शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

उत्तर कोकणातील सहा समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:15 IST

पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला.  यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे.

-  अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला.  यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे.

सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन माजी खासदार ल. शी. कोम कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. बी. बी. गुंजाळ, कॉम्रेड धनगर, माजी जि. प. सदस्य विवेक कोरे, साहित्यियाचार्य पंढरीनाथ तमोरे, लेखिका व समीक्षक डॉ. अलका मटकर आदी. उपस्थितांच्या हस्ते पार पडले. या मान्ययवरांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी,  कुणबी, मांगेला आणि पांचाळ या सहा समाजातील लोकजीवन व लोकसंस्कृती या डॉ. भगवान राजपूत यांच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन पार पडले.

राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून पालघर जिल्ह्यातील वसई ज्युनिअर कॉलेज, पी. एल. श्रॉफ चिंचणी आणि तलासरी कॉम्रेड  गोदावरी परुळेकर या महाविद्यालयात अध्यापन केले आहे.  दरम्यान उत्तर कोकणातील कर्मभूमीत स्थानिक लोकसंस्कृतीचा अभ्यास व साहित्याचा अभ्यास करून पुणे विद्यापीठासाठी  शोधप्रबंध सादर केला होता. त्याचे रूपांतर अभ्यासग्रंथा मध्ये झाले. एकादी विशिष्ट बोली घेऊन त्यावर काम करणे खूप कठीण असून सहा समाजातील सूक्ष्म अभ्यास त्यांनी पुस्तकातून मांडला आहे. प्रत्यक्ष भेटीतून त्यांनी पायपीट करून सर्व माहिती मिळवली आहे. या संशोधनात्मक लेखनात कोरडेपणा नाही, असे गौरवोद्गार डॉ. अलका मटकर यांनी काढले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी लोकसाहित्याचं संकल केले.  ही खूप कठीण बाब असून राजपुत यांनी हे काम उत्कृष्टपणे केले आहे. पुस्तकातील लोकगीतं अप्रतिम असल्याचा उल्लेख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. तुकाराम रोंगटे यांनी यावेळी केला.

लोकसाहित्याच्या संशोधनाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या पालघर जिल्ह्यातील जाती जमातीच्या बोली  व जीवन या विषयी महाराष्ट्रातील साहित्यात मोलाची भर टाकल्याचे, त्यांचे शिष्य प्रा. मेस्त्री यांनी मनोगतातून व्यक्त केले.  आजतागायत कोणत्याच विद्यापीठाने वाक्प्रचार व म्हणींचा कोर्स सुरू केलेला नाही, मात्र राजपूत यांच्या पुस्तकात हे कोष पहावयास मिळतात हे विशेष असल्याचे पीएचडी मार्गदर्शक डॉ. बी. बी. गुंजाळ यांनी केला.

टॅग्स :palgharपालघर