शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

तंटामुक्त पुरस्काराच्या ४७ लाखांचा हिशेब द्या! गाव समित्या उरल्या नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:12 IST

  महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यातील शिवली १ लाख, नाशेरा १ लाख, उधळे २ लाख, गोमघर वाशिंद २ लाख, करोळ पाचघर २ लाख, सातूर्ली ३ लाख, हिरवे पिंपळ पाडा ३ लाख, आडोशी ३ लाख, कारेगाव ३ लाख, सायदे ३ लाख, सूर्यमाळ ३ लाख, साखरी ३ लाख, पोशेरा ३ लाख, खोच ४ लाख, मोरहंडा ५ लाख, दांडवळ - नीळमाती २ लाख, कुर्लोद १ लाख अशा १७ ग्रामपंचायतीना वर्ष २०१३-१४ मध्ये ४७ लाखाचा निधी उपलब्ध झाला होता.

मोखाडा -  महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यातील शिवली १ लाख, नाशेरा १ लाख, उधळे २ लाख, गोमघर वाशिंद २ लाख, करोळ पाचघर २ लाख, सातूर्ली ३ लाख, हिरवे पिंपळ पाडा ३ लाख, आडोशी ३ लाख, कारेगाव ३ लाख, सायदे ३ लाख, सूर्यमाळ ३ लाख, साखरी ३ लाख, पोशेरा ३ लाख, खोच ४ लाख, मोरहंडा ५ लाख, दांडवळ - नीळमाती २ लाख, कुर्लोद १ लाख अशा १७ ग्रामपंचायतीना वर्ष २०१३-१४ मध्ये ४७ लाखाचा निधी उपलब्ध झाला होता. परंतु एवढा मोठा भरीव निधी उपलब्ध होऊन देखील या निधीला भ्रष्टचाराची कीड लागल्याने तंटामुक्त गाव समित्या नावालाच उरल्या असून मुख्य उदेशालाच हरताळ फासण्याचे काम केले गेले आहे .वर्ष २००७ मध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारने गावातील फौजदारी, महसूल, दिवाणी व इतर भांडणे वादवाद गावातच मिटवणे हा उद्देश समोर ठेऊन तंटामुक्ती पुरस्कार योजना कार्यान्वित केली होती. परंतु संबधितानी आपलेच खिसे भरल्याने ही योजना येथे बारगळली आहे.सुरवातीला पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना एक लाखाचे बक्षीस दिले जात होते. २००३ मध्ये अनुदानात वाढ करून तो आकडा पाच लाख रु पये करण्यात आला. ग्रामसभेत तंटामुक्त समिती तयार करून गाव तंटामुक्त झाल्याचा शांतता अहवाल पाठवल्या नंतर निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी देण्यात आला. याच धर्तीवर मोखाडा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींना ४७ लाख रु पयांचा निधी देण्यात आला व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या परिशिष्ट ७ पत्रका नुसार खर्चचा विनियोग करणे बंधनकारक होत. यातील १५ टक्के रक्कम ही योजनेच्या प्रचारासाठी खर्च करायची होती. परंतु यावर हा खर्च झालाच नाही. तसेच, बांधकाम दुरूस्तीवर हा खर्च करणे अपेक्षित नसताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ग्रामसेवक यांनी गाव समितीला विश्वासात न घेता ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनेची केलेली कामे याच निधीतून केल्याचे दाखविली आहे.तहसीलदार, गटविकास अधिकारी अध्यक्ष असलेल्या तालुका कमिटीकडे केलेल्या कामाचा लेखा जोखा हा तालुका कमिटीचे सचिव (ठाणे अंमलदार) यांचे कडे पाठवायचा आहे परंतु असे असताना किती ग्रामपंचायतीने हा अहवाल पाठवला त्याची चौकशी झाल्यास घोटाळा बाहेर येऊ शकतो, दरम्यान तहसीलदार पी. जी. कोरडे यांनी २०१२-१३ तील रिपोर्टची अपनास माहिती नसल्याचे लोकमतला सागितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार