शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

पालघर जिल्हा पर्यटनाचे कंबरडे मोडले, जिल्हाधिकाऱ्यांचा तुघलकी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 02:57 IST

पर्यटन वाढीद्वारे रोजगार निर्माण करण्यासाठी शासन काट्यवधी रु पयांचा खर्च एके ठिकाणी करीत असताना पालघर जिल्हाधिका-यांनी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आदीं पासून १ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करीत पर्यटकांना बंदी घातली आहे.

पालघर - पर्यटन वाढीद्वारे रोजगार निर्माण करण्यासाठी शासन काट्यवधी रु पयांचा खर्च एके ठिकाणी करीत असताना पालघर जिल्हाधिका-यांनी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आदीं पासून १ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करीत पर्यटकांना बंदी घातली आहे. पर्यटन स्थळी बंदोबस्त, सोयीसुविधा निर्माण करणे गरजेचे असताना उलट त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आल्याने पर्यटकामध्ये मोठी नाराजी पसरली आहे.शासन एके ठिकाणी राज्यात लोकांचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी प्रयत्नशील असताना आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून वार्षिक ६ कोटींचा निधी खर्च करीत असताना जिल्हाधिकाºयांनी १९७३ चे कलमान्वये १४४ चे आदेश जारी केले आहेत. धरणे, धबधबे, तलाव आदी ठिकाणा पासून १ किमी चा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करण्यात आला असून सप्टेबर पर्यंत हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा निर्णय तुघलकी निर्णय असल्याच्या प्रतिक्रि या पर्यटन प्रेमी मधून उमटत आहेत.वसई येथील चिंचोटी धबधब्यावर प्रत्येक वर्षी प्रमाणे विकेंड साजरा करण्यासाठी गेलेले १०० हुन अधिक पर्यटक अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी अचानक मुसळधार पावसाचा वेग वाढून धबधब्याचा प्रवाह वाढल्याने चिंचोटी येथे पर्यटक अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त ठेवून पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असताना जमाव बंदीची (कलम १४४) भिती घालून पर्यटकांना रोखण्यात आल्याने तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.काश्मीर मधून वर्षभर अस्थिर वातावरण राहून अनेक अतिरेकी कारवाया होत असताना शासन मग काश्मिरातील पर्यटन स्थळे बंद करते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील जव्हार हे मिनी माथेरान म्हणून सर्वत्र परिचित असून वर्षाचे बाराही महिने इथे पर्यटकांचा राबता असतो. काळमांडवी, केळीचा पाडा, हिरड पाडा, दाभोसा आदी ओथंबून वाहणारे धबधबे, खडखड सारखे निसर्गाचे नयनरम्य ठिकाण असलेले धरण पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. तसेच विक्र मगड मधील पलूचा धबधबा, पालघर मधील वाघोबा खिंड धबधबा, झंजरोली, गांजे ढेकाळे धरण, बोईसर चे ऐना, दाभोन धबधबे, वसई तील चिंचोटी, तुंगारेश्वर धबधबे, वाड्यातील तिळमाळ धबधबा, ही स्थाने पर्यटकांसाठी पावसाळ्यातील विकेंड साजरी करण्यासाठी पर्वणीचे ठरतात. त्यामुळे कुटुंबीय, तरु णांचे ग्रुप, वर्षा सहली वाले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात.निसर्गाचा आस्वाद घेत असताना काही धांगडधिंगा करणारे ग्रुप या ठिकाणच्या मजेत व्यत्यय आणीत असले तरी सरसकट सर्व पर्यटक प्रेमींना दोन महिन्यासाठी या सर्व बाबी पासून दूर ठेवणे ही काही उपाय योजना नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.प्रतिबंधित करण्यात आलेली सर्व ठिकाणे ही आदिवासी बहुल भागातील असल्याने रानावनात पिकविलेला कंटोळी, शेवळा, कुवारीची भाजी, काकडी, फळे, फुले आदी भाजीपाला आदिवासी बांधव या पर्यटकांना विकून त्यातुन आपला रोजगार मिळवत असतो. तर काही ठिकाणी आदिवासी तरु णांनी छोटी छोटी दुकाने टाकून वडा पाव, भजी, चहा, कोल्ड ड्रिंक्स, आदी व्यवसायाद्वारे रोजगार मिळविण्याचा प्रयत्न असताना या निर्णया मुळे या सर्वांचा रोजगार बुडुन पर्यटन वाढीच्या प्रयत्नांना खीळ बसून कोट्यवधी रु पयांचा खर्च केलेला निधी वाया जाऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधित ठिकाणावर चोख बंदोबस्त ठेवून हुल्लडबाजी करणाºयावर चाप आणण्यासाठी उपाय योजना करुन पर्यटकांना निसर्गाचा आनंद उपभोगण्या पासून जिल्हाधिकाºयांनी रोखून न धरता दिलेले आदेश मागे घ्यावेत अशी मागणी पर्यटका मधून केली जात आहे.सरकारी धोरणा विरोधात आदेशपर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून वार्षिक ६ कोटींचा निधी खर्च करीत असते पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला तेवढी उर्जा मिळाली नसली तरी हजारो आदिवासींना या आदेशामुळे आपल्या रोजगाराला मुकावे लागणार आहे.विकेंड साजरा करण्यासाठी गेलेले पर्यटक अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी मुसळधार पावसाचा वेग वाढून धबधब्याचा प्रवाह वाढल्याने चिंचोटी येथे पर्यटक अडकल्याची माहिती पुढे आली आहे.हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तिवल्या नंतर काही दिवसा पुरता बंदी असावी.सरसकट बंदी न घालता जिल्हा प्रशासनाने ग्रामदक्षता कमिटी,पोलीस ह्यांच्या प्रयत्नाने हुल्लडबाजी वर नियंत्रण राखावे.-प्रा. भूषण भोईर, पालघरपर्यटन विकासाच्या घोषणा करायच्या मात्र पुरेशा सोयीसुविधा न पुरवीत कलम 144 ची अंमलबजावणी म्हणजे तुघलकी निर्णय झाला.पर्यटन इंडस्ट्री द्वारे स्थानिकांना,हॉटेल व्यावसायिकांना मोठा रोजगार निर्माण होत असल्याने हा निर्णय मागे घेऊन वाईट गोष्टींना आळा घालावा.- डॉ. दीपक भाते, सफाळे 

टॅग्स :palgharपालघरtourismपर्यटन