शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:47 IST

महापालिकेचा ठराव : ग्रामीण भागालाही केला जाणार पाणीपुरवठा

वसई : महानगरपालिकेच्या विरार येथे बुधवारी झालेल्या महासभेत शहरातील अनधिकृत इमारतीनाही नळजोडण्या देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वसईतील ग्रामीण भागातील नऊ वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्यांची दुरूस्ती करून किंवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ग्रामीण भागात पालिकेचे पाणी येणार म्हणून आनंदाचे वातावरण आहे.

वाढती लोकसंख्या लोकांची घराची गरज ओळखून शहरात अनेक विकासकांनी हजारो अनधिकृत इमारती बांधल्या. अनेक बनावट बांधकाम परवानग्या वापरून, आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकामे झाली. खोटी कागदपत्रे दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून विकासक पळून जातात. महानगरपालिकेने शेकडो बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. परंतु त्यांनी यापूर्वीच फ्लॅट विकल्याने लोक या इमारतीत राहायला आले आहेत. त्यांच्यापुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता.अनधिकृत इमारतींपैकी काहीना घरपट्टी लावण्यात आलेली आहे. मात्र नळजोडण्या नाहीत. या इमारतीच्या रहिवाशांची नावे मतदार यादीत आहेत. परंतु त्यांना पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.

महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत अखेर नळजोडण्या देण्याचा विषय चर्चिण्यात आला होता. अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना शास्ती न लावता प्रचलित दराने नळजोडण्या देण्यात याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दंड न आकारता नळजोडणी देण्याची मागणी केली. जेष्ठ नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन करतांना अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकांना नळजोडणी मिळावी, असे सांगितले. याचबरोबर आता पश्चिम पट्टयÞातील गावांनाही येत्या काळात पाणी मिळणार आहे. शहरात वितरणाचे काम सुरू आहे. नऊ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या जलवाहिन्या गंजल्या आहेत. त्या दुरूस्त करून अथवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणी गावकºयांना द्यावे असे जेष्ठ नगरसेवक प्रफुल्ल साने व नगरसेवक मार्शल लोपीस यांनी महासभेत सांगीतल्यावर त्या जलवाहिन्या दुरुस्त होतील, असे शहर अभियंता जवादे यांनी स्पष्ट केले.हा निर्णय कशामुळे घेण्यात आला?सूर्याचे १०० दशलक्ष लीटर पाणी आले आहे. सध्या प्रतिक्षा यादीतील अधिकृत आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींनाच नवीन नळजोडण्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकाना टँकरच्या पाण्यावरच अलवंबून राहावे लागत होते. आता सूर्याच्या पाण्याच्या वितरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांनाही पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVasai Virarवसई विरार