शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भातसा धरणग्रस्तांना अखेर ५० वषार्नंतर मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 23:49 IST

पुनर्वसनाचा मार्ग मोकळा । मुंबई महापालिकेत नोकरीचे आश्वासन

वसंत पानसरेकिन्हवली : ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्याला धरणांचा तालुका असेही संबोधले जाते. येथील नागरिकांनी धरणासाठी त्यांच्या परंपरागत जमिनी दिल्या. मात्र त्या बदल्यात वर्षोनुवर्षे त्यांचे पुनर्वसन झाले नाही,कुठल्याही सुविधा, नोकºया नाहीत ही वस्तूस्थिती असल्याचा गंभीर आरोप आजही प्रकल्पग्रस्त करीत आहेत. १९६७ मध्ये १२७ वास्तव्यास असलेली कुटुंब व सगळे गाव भातसा धरणाच्या जलाशयात बुडाली. गावांचे आणि कुटुंबांचे कित्येक वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबांना सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे ,भाऊ महालुंगे व समिती यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर ५० वषार्नंतर न्याय मिळाला आहे. भातसा प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन होणार असून महापालिकेत नोकरीही मिळणार आहे.

१९६७ मध्ये झालेल्या भातसा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाल्हेरी, पाचीवरे, वाकीचा पाडा आणि घोडेपाऊल या गावाच्या जमिनी धरणाच्या बुडीताखाली गेल्या. तर या पाच गावपाड्यांवरील १२७ कुटुंब १९७०-७२ च्या दरम्यान भातसा धरणाच्या जलाशयात बुडाली.सरकारने भातसा प्रकल्पासाठी तीन हजार २७८ हेक्टर जमीन संपादीत केली. यातील ६५३ हेक्टर खाजगी होती आणि बाकी सरकारच्या मालकीची वन जमीन होती. ज्या १२७ कुटुंबांच्या जमिनी गेल्या त्यामध्ये ९७ ठाकूर आदिवासी होते तर ३० ओबीसी. हे सगळे प्रकल्पग्रस्त ५० वर्षे झाली तरी पुनर्वसनाची वाट पाहत होते. १९७०-७१ मध्ये लागवडीखालील जमिनी एकरी २३० रूपये अशा कवडीमोल भावात संपादीत केल्या होत्या. अखेर १९७३ पासून, विस्थापित झालेल्या या ग्रामस्थांनी निदर्शने, उपोषण, धरणे, बैठका आणि सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा आणि पत्रव्यवहार अशा न्यायासाठीचा प्रवास सुरू झाला. मात्र न्याय मिळाला नाही. अखेर १९८६ मध्ये स्थापन झालेल्या भातसा धरण पुनर्वसन समितीच्या माध्यमातून विस्थापितांचा संघर्ष सुरू झाला होता.

त्यापूर्वी समितीने शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर १० मार्च २०१५ मध्ये आझाद मैदानात प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केले. मात्र तीन पिढ्या उलटूनही न्याय मिळाला नाही. दरम्यान, समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे ,भाऊ महालुंगे व समितीने वारंवार पाठपुरावा केल्यावर अखेर या धरणाच्या बुडीताखाली जमिनी गेलेल्या १२७ कुटुंबाना मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्णयामुळे न्याय मिळणार आहे.

आयुक्त परदेशी यांनी आपल्या दालनात झालेल्या बैठकीत ५० वर्षापासूनचा हा प्रश्न असून ज्या ग्रामस्थांनी आपल्या जमिनी भातसा धरणासाठी दिल्या त्या बुडीत क्षेत्रातील शेतकºयांच्या वारसांना पात्रतेप्रमाणे नोकरी देण्याचे धोरण ठरविण्यात आले.त्या अनुषंगाने सहायक संचालक,नगररचना विभाग, ठाणे यांच्या कार्यालयात पुनर्वसनचा आराखडा मंजूर झाला असून त्या ९७ कुटुंबांना भातसाधरण वसाहतीमध्ये प्लॉट वाटप करण्यातबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हा प्रश्न आचारसंहितेच्या आधी निकाली काढणार असल्याची माहिती दिली.

२३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली१२७ पैकी अनेक कुटुंब गायब झाली. काहींचा तपासच लागत नाही तर काहींच्या नोंदीच नसल्याने १२७ पैकी फक्त ९७ कुटुंबांची नोंद सरकारकडे आहे. त्या ९७ पैकी ५२ वर्षात ९६ कुटुंबप्रमुखांचे निधन झाले. ५० वर्षांनंतर पुनर्वसन होणार आहे. - बबन हरणे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Damधरण