शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भातसा धरणग्रस्तांना अखेर ५० वषार्नंतर मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 23:49 IST

पुनर्वसनाचा मार्ग मोकळा । मुंबई महापालिकेत नोकरीचे आश्वासन

वसंत पानसरेकिन्हवली : ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्याला धरणांचा तालुका असेही संबोधले जाते. येथील नागरिकांनी धरणासाठी त्यांच्या परंपरागत जमिनी दिल्या. मात्र त्या बदल्यात वर्षोनुवर्षे त्यांचे पुनर्वसन झाले नाही,कुठल्याही सुविधा, नोकºया नाहीत ही वस्तूस्थिती असल्याचा गंभीर आरोप आजही प्रकल्पग्रस्त करीत आहेत. १९६७ मध्ये १२७ वास्तव्यास असलेली कुटुंब व सगळे गाव भातसा धरणाच्या जलाशयात बुडाली. गावांचे आणि कुटुंबांचे कित्येक वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबांना सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे ,भाऊ महालुंगे व समिती यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर ५० वषार्नंतर न्याय मिळाला आहे. भातसा प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन होणार असून महापालिकेत नोकरीही मिळणार आहे.

१९६७ मध्ये झालेल्या भातसा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाल्हेरी, पाचीवरे, वाकीचा पाडा आणि घोडेपाऊल या गावाच्या जमिनी धरणाच्या बुडीताखाली गेल्या. तर या पाच गावपाड्यांवरील १२७ कुटुंब १९७०-७२ च्या दरम्यान भातसा धरणाच्या जलाशयात बुडाली.सरकारने भातसा प्रकल्पासाठी तीन हजार २७८ हेक्टर जमीन संपादीत केली. यातील ६५३ हेक्टर खाजगी होती आणि बाकी सरकारच्या मालकीची वन जमीन होती. ज्या १२७ कुटुंबांच्या जमिनी गेल्या त्यामध्ये ९७ ठाकूर आदिवासी होते तर ३० ओबीसी. हे सगळे प्रकल्पग्रस्त ५० वर्षे झाली तरी पुनर्वसनाची वाट पाहत होते. १९७०-७१ मध्ये लागवडीखालील जमिनी एकरी २३० रूपये अशा कवडीमोल भावात संपादीत केल्या होत्या. अखेर १९७३ पासून, विस्थापित झालेल्या या ग्रामस्थांनी निदर्शने, उपोषण, धरणे, बैठका आणि सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा आणि पत्रव्यवहार अशा न्यायासाठीचा प्रवास सुरू झाला. मात्र न्याय मिळाला नाही. अखेर १९८६ मध्ये स्थापन झालेल्या भातसा धरण पुनर्वसन समितीच्या माध्यमातून विस्थापितांचा संघर्ष सुरू झाला होता.

त्यापूर्वी समितीने शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर १० मार्च २०१५ मध्ये आझाद मैदानात प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केले. मात्र तीन पिढ्या उलटूनही न्याय मिळाला नाही. दरम्यान, समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे ,भाऊ महालुंगे व समितीने वारंवार पाठपुरावा केल्यावर अखेर या धरणाच्या बुडीताखाली जमिनी गेलेल्या १२७ कुटुंबाना मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्णयामुळे न्याय मिळणार आहे.

आयुक्त परदेशी यांनी आपल्या दालनात झालेल्या बैठकीत ५० वर्षापासूनचा हा प्रश्न असून ज्या ग्रामस्थांनी आपल्या जमिनी भातसा धरणासाठी दिल्या त्या बुडीत क्षेत्रातील शेतकºयांच्या वारसांना पात्रतेप्रमाणे नोकरी देण्याचे धोरण ठरविण्यात आले.त्या अनुषंगाने सहायक संचालक,नगररचना विभाग, ठाणे यांच्या कार्यालयात पुनर्वसनचा आराखडा मंजूर झाला असून त्या ९७ कुटुंबांना भातसाधरण वसाहतीमध्ये प्लॉट वाटप करण्यातबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हा प्रश्न आचारसंहितेच्या आधी निकाली काढणार असल्याची माहिती दिली.

२३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली१२७ पैकी अनेक कुटुंब गायब झाली. काहींचा तपासच लागत नाही तर काहींच्या नोंदीच नसल्याने १२७ पैकी फक्त ९७ कुटुंबांची नोंद सरकारकडे आहे. त्या ९७ पैकी ५२ वर्षात ९६ कुटुंबप्रमुखांचे निधन झाले. ५० वर्षांनंतर पुनर्वसन होणार आहे. - बबन हरणे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Damधरण