शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

पालघर जिल्हा पर्यटनाचे कंबरडे मोडले, जिल्हाधिकाऱ्यांचा तुघलकी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 02:57 IST

पर्यटन वाढीद्वारे रोजगार निर्माण करण्यासाठी शासन काट्यवधी रु पयांचा खर्च एके ठिकाणी करीत असताना पालघर जिल्हाधिका-यांनी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आदीं पासून १ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करीत पर्यटकांना बंदी घातली आहे.

पालघर - पर्यटन वाढीद्वारे रोजगार निर्माण करण्यासाठी शासन काट्यवधी रु पयांचा खर्च एके ठिकाणी करीत असताना पालघर जिल्हाधिका-यांनी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आदीं पासून १ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करीत पर्यटकांना बंदी घातली आहे. पर्यटन स्थळी बंदोबस्त, सोयीसुविधा निर्माण करणे गरजेचे असताना उलट त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आल्याने पर्यटकामध्ये मोठी नाराजी पसरली आहे.शासन एके ठिकाणी राज्यात लोकांचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी प्रयत्नशील असताना आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून वार्षिक ६ कोटींचा निधी खर्च करीत असताना जिल्हाधिकाºयांनी १९७३ चे कलमान्वये १४४ चे आदेश जारी केले आहेत. धरणे, धबधबे, तलाव आदी ठिकाणा पासून १ किमी चा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करण्यात आला असून सप्टेबर पर्यंत हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा निर्णय तुघलकी निर्णय असल्याच्या प्रतिक्रि या पर्यटन प्रेमी मधून उमटत आहेत.वसई येथील चिंचोटी धबधब्यावर प्रत्येक वर्षी प्रमाणे विकेंड साजरा करण्यासाठी गेलेले १०० हुन अधिक पर्यटक अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी अचानक मुसळधार पावसाचा वेग वाढून धबधब्याचा प्रवाह वाढल्याने चिंचोटी येथे पर्यटक अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त ठेवून पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असताना जमाव बंदीची (कलम १४४) भिती घालून पर्यटकांना रोखण्यात आल्याने तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.काश्मीर मधून वर्षभर अस्थिर वातावरण राहून अनेक अतिरेकी कारवाया होत असताना शासन मग काश्मिरातील पर्यटन स्थळे बंद करते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील जव्हार हे मिनी माथेरान म्हणून सर्वत्र परिचित असून वर्षाचे बाराही महिने इथे पर्यटकांचा राबता असतो. काळमांडवी, केळीचा पाडा, हिरड पाडा, दाभोसा आदी ओथंबून वाहणारे धबधबे, खडखड सारखे निसर्गाचे नयनरम्य ठिकाण असलेले धरण पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. तसेच विक्र मगड मधील पलूचा धबधबा, पालघर मधील वाघोबा खिंड धबधबा, झंजरोली, गांजे ढेकाळे धरण, बोईसर चे ऐना, दाभोन धबधबे, वसई तील चिंचोटी, तुंगारेश्वर धबधबे, वाड्यातील तिळमाळ धबधबा, ही स्थाने पर्यटकांसाठी पावसाळ्यातील विकेंड साजरी करण्यासाठी पर्वणीचे ठरतात. त्यामुळे कुटुंबीय, तरु णांचे ग्रुप, वर्षा सहली वाले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात.निसर्गाचा आस्वाद घेत असताना काही धांगडधिंगा करणारे ग्रुप या ठिकाणच्या मजेत व्यत्यय आणीत असले तरी सरसकट सर्व पर्यटक प्रेमींना दोन महिन्यासाठी या सर्व बाबी पासून दूर ठेवणे ही काही उपाय योजना नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.प्रतिबंधित करण्यात आलेली सर्व ठिकाणे ही आदिवासी बहुल भागातील असल्याने रानावनात पिकविलेला कंटोळी, शेवळा, कुवारीची भाजी, काकडी, फळे, फुले आदी भाजीपाला आदिवासी बांधव या पर्यटकांना विकून त्यातुन आपला रोजगार मिळवत असतो. तर काही ठिकाणी आदिवासी तरु णांनी छोटी छोटी दुकाने टाकून वडा पाव, भजी, चहा, कोल्ड ड्रिंक्स, आदी व्यवसायाद्वारे रोजगार मिळविण्याचा प्रयत्न असताना या निर्णया मुळे या सर्वांचा रोजगार बुडुन पर्यटन वाढीच्या प्रयत्नांना खीळ बसून कोट्यवधी रु पयांचा खर्च केलेला निधी वाया जाऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधित ठिकाणावर चोख बंदोबस्त ठेवून हुल्लडबाजी करणाºयावर चाप आणण्यासाठी उपाय योजना करुन पर्यटकांना निसर्गाचा आनंद उपभोगण्या पासून जिल्हाधिकाºयांनी रोखून न धरता दिलेले आदेश मागे घ्यावेत अशी मागणी पर्यटका मधून केली जात आहे.सरकारी धोरणा विरोधात आदेशपर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून वार्षिक ६ कोटींचा निधी खर्च करीत असते पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला तेवढी उर्जा मिळाली नसली तरी हजारो आदिवासींना या आदेशामुळे आपल्या रोजगाराला मुकावे लागणार आहे.विकेंड साजरा करण्यासाठी गेलेले पर्यटक अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी मुसळधार पावसाचा वेग वाढून धबधब्याचा प्रवाह वाढल्याने चिंचोटी येथे पर्यटक अडकल्याची माहिती पुढे आली आहे.हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तिवल्या नंतर काही दिवसा पुरता बंदी असावी.सरसकट बंदी न घालता जिल्हा प्रशासनाने ग्रामदक्षता कमिटी,पोलीस ह्यांच्या प्रयत्नाने हुल्लडबाजी वर नियंत्रण राखावे.-प्रा. भूषण भोईर, पालघरपर्यटन विकासाच्या घोषणा करायच्या मात्र पुरेशा सोयीसुविधा न पुरवीत कलम 144 ची अंमलबजावणी म्हणजे तुघलकी निर्णय झाला.पर्यटन इंडस्ट्री द्वारे स्थानिकांना,हॉटेल व्यावसायिकांना मोठा रोजगार निर्माण होत असल्याने हा निर्णय मागे घेऊन वाईट गोष्टींना आळा घालावा.- डॉ. दीपक भाते, सफाळे 

टॅग्स :palgharपालघरtourismपर्यटन