर जिल्ह्यातील वसई ज्युनिअर कॉलेज, पी. एल. श्रॉफ चिंचणी आणि तलासरी कॉम्रेड  गोदावरी परुळेकर या महाविद्यालयात अध्यापन केले आहे.  दरम्यान उत्तर कोकणातील कर्मभूमीत स्थानिक लोकसंस्कृतीचा अभ्यास व साहित्याचा अभ्यास करून पुणे विद्यापीठासाठी  शोधप्रबंध सादर केला होता. त्याचे रूपांतर अभ्यासग्रंथा मध्ये झाले. एकादी विशिष्ट बोली घेऊन त्यावर काम करणे खूप कठीण असून सहा समाजातील सूक्ष्म अभ्यास त्यांनी पुस्तकातून मांडला आहे. प्रत्यक्ष भेटीतून त्यांनी पायपीट करून सर्व माहिती मिळवली आहे. या संशोधनात्मक लेखनात कोरडेपणा नाही, असे गौरवोद्गार डॉ. अलका मटकर यांनी काढले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी लोकसाहित्याचं संकल केले.  ही खूप कठीण बाब असून राजपुत यांनी हे काम उत्कृष्टपणे केले आहे. पुस्तकातील लोकगीतं अप्रतिम असल्याचा उल्लेख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. तुकाराम रोंगटे यांनी यावेळी केला.

लोकसाहित्याच्या संशोधनाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या पालघर जिल्ह्यातील जाती जमातीच्या बोली  व जीवन या विषयी महाराष्ट्रातील साहित्यात मोलाची भर टाकल्याचे, त्यांचे शिष्य प्रा. मेस्त्री यांनी मनोगतातून व्यक्त केले.  आजतागायत कोणत्याच विद्यापीठाने वाक्प्रचार व म्हणींचा कोर्स सुरू केलेला नाही, मात्र राजपूत यांच्या पुस्तकात हे कोष पहावयास मिळतात हे विशेष असल्याचे पीएचडी मार्गदर्शक डॉ. बी. बी. गुंजाळ यांनी केला.

टॅग्स :palgharपालघर