शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

पालघर जिल्ह्यात जलयुक्त शिवार फसली, दुष्काळातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:29 AM

जलयुक्त शिवार योजना पालघर जिल्ह्यात फसली आहे. कारण एक थेंबही पाण्याची साठवणूक नाही.

जव्हार - २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा आदी तालुक्यात कृषी विभाग, लघुसिंचन (जि.प.), ग्रामीण पाणीपुरवठा (जि.प.), वन विभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण विभाग आदी विभागांतर्गत ५० गावामध्ये २ हजार ३४३ कामे हाती घेण्यात आली होती. त्यासाठी ४७ कोटी ४९ लाख १७ हजाराचा खर्च करण्यात आला होता. २०१६-१७ मध्ये ३० गावामध्ये जलयुक्त शिवारची ९१२ कामे हाती घेण्यात आली असून २४ कोटी २३ लाख ५९ हजाराच्या निधीचा खर्च करण्यात आला होता. तरीही जलयुक्त शिवार योजना पालघर जिल्ह्यात फसली आहे. कारण एक थेंबही पाण्याची साठवणूक नाही.२०१७-१८ मध्ये १ कोटी ४९ लाखाचा निधी खर्च तर २०१८-१९ सालासाठी १ हजार ७१२ कामे पूर्ण झाली असून ३२९ कामे प्रगती पथावर असल्याचे व जलयुक्त शिवार योजनेवर खर्च करण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त सिद्धिविनायक ट्रस्ट, खाजगी कंपन्या, विकासक आदीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा या जलयुक्त शिवारच्या योजनेतून करण्यात आला होता. जिल्ह्यात पावसाची सरासरी २ हजार ४५८.२ असून २०१४ मध्ये २२४८.८ (९१.५ २०१५ मध्ये १६९९.८ (६९.१०%), २०१६ मध्ये २९७३.८ (१२०.९%), २०१७ मध्ये २८६१.६ (११६.४%) तर २०१८ मध्ये २३१४.६ (९४.२%) इतका पाऊस पडला आहे. यावर्षी आॅगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने वगळता जिल्ह्यात चांगला पाऊस पडला असताना जलयुक्त शिवार योजनेच्या कोट्यवधी रुपयांची कामे व्यर्थ ठरली आहेत. पावसाच्या पाण्याच्या साठवणीचे योग्य नियोजन करून पिण्याचे पाणी, सिंचन क्षेत्राची वाढ, त्यातून शेती-बागायती पिकवून स्थानिकांच्या हाताला काम देऊन स्थलांतर, कुपोषण रोखण्याचा उदात्त हेतू शासनाचा असला तरी या जलयुक्त शिवार योजनेतून एक थेंब पाणी साठवून ठेवण्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधींना यश येऊ नये. कोटीच्या कोटीची उड्डाणे करीत या योजना राबवून आजही या भागातील लोकांना एक थेंब पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.चारा छावण्यांची आवश्यकता नाही२०१८ सालच्या खरीप हंगामात दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्या बाबत निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मागितला होता. परंतु जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर ह्यांनी डिसेंबर २०१८ ते जून २०१९ पर्यंत चाºयाची उपलब्धता असून चारा छावण्याची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdroughtदुष्काळ