शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Mob Lynching: पालघरमधील त्या गावातील भाजप महिला सरपंचाच्या जीवितास धोका​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:25 IST

आरोपींची नावे भाजपच्या सरपंचाने दिल्याच्या संशयावरून तिचे घरदार फोडून दोन्ही लहान मुलासह सर्वाना जीवे ठार मारू अशी धमकी अटक केलेल्या आरोपीचे नातेवाईक देत असल्याचा आरोप

- हितेंन नाईक

पालघर - जिल्ह्यातील गड चिंचले येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडा नंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे भाजपच्या सरपंचाने दिल्याच्या संशयावरून तिचे घरदार फोडून दोन्ही लहान मुलासह सर्वाना जीवे ठार मारू अशी धमकी अटक केलेल्या आरोपीचे नातेवाईक आपल्याला दिल्याने आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

दादरा नगर हवेली च्या सीमेवर आणि डहाणू तालुक्यात असलेल्या गड चिंचले मध्ये साधू आणि त्या चालकाची कार वन विभागाने अडविल्या नंतर हळूहळू जमाव जमू लागला आपल्या मुलांच्या किडण्या काढण्यासाठी आल्याच्या संशयाने त्यांना जमावाने ताब्यात घेतले.सरपंच म्हणून त्यांना बोलाविण्यात आले असता कायदा हातात घेऊ नका पोलिसांना येऊ द्या असे त्यांनी सांगितल्या नंतर लोक माझ्यावर भडकले.तुमच्या दोन्ही मुलांना त्या साधूच्या ताब्यात द्या असे सांगून जमाव आक्रमक झाल्याचे सरपंचाचे म्हणणे आहे.

16 एप्रिल रोजीरात्री 8.45 दरम्यान मारहाण व दगडफेकीला सुरुवात झाल्याचे सर्व चित्रण वन विभागाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्डिंग झाले असून लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने व आक्रमक झाल्याने मी घरी निघून गेली.पोलीस आल्यानंतर मला पुन्हा बोलावण्यात आले.त्यावेळी दादा आला,दादा आला म्हणून उपस्थित लोकांनी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी आल्यावर आरोळ्या ठोकल्याचे सरपंचाने सांगितले.त्यांच्या उपस्थितीत तिन्ही लोक जिवंत होते.मात्र त्यांच्या समोर पोलिसांच्या गाडीत बसलेल्या त्या तिन्ही लोकांवर जमावाने हल्ला केल्या नंतर जिप सदस्य चौधरी यांनी लोकांना थांबविण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे सरपंच चौधरी ह्यांनी लोकमत ला सांगितले. जमाव खूपच आक्रमक झाल्याने मलाही मारहाण होते की काय ह्या भीतीने मी घर गाठले.

ह्या प्रकरणी 5 प्रमुख आरोपीसह 101 आरोपी आणि 9 अल्पवयीन मुलाच्या विरोधात खून,खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्वाना अटक करण्यात आली आहे.ह्या प्रकरणातील सर्व आरोपींची नावे सरपंचांनी पोलिसांना दिल्याचा आरोप सरपंच चौधरी वर केला जात असून गावातील काही महिला आणि पुरुषांनी माझ्या घरात येऊन अटक केलेल्या सर्वाना सोडवं अन्यथा तुझे घरदार तोडून-फोडून तुझ्या मुलासह सर्वाना ठार मारू अशी धमकी दिल्याचे सरपंचांनी लोकमत ला सांगितले.माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी सरपंचांनी पोलिसांकडे केली असताना पोलिसांकडून अजूनही आपल्याला संरक्षण दिले गेले नसल्याचे सरपंचांनी सांगितले.

ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असून आमदार सिपीएम तर जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी पक्षाचे आहेत.भाजप चे खासदार,आमदार असे अनेक वर्षांपासूनचे वर्चस्व निघून गेल्याने आता सेना, राष्ट्रवादी व सिपीएम ने वर्चस्व राखले आहे.त्यामुळे भाजप विरुद्ध विकास आघाडी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्र