शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

पालघर जिल्ह्यात ९७ हजार परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:40 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा येत्या १ मार्चपासून सुरु होणार असून १२ वीच्या

हितेन नाईकपालघर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा येत्या १ मार्चपासून सुरु होणार असून १२ वीच्या परीक्षेला पालघर जिल्ह्यातून ३८ परीक्षा केंद्रातून सुमारे ३९ हजार ०६३ विद्यार्थी तर दहावीच्या परीक्षेला ९८ केंद्रातून सुमारे ५८ हजार २६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत १२ वीची तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे. या सुरळीत व्हाव्यात या साठी शिक्षण विभाग सज्ज झाला असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ शाळांमधील परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील हिरवे मोखाडा, करेगाव मोखाडा, विनवळ मोखाडा, पालघर तालुक्यातील आगरवाडी, वसई तालुक्यातील ज्ञानोदय नालासोपारा तर जव्हार तालुक्यातील दाभोसा या परीक्षा केंद्रांना संवेदनशील केंद्रे म्हणून शिक्षण विभागाने घोषित केले आहे. या परीक्षा केंद्रावर दोन भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३८ केंद्रातून ३९ हजार ०६३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तिची जिल्ह्यातील सर्वाधिक २० केंद्रे वसई तालुक्यात आहेत. सुमारे २०,७०६ विद्यार्थी आहेत. वाडा तालुक्यातील ३ केंद्रातून २ हजार ९३६ , मोखाड्याच्या ३ केंद्रातून १ हजार १०३ , विक्रमगड मधील २ केंद्रातून १ हजार ५५७, जव्हारच्या १ केंद्रातून १ हजार २१२, तलासरीच्या ३ केंद्रातून १ हजार ९६९ , डहाणू येथील ४ केंद्रातून ३ हजार २१२, पालघरच्या २ केंद्रातून ६ हजार ३६९, अशा ३८ केंद्रातून ३९ हजार ०६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.दहावी परीक्षेला जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ९८ केंद्रातून ५८ हजार २६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्वाधिक वसई तालुक्यात असून ४९ केंद्रातून २९ हजार ६७२ परीक्षा देणार आहेत. तर वाडा तालुक्यातील ६ केंद्रातून ३ हजार ४८०, मोखाडा तालुक्यातील ४ केंद्रातून १ हजार ५७२, विक्रमगड तालुक्यातील ६ केंद्रातून २ हजार ७२५, जव्हार तालुक्यातील ४ केंद्रातून २ हजार २२७ , तलासरी तालुक्यातील ५ केंद्रातून ४ हजार ४५५ , डहाणू तालुक्यातील ९ केंद्रातील ५ हजार ६८५, पालघर तालुक्यातील १५ केंद्रातील ८ हजार ४५२ परीक्षा देतील.विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र जवळ असावे म्हणून जिल्हयात बारावीची चार तर दहावीची बारा नवीन केंद्रे या वर्षांपासून सुरू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त परीक्षा द्यावी. तसेच काही अडचणी उद्भवल्यास मंडळाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी केले आहे.अशी असेल जिल्ह्यातील चोख व्यवस्थाप्रत्येक परीक्षा केंद्रात एक संचालक नियुक्त करण्यात आला असून सुमारे २५ विद्यार्थ्यांमागे एक पर्यवेक्षक तसेच केंद्रावर एक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका संचांसाठी जिल्ह्यात १२ कस्टडी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात १ तर पालघर व वसई तालुक्यात प्रत्येकी दोन कस्टडी चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या आहेत. शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची दोन भरारी पथके तयार करण्यात आली असून त्यात सुमारे आठ जणांचा ताफा समाविष्ट करण्यात आलेला आहे.