शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:47 IST

महापालिकेचा ठराव : ग्रामीण भागालाही केला जाणार पाणीपुरवठा

वसई : महानगरपालिकेच्या विरार येथे बुधवारी झालेल्या महासभेत शहरातील अनधिकृत इमारतीनाही नळजोडण्या देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वसईतील ग्रामीण भागातील नऊ वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्यांची दुरूस्ती करून किंवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ग्रामीण भागात पालिकेचे पाणी येणार म्हणून आनंदाचे वातावरण आहे.

वाढती लोकसंख्या लोकांची घराची गरज ओळखून शहरात अनेक विकासकांनी हजारो अनधिकृत इमारती बांधल्या. अनेक बनावट बांधकाम परवानग्या वापरून, आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकामे झाली. खोटी कागदपत्रे दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून विकासक पळून जातात. महानगरपालिकेने शेकडो बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. परंतु त्यांनी यापूर्वीच फ्लॅट विकल्याने लोक या इमारतीत राहायला आले आहेत. त्यांच्यापुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता.अनधिकृत इमारतींपैकी काहीना घरपट्टी लावण्यात आलेली आहे. मात्र नळजोडण्या नाहीत. या इमारतीच्या रहिवाशांची नावे मतदार यादीत आहेत. परंतु त्यांना पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.

महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत अखेर नळजोडण्या देण्याचा विषय चर्चिण्यात आला होता. अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना शास्ती न लावता प्रचलित दराने नळजोडण्या देण्यात याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दंड न आकारता नळजोडणी देण्याची मागणी केली. जेष्ठ नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन करतांना अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकांना नळजोडणी मिळावी, असे सांगितले. याचबरोबर आता पश्चिम पट्टयÞातील गावांनाही येत्या काळात पाणी मिळणार आहे. शहरात वितरणाचे काम सुरू आहे. नऊ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या जलवाहिन्या गंजल्या आहेत. त्या दुरूस्त करून अथवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणी गावकºयांना द्यावे असे जेष्ठ नगरसेवक प्रफुल्ल साने व नगरसेवक मार्शल लोपीस यांनी महासभेत सांगीतल्यावर त्या जलवाहिन्या दुरुस्त होतील, असे शहर अभियंता जवादे यांनी स्पष्ट केले.हा निर्णय कशामुळे घेण्यात आला?सूर्याचे १०० दशलक्ष लीटर पाणी आले आहे. सध्या प्रतिक्षा यादीतील अधिकृत आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींनाच नवीन नळजोडण्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकाना टँकरच्या पाण्यावरच अलवंबून राहावे लागत होते. आता सूर्याच्या पाण्याच्या वितरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांनाही पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVasai Virarवसई विरार