शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

घरात घुसून माय-लेकीला संपवलं, बाथरुममध्ये लपला अन्...; पालघर तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:52 IST

पालघरमध्ये आठवड्याभरापूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उलघडलं आहे.

Palgahr Crime : आठवड्याभरापूर्वी पालघरच्या वाडा तालुक्यात एकाच घरात तीन मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आई-वडील आणि मुलगी असे तिघांचे मृतदेह बंद घरात सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. कामानिमित्त गुजरातला राहणाऱ्या मुलाने घरी जाऊन दरवाजा उघडून पाहिला असता हा सगळा प्रकार समोर आला. मुलाने वाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला होता. आता या प्रकणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

वाडा तालुक्यातील नेहरोली गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. गावात राहाणाऱ्या राठोड कुटुंबातील तिघांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आले होते. मुकुंद राठोड हे २५ वर्षांपूर्वी गुजरातमधून पालघर येथे राहण्यासाठी आले होते. मुकुंद यांच्या बरोबर त्यांची पत्ना कांचन राठोड, मुलगी संगित राठोड, दोन मुले सुहास आणि पंकज राहात होते. काही वर्षापूर्वी मोठा मुलगा सुहास राठोड हा नोकरी व्यवसायासाठी  गुजरातमध्ये गेला. तर दुसरा मुलगा विरारमध्ये राहात होता.

कामानिमित्त दोन्ही मुले बाहेर असली तरी ते नेहमी फोनवरुन मुंकद राठोड यांच्याशी बोलत असत. मात्र १३ दिवसांपासून सुहासचा आई वडिलांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्याने नेहरोली जाण्याचे ठरवलं. सुहास गावात पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा हा बंद होता. त्याने दरवाजा उघडला असता त्याला घरातून दुर्गंधी येऊ लागली. सुहासला घरात तिघांचेही मृतदेह पाहून जबर धक्का बसला. सुहासने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरु केला.  मात्र तिघांचे मृतदेह पाहून पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी घराची छाडाछडती घेत असताना घरातील पत्र्याच्या पेटीत आई व मुलीचा मृतदेह आढळला. तर वडिलांचा मृतदेह बाथरुमच्या दरवाज्यात आढळला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. तपासादरम्यान भाडोत्रीने तिघांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.

मुकुंद राठोड यांनी गावात एक जागा घेऊन इमारत बांधली होती. त्या इमारतीत त्यांनी भाडेकरुंनाही जागा दिली होती. याच इमारतीत आरिफ हा भाडेकरु म्हणून राहत होता. आरिफ हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. राठोड यांच्याकडे भरपूर पैसे असतील असं आरिफला वाटत होतं. त्यामुळे त्याने राठोड यांच्या घरात घुसून पत्नी आणि मुलीची लोखंडी रॉडने त्यांची हत्या केली. त्यानंतर पत्र्याच्या बंद पेटीत त्यांचे मृतदेह ठेवले. हा प्रकार घडला तेव्हा मुकुंद राठोड हे घराबाहेर होते. त्यामुळे आरोपी आरिफ घरात बाथरुममध्ये लपून बसून त्यांची वाट पाहत होता. राठोड घरात येताच त्याने बाथरुममधून त्यांच्यावर वार केले. त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी आरिफ उत्तर प्रदेशला पळून गेला. वाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके रवाना केली होती. उत्तर प्रदेशातून पोलिसांनी आरोपी आरिफला अटक करण्यात आली. 

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश