शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

काही वर्षांपासून किनाऱ्याची धूप : प्रकल्पांमुळे निसर्गावर घातला जाणार घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 23:42 IST

पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो.

डहाणू/बोर्डी : पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो. काही वर्षांपासून किनाºयाची धूप, बेकायदा बांधकाम यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून हा प्रश्न संवेदनशीलपणे न हाताळल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.उत्तर कोकणातील डहाणू हा तालुका राज्याच्या सागरी पर्यटनाचे कोंदण म्हणून ओळखला जातो. रुपेरी वाळू, कधी दगडी तर कधी अथांग किनारा, सुरू, कांदळवनाची हिरवी भिंत, चिकू आणि माडांची झालर यामुळे याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. तर समुद्रातील मासे आणि मोसमी फळांची मेजवानी मिळत असल्याने विविध पर्यटन हंगामात दरवर्षी पर्यटक दाखल होतात.कृषी उत्पादने आणि फळ प्रक्रिया उद्योगासह बागायतीच्या जोडीला इको टूरिझमची जोड देऊन हॉटेलिंग व्यवसायाची पाळेमुळे पसरू लागली आहेत.तरूण पिढी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन या व्यवसायात उतरली आहेत. पूर्वी जवळच्या मुंबई आणि गुजरातच्या शहरातून येणारे पर्यटक आता देश-विदेशातून येऊ लागले आहेत. वाळूशिल्प, तारपा, घोरनृत्य, दशावतार, वेगवेगळ्या यात्रा आणि चिकू महोत्सवासारख्या इव्हेंटमधून पर्यटन व्यवसायाला झळाळीच आली आहे.असे असताना मोठ्या प्रमाणात समुद्रातून होणा-या रेती चोरीमुळे किनाºयाची हानी आणि धूप होऊन दरवर्षी शेकडो झाडे जमीनदोस्त होतात. समुद्रातील तेल गळतीने तवंग पसरून विद्रुपीकरण होते. कायदा पायदळी तुडवून भराव टाकल्याने पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकारण हटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पर्यावरणाचा बळी घेतला जात असल्याची भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात येऊ घातलेले विविध प्रकल्प आणि उद्योगधार्जिण्या धोरणाचा हट्ट काही मोजक्या घटकांनी धरल्याने समृद्ध असलेले पर्यावरण टिकवायचे कसे? जर तसे झाले तर पर्यटन व्यवसायाला परिणाम भोगावे लागतील.डहाणू समुद्र किना-यावर जी सुरूची झाडे आहेत ती चोरट्या वाळू उपशामुळे भरतीच्या लाटेत उन्मळून पडू लागली आहेत. प्रशासकीय यंत्रणेचे असलेले अभय व अनास्थेमुळे किनारे बकाल होऊ लागले आहेत. त्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारे असणे आवश्यक आहे. डहाणू तालुका पर्यावरण दक्षता प्राधिकरणामुळे अंकुश राहिला आहे. हे प्राधिकरण हटविण्यासाठी राजकीय खेळी खेळली जात आहे. यामुळे पुढे डहाणूतील स्थानिकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.- प्रवीण ना. दवणे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार