शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोकणातील सहा समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:15 IST

पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला.  यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे.

-  अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला.  यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे.

सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन माजी खासदार ल. शी. कोम कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. बी. बी. गुंजाळ, कॉम्रेड धनगर, माजी जि. प. सदस्य विवेक कोरे, साहित्यियाचार्य पंढरीनाथ तमोरे, लेखिका व समीक्षक डॉ. अलका मटकर आदी. उपस्थितांच्या हस्ते पार पडले. या मान्ययवरांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या सहा समाजातील लोकजीवन व लोकसंस्कृती या डॉ. भगवान राजपूत यांच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन पार पडले.

राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून पालघर जिल्ह्यातील वसई ज्युनिअर कॉलेज, पी. एल. श्रॉफ चिंचणी आणि तलासरी कॉम्रेड  गोदावरी परुळेकर या महाविद्यालयात अध्यापन केले आहे.  दरम्यान उत्तर कोकणातील कर्मभूमीत स्थानिक लोकसंस्कृतीचा अभ्यास व साहित्याचा अभ्यास करून पुणे विद्यापीठासाठी  शोधप्रबंध सादर केला होता. त्याचे रूपांतर अभ्यासग्रंथा मध्ये झाले. एकादी विशिष्ट बोली घेऊन त्यावर काम करणे खूप कठीण असून सहा समाजातील सूक्ष्म अभ्यास त्यांनी पुस्तकातून मांडला आहे. प्रत्यक्ष भेटीतून त्यांनी पायपीट करून सर्व माहिती मिळवली आहे. या संशोधनात्मक लेखनात कोरडेपणा नाही, असे गौरवोद्गार डॉ. अलका मटकर यांनी काढले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी लोकसाहित्याचं संकल केले.  ही खूप कठीण बाब असून राजपुत यांनी हे काम उत्कृष्टपणे केले आहे. पुस्तकातील लोकगीतं अप्रतिम असल्याचा उल्लेख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. तुकाराम रोंगटे यांनी यावेळी केला.

लोकसाहित्याच्या संशोधनाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या पालघर जिल्ह्यातील जाती जमातीच्या बोली  व जीवन या विषयी महाराष्ट्रातील साहित्यात मोलाची भर टाकल्याचे, त्यांचे शिष्य प्रा. मेस्त्री यांनी मनोगतातून व्यक्त केले.  आजतागायत कोणत्याच विद्यापीठाने वाक्प्रचार व म्हणींचा कोर्स सुरू केलेला नाही, मात्र राजपूत यांच्या पुस्तकात हे कोष पहावयास मिळतात हे विशेष असल्याचे पीएचडी मार्गदर्शक डॉ. बी. बी. गुंजाळ यांनी केला.

टॅग्स :palgharपालघर