शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

बुलेट ट्रेनसंदर्भातील जनसुनावणी गुंडाळली; पर्यावरण संस्था संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 11:12 PM

प्रकल्प रद्द करण्याची मागणी

वसई : बहुचर्चित मुंंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ज्यांच्या जमिनी अधिग्रहित होऊन ज्यांना नोटीस देण्यात आली आहे, त्यांच्यासाठी मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पर्यावरण संवर्धन समिती, भूमिपुत्र बचाव संघटना आदी संस्थांना त्याची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी याला प्रचंड विरोध करत ही सुनावणी गुंडाळली.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन’ संदर्भातील जनसुनावणी मंगळवारी सकाळी ११ वाजता वसई पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याची माहिती पर्यावरण संवर्धन समिती, भूमिपुत्र बचाव संघटना आणि इतर नागरिकांना मिळताच तेही तेथे हजर झाले. कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे ती पुन्हा एकदा गुंडाळण्यात आली.जनसुनावणीची कोणतीही माहिती आम्हाला न देता शासन आमची सपशेल दिशाभूल करीत असल्याची संतप्त प्रतिक्रि या संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली. या जनसुनावणीस सामोरे जाताना पर्यावरण संवर्धन समिती समन्वयक समीर वर्तक यांनी बुलेट ट्रेन आमच्या हिताची नसल्याचे सांगितले. तसेच कुणालाही न सांगता जनसुनावणी ठेवलीच कशी? बुलेट ट्रेनसाठी जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका याआधीही आम्ही घेतली असताना आता पुन्हा अशा सुनावण्या घेऊन सरकारला काय साध्य करायचे आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. म्हणूनच ही जनसुनावणी रद्द करण्याचे आवाहनही केले.उपस्थित आदिवासी एकता परिषद पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्ता सांबरे यांनी आदिवासी समाजाला त्रास देऊ नका असे सांगत बुलेट ट्रेनला विरोध केला. तसेच उपस्थित बाधित शेतकऱ्यांनीही जमीन देण्यास विरोध केल्याने उपजिल्हाधिकाºयांनी सर्वांचा बुलेट ट्रेनला विरोध आहे, असे नमूद करून शेवटी ही जनसुनावणी संपविली. जनसुनावणी नंतर भूमिपुत्र बचाव आंदोलन, पर्यावरण संवर्धन समिती आणि आदिवासी एकता परिषदेतर्फे बुलेट ट्रेन रद्द करा या मागणीची पत्रेही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.या जनसुनावणीसाठी वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे, वसई तहसीलदार किरण सुरवसे तसेच पर्यावरण संवर्धन समितीतर्फे फारूक मुल्ला, विक्रांत चौधरी, अभिजित घाग, दर्शन राऊत, आदिवासी एकता परिषदेच्या वसई तालुका उपाध्यक्ष वंदना जाधव व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक, स्वाभिमानी वसईकरचे रॉजर परेरा आणि विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.वसई पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेली बुलेट ट्रेन संदर्भातील जनसुनावणी ही नियम १६ क नुसार ज्यांच्या जमिनी जात आहेत आणि ज्या धारकांना तशा नोटिसी देण्यात आल्या आहेत, त्यांच्यासाठी होती. तर संवर्धन समिती आणि भूमिपुत्र संघटना यांनी म्हटले की, आम्हाला बुलेट ट्रेन नको. वास्तविक, हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे, तरीही आम्ही सुनावणीवेळी समिती आणि संघटना प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे सभा उधळून लावली असे म्हणणे संयुक्तिक नाही.- स्वप्नील तांगडे, वसई उपविभागीय अधिकारी

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन