शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:47 IST

महापालिकेचा ठराव : ग्रामीण भागालाही केला जाणार पाणीपुरवठा

वसई : महानगरपालिकेच्या विरार येथे बुधवारी झालेल्या महासभेत शहरातील अनधिकृत इमारतीनाही नळजोडण्या देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वसईतील ग्रामीण भागातील नऊ वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्यांची दुरूस्ती करून किंवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ग्रामीण भागात पालिकेचे पाणी येणार म्हणून आनंदाचे वातावरण आहे.

वाढती लोकसंख्या लोकांची घराची गरज ओळखून शहरात अनेक विकासकांनी हजारो अनधिकृत इमारती बांधल्या. अनेक बनावट बांधकाम परवानग्या वापरून, आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकामे झाली. खोटी कागदपत्रे दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून विकासक पळून जातात. महानगरपालिकेने शेकडो बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. परंतु त्यांनी यापूर्वीच फ्लॅट विकल्याने लोक या इमारतीत राहायला आले आहेत. त्यांच्यापुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता.अनधिकृत इमारतींपैकी काहीना घरपट्टी लावण्यात आलेली आहे. मात्र नळजोडण्या नाहीत. या इमारतीच्या रहिवाशांची नावे मतदार यादीत आहेत. परंतु त्यांना पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.

महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत अखेर नळजोडण्या देण्याचा विषय चर्चिण्यात आला होता. अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना शास्ती न लावता प्रचलित दराने नळजोडण्या देण्यात याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दंड न आकारता नळजोडणी देण्याची मागणी केली. जेष्ठ नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन करतांना अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकांना नळजोडणी मिळावी, असे सांगितले. याचबरोबर आता पश्चिम पट्टयÞातील गावांनाही येत्या काळात पाणी मिळणार आहे. शहरात वितरणाचे काम सुरू आहे. नऊ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या जलवाहिन्या गंजल्या आहेत. त्या दुरूस्त करून अथवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणी गावकºयांना द्यावे असे जेष्ठ नगरसेवक प्रफुल्ल साने व नगरसेवक मार्शल लोपीस यांनी महासभेत सांगीतल्यावर त्या जलवाहिन्या दुरुस्त होतील, असे शहर अभियंता जवादे यांनी स्पष्ट केले.हा निर्णय कशामुळे घेण्यात आला?सूर्याचे १०० दशलक्ष लीटर पाणी आले आहे. सध्या प्रतिक्षा यादीतील अधिकृत आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींनाच नवीन नळजोडण्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकाना टँकरच्या पाण्यावरच अलवंबून राहावे लागत होते. आता सूर्याच्या पाण्याच्या वितरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांनाही पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVasai Virarवसई विरार