शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

तंटामुक्त पुरस्काराच्या ४७ लाखांचा हिशेब द्या! गाव समित्या उरल्या नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:12 IST

  महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यातील शिवली १ लाख, नाशेरा १ लाख, उधळे २ लाख, गोमघर वाशिंद २ लाख, करोळ पाचघर २ लाख, सातूर्ली ३ लाख, हिरवे पिंपळ पाडा ३ लाख, आडोशी ३ लाख, कारेगाव ३ लाख, सायदे ३ लाख, सूर्यमाळ ३ लाख, साखरी ३ लाख, पोशेरा ३ लाख, खोच ४ लाख, मोरहंडा ५ लाख, दांडवळ - नीळमाती २ लाख, कुर्लोद १ लाख अशा १७ ग्रामपंचायतीना वर्ष २०१३-१४ मध्ये ४७ लाखाचा निधी उपलब्ध झाला होता.

मोखाडा -  महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यातील शिवली १ लाख, नाशेरा १ लाख, उधळे २ लाख, गोमघर वाशिंद २ लाख, करोळ पाचघर २ लाख, सातूर्ली ३ लाख, हिरवे पिंपळ पाडा ३ लाख, आडोशी ३ लाख, कारेगाव ३ लाख, सायदे ३ लाख, सूर्यमाळ ३ लाख, साखरी ३ लाख, पोशेरा ३ लाख, खोच ४ लाख, मोरहंडा ५ लाख, दांडवळ - नीळमाती २ लाख, कुर्लोद १ लाख अशा १७ ग्रामपंचायतीना वर्ष २०१३-१४ मध्ये ४७ लाखाचा निधी उपलब्ध झाला होता. परंतु एवढा मोठा भरीव निधी उपलब्ध होऊन देखील या निधीला भ्रष्टचाराची कीड लागल्याने तंटामुक्त गाव समित्या नावालाच उरल्या असून मुख्य उदेशालाच हरताळ फासण्याचे काम केले गेले आहे .वर्ष २००७ मध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारने गावातील फौजदारी, महसूल, दिवाणी व इतर भांडणे वादवाद गावातच मिटवणे हा उद्देश समोर ठेऊन तंटामुक्ती पुरस्कार योजना कार्यान्वित केली होती. परंतु संबधितानी आपलेच खिसे भरल्याने ही योजना येथे बारगळली आहे.सुरवातीला पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना एक लाखाचे बक्षीस दिले जात होते. २००३ मध्ये अनुदानात वाढ करून तो आकडा पाच लाख रु पये करण्यात आला. ग्रामसभेत तंटामुक्त समिती तयार करून गाव तंटामुक्त झाल्याचा शांतता अहवाल पाठवल्या नंतर निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी देण्यात आला. याच धर्तीवर मोखाडा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींना ४७ लाख रु पयांचा निधी देण्यात आला व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या परिशिष्ट ७ पत्रका नुसार खर्चचा विनियोग करणे बंधनकारक होत. यातील १५ टक्के रक्कम ही योजनेच्या प्रचारासाठी खर्च करायची होती. परंतु यावर हा खर्च झालाच नाही. तसेच, बांधकाम दुरूस्तीवर हा खर्च करणे अपेक्षित नसताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ग्रामसेवक यांनी गाव समितीला विश्वासात न घेता ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनेची केलेली कामे याच निधीतून केल्याचे दाखविली आहे.तहसीलदार, गटविकास अधिकारी अध्यक्ष असलेल्या तालुका कमिटीकडे केलेल्या कामाचा लेखा जोखा हा तालुका कमिटीचे सचिव (ठाणे अंमलदार) यांचे कडे पाठवायचा आहे परंतु असे असताना किती ग्रामपंचायतीने हा अहवाल पाठवला त्याची चौकशी झाल्यास घोटाळा बाहेर येऊ शकतो, दरम्यान तहसीलदार पी. जी. कोरडे यांनी २०१२-१३ तील रिपोर्टची अपनास माहिती नसल्याचे लोकमतला सागितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार