शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घरात घुसून माय-लेकीला संपवलं, बाथरुममध्ये लपला अन्...; पालघर तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:52 IST

पालघरमध्ये आठवड्याभरापूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उलघडलं आहे.

Palgahr Crime : आठवड्याभरापूर्वी पालघरच्या वाडा तालुक्यात एकाच घरात तीन मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आई-वडील आणि मुलगी असे तिघांचे मृतदेह बंद घरात सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. कामानिमित्त गुजरातला राहणाऱ्या मुलाने घरी जाऊन दरवाजा उघडून पाहिला असता हा सगळा प्रकार समोर आला. मुलाने वाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला होता. आता या प्रकणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

वाडा तालुक्यातील नेहरोली गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. गावात राहाणाऱ्या राठोड कुटुंबातील तिघांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आले होते. मुकुंद राठोड हे २५ वर्षांपूर्वी गुजरातमधून पालघर येथे राहण्यासाठी आले होते. मुकुंद यांच्या बरोबर त्यांची पत्ना कांचन राठोड, मुलगी संगित राठोड, दोन मुले सुहास आणि पंकज राहात होते. काही वर्षापूर्वी मोठा मुलगा सुहास राठोड हा नोकरी व्यवसायासाठी  गुजरातमध्ये गेला. तर दुसरा मुलगा विरारमध्ये राहात होता.

कामानिमित्त दोन्ही मुले बाहेर असली तरी ते नेहमी फोनवरुन मुंकद राठोड यांच्याशी बोलत असत. मात्र १३ दिवसांपासून सुहासचा आई वडिलांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्याने नेहरोली जाण्याचे ठरवलं. सुहास गावात पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा हा बंद होता. त्याने दरवाजा उघडला असता त्याला घरातून दुर्गंधी येऊ लागली. सुहासला घरात तिघांचेही मृतदेह पाहून जबर धक्का बसला. सुहासने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरु केला.  मात्र तिघांचे मृतदेह पाहून पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी घराची छाडाछडती घेत असताना घरातील पत्र्याच्या पेटीत आई व मुलीचा मृतदेह आढळला. तर वडिलांचा मृतदेह बाथरुमच्या दरवाज्यात आढळला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. तपासादरम्यान भाडोत्रीने तिघांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.

मुकुंद राठोड यांनी गावात एक जागा घेऊन इमारत बांधली होती. त्या इमारतीत त्यांनी भाडेकरुंनाही जागा दिली होती. याच इमारतीत आरिफ हा भाडेकरु म्हणून राहत होता. आरिफ हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. राठोड यांच्याकडे भरपूर पैसे असतील असं आरिफला वाटत होतं. त्यामुळे त्याने राठोड यांच्या घरात घुसून पत्नी आणि मुलीची लोखंडी रॉडने त्यांची हत्या केली. त्यानंतर पत्र्याच्या बंद पेटीत त्यांचे मृतदेह ठेवले. हा प्रकार घडला तेव्हा मुकुंद राठोड हे घराबाहेर होते. त्यामुळे आरोपी आरिफ घरात बाथरुममध्ये लपून बसून त्यांची वाट पाहत होता. राठोड घरात येताच त्याने बाथरुममधून त्यांच्यावर वार केले. त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी आरिफ उत्तर प्रदेशला पळून गेला. वाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके रवाना केली होती. उत्तर प्रदेशातून पोलिसांनी आरोपी आरिफला अटक करण्यात आली. 

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश