शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

No Entry: इथे राजकारण्यांना प्रवेश बंदी! इमारतीत पाणी तुंबण्याची समस्या न सोडवल्याने रहिवाशांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:19 IST

No Entry for politicians banner: मीरा रोडची शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेश बंदी जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड - मीरा रोडच्या शांती नगर सेक्टर ५ मधील दोन इमारतीच्या रहिवाशांनी राजकीय पक्ष व राजकारण्यांना इमारतीच्या आवारात येण्यास बंदी घातली आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ह्या दोन्ही इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असताना राजकारण्यांनी केवळ पोकळ अश्वासनेच दिल्याने लोक संतप्त झाले आहेत. (flood water problem not solved by politicians, Mira road ShantiNagar Society banned there entry. )

 मीरा रोडची शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेश बंदी जारी केली आहे. तश्या आशयाचे फलक इमारतींच्या दर्शनी भागांवर लावण्यात आले आहेत. ह्या इमारतीच्या आवारात व तळमजल्यावरील घरांमध्ये दर पावसाळ्यात पाणी साचते.  पाणी साचण्याचे प्रकार हा अनेक वर्षांपासून होत असताना गेल्या तीन-चार वर्षांपासून तर पाणी साचण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. 

 पावसाळ्यात तळमजल्यावर असलेल्या घरांमध्ये तर तीन फुटाच्या आसपास पाणी साचत आहे.  त्यातच शौचालयातील मैला व सांडपाणी हे उलट दिशेने येऊन घरांमध्ये पसरते. साचलेले पाणी तासनतास कमी होत नाही. काहीजण तर घरातच लहान मोटर लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. 

 घरात साचणाऱ्या पाण्यामुळे फर्निचर, अंथरूण, कपडे, फ्रिज व धान्य आदी साहित्य खराब होऊन मोठे नुकसान होत आहे. लोकांचे हाल होत आहेत. तळमजल्यावरील घर खरेदी करायला कोणी येत नाही. काही रहिवाशी तर मिळेल ती किंमत घेऊन घर विकून गेले.

 शांतीनगर सेक्टर ५ मधील या दोन इमारतींच्या समोर शीतल नगर आहे. या दोन्ही वसाहत दरम्यान सार्वजनिक रस्ता आहे.  या ठिकाणी असलेल्या नाल्याची उंची कमी करून रस्त्याच्या समांतर घेतल्याने पाणी वेगाने आमच्या घरात शिरते असे भूमिका व गोदावरी इमारतीतील राहिवाश्यांचा दावा आहे. स्थानिक नगरसेवकां पासून महापौर, आमदार, आयुक्त आदींना निवेदने - गाऱ्हाणी मांडून झाली आहे. पण पाणी तुंबण्याचे काही थांबलेले नाही

वास्तविक शीतल नगर व शांतीनगर या जुन्या वसाहती आता सखल झाल्या आहेत.  महापालिकेने रस्ते व गटारे यांचा इमारतींच्या उंचीशी समतोल न ठेवता ते उंच केले आहेत.  त्यातच पावसाळ्यात येथील पाणी जाण्याचे नाले हे अतिशय अरुंद आहेत. या नाल्याची साफसफाई सुद्धा काटेकोरपणे केली जात नाही. पुढे या नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक तेवढ्या रुंदी आणि खोलीचे नालेच बांधण्यात आलेले नाहीत. 

गणेश पै (स्थानिक रहिवाशी) -  गेल्या पंचवीस वर्षांपासून पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रकाराने आम्ही त्रासलो आहोत. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून शीतल नगर येथील नाल्याची उंची कमी केल्याने आमच्या कडे पाणी वाहून येऊन पाण्याची पातळी वाढली आहे. जेणेकरून रहिवाशांना नुकसान व अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. नेते मंडळी केवळ पोकळ आश्वासन देत असल्याने आता रहिवाशांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच आम्ही सर्व रहिवाशांनी राजकारणी व निवडणुकीत उमेदवार आदींना इमारतीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी मनाई केली आहे.

टॅग्स :floodपूरMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliticsराजकारण