शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

No Entry: इथे राजकारण्यांना प्रवेश बंदी! इमारतीत पाणी तुंबण्याची समस्या न सोडवल्याने रहिवाशांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:19 IST

No Entry for politicians banner: मीरा रोडची शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेश बंदी जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड - मीरा रोडच्या शांती नगर सेक्टर ५ मधील दोन इमारतीच्या रहिवाशांनी राजकीय पक्ष व राजकारण्यांना इमारतीच्या आवारात येण्यास बंदी घातली आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ह्या दोन्ही इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असताना राजकारण्यांनी केवळ पोकळ अश्वासनेच दिल्याने लोक संतप्त झाले आहेत. (flood water problem not solved by politicians, Mira road ShantiNagar Society banned there entry. )

 मीरा रोडची शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेश बंदी जारी केली आहे. तश्या आशयाचे फलक इमारतींच्या दर्शनी भागांवर लावण्यात आले आहेत. ह्या इमारतीच्या आवारात व तळमजल्यावरील घरांमध्ये दर पावसाळ्यात पाणी साचते.  पाणी साचण्याचे प्रकार हा अनेक वर्षांपासून होत असताना गेल्या तीन-चार वर्षांपासून तर पाणी साचण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. 

 पावसाळ्यात तळमजल्यावर असलेल्या घरांमध्ये तर तीन फुटाच्या आसपास पाणी साचत आहे.  त्यातच शौचालयातील मैला व सांडपाणी हे उलट दिशेने येऊन घरांमध्ये पसरते. साचलेले पाणी तासनतास कमी होत नाही. काहीजण तर घरातच लहान मोटर लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. 

 घरात साचणाऱ्या पाण्यामुळे फर्निचर, अंथरूण, कपडे, फ्रिज व धान्य आदी साहित्य खराब होऊन मोठे नुकसान होत आहे. लोकांचे हाल होत आहेत. तळमजल्यावरील घर खरेदी करायला कोणी येत नाही. काही रहिवाशी तर मिळेल ती किंमत घेऊन घर विकून गेले.

 शांतीनगर सेक्टर ५ मधील या दोन इमारतींच्या समोर शीतल नगर आहे. या दोन्ही वसाहत दरम्यान सार्वजनिक रस्ता आहे.  या ठिकाणी असलेल्या नाल्याची उंची कमी करून रस्त्याच्या समांतर घेतल्याने पाणी वेगाने आमच्या घरात शिरते असे भूमिका व गोदावरी इमारतीतील राहिवाश्यांचा दावा आहे. स्थानिक नगरसेवकां पासून महापौर, आमदार, आयुक्त आदींना निवेदने - गाऱ्हाणी मांडून झाली आहे. पण पाणी तुंबण्याचे काही थांबलेले नाही

वास्तविक शीतल नगर व शांतीनगर या जुन्या वसाहती आता सखल झाल्या आहेत.  महापालिकेने रस्ते व गटारे यांचा इमारतींच्या उंचीशी समतोल न ठेवता ते उंच केले आहेत.  त्यातच पावसाळ्यात येथील पाणी जाण्याचे नाले हे अतिशय अरुंद आहेत. या नाल्याची साफसफाई सुद्धा काटेकोरपणे केली जात नाही. पुढे या नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक तेवढ्या रुंदी आणि खोलीचे नालेच बांधण्यात आलेले नाहीत. 

गणेश पै (स्थानिक रहिवाशी) -  गेल्या पंचवीस वर्षांपासून पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रकाराने आम्ही त्रासलो आहोत. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून शीतल नगर येथील नाल्याची उंची कमी केल्याने आमच्या कडे पाणी वाहून येऊन पाण्याची पातळी वाढली आहे. जेणेकरून रहिवाशांना नुकसान व अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. नेते मंडळी केवळ पोकळ आश्वासन देत असल्याने आता रहिवाशांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच आम्ही सर्व रहिवाशांनी राजकारणी व निवडणुकीत उमेदवार आदींना इमारतीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी मनाई केली आहे.

टॅग्स :floodपूरMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliticsराजकारण